शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

काकडी, कांदा, मिरचीच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 04:14 IST

उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे तरकारी बाजारात भाजीपाल्याची अपेक्षित आवक झाली नाही. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने आले, काकडी, श्रावण घेवडा, कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली

पुणे : उन्हाच्या प्रचंड तडाख्यामुळे तरकारी बाजारात भाजीपाल्याची अपेक्षित आवक झाली नाही. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने आले, काकडी, श्रावण घेवडा, कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. तर परराज्यांतून दाखल होत असलेल्या मटारचा दर्जा घसरल्याने मटारच्या दरामध्ये घट झाली. दरम्यान इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील तरकारी बाजारात रविवारी (दि.२९) रोजी ५० ते १६० ट्रक शेतमालाची आवक झाली. यात प्रामुख्याने हिमाचल प्रदेशमधून २०० ते २५० पोती मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ते ४ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ७ ते ८ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले १४०० ते १५०० पोती, टॉमेटो साडेपाच हजार पेटी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ६ ते ७ टेम्पो, मटार १५० ते १७५ गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गावरान कैरी १० ते १२, चिंच २० ते २५ पोती, कांद्याची ७० ते ८० ट्रक, आग्रा, इंदूर, नाशिक आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची ४५ ट्रक, भुईमूग ५० ते ६० पोती इतकी आवक झाली.कलिंगड, खरबूज, डाळिंबाची मागणी वाढलीउन्हाच्या कडाक्यामुळे लाही-लाही होणारा जीव थंड करण्यासाठी फळबाजारात कलिंगड, खरबूज, डाळिंब, संत्रा, मोसंबी या थंडावा देणाऱ्या फळांची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक चांगली असल्याने या फळांचे दर स्थिर असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. यामध्ये केवळ कलिंगडच्या दरामध्ये किलोमागे २ रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान चांगल्या दर्जाची लिंबे बाजारात येत नसल्याने मागणी असून देखील आकाराने लहान, हिरव्या लिंबांना उठाव कमी आहे. यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबाच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली. रविवारी येथील फळबाजारात ७ ट्रक अननस, ४० टन मोसंबी, १० टन संत्री, २० ते २५ टन डाळिंब, १० ते १२ टेम्पो पपई, लिंबाची ३ ते ४ हजार गोणीआवक झाली.चाकणला काद्यांचीआवक घटलीचाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक ५५० क्विंटलने घटून भावात १०० रुपयांची वाढ झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक २५५० क्विंटल झाली. कांद्याला कमाल ९०० रुपये भाव मिळाला. बाजारात एकूण अडीच कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ९३५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २८० क्विंटलने घटून बटाट्याला कमाल १६०० रुपये भाव मिळाला. जळगाव भुईमूग शेंगाची एकूण आवक ४ क्विंटल होऊन शेंगांचा कमाल भाव ६००० रुपयांवर स्थिर राहिला. लसणाची एकूण आवक ५ क्विंटल होऊन लसणाचा कमाल भाव २५०० रुपयांवर स्थिर झाला.पालेभाज्यांचे दर वाढलेलेचउन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत मुळा, चवळई, पालक वगळता पालेभाज्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली. पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम असल्याने किरकोळ बाजारात पालेभाज्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. कोथिंबिरीच्या जुडीला घाऊक बाजारात ५ ते १८ रुपये मोजावे लागत आहेत आहे. किरकोळ बाजारात १५ ते २५ रुपये भावाने जुडीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली. रविवारी कोथिंबिरीची सुमारे १ लाख, तर मेथीची ४० हजार जुडींची आवक झाली.