शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पोलीस-नागरिक सलोखा वाढावा

By admin | Updated: May 7, 2017 02:49 IST

मावळ तालुक्यात मागील काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी व भयावह गुन्हे घडून देखील त्यांची न होणारी उकल हे पोलिसांचे

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : मावळ तालुक्यात मागील काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी व भयावह गुन्हे घडून देखील त्यांची न होणारी उकल हे पोलिसांचे जनमाणसातील सलोख्याचे संबंध कमी झाले असल्याचे धोतक म्हणावे लागेल. म्हणून पोलिसांनी नागरिकांशी सलोख्याचे संबंध राखा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्यामुळे मावळ तालुक्यासारख्या संत-महंतांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या भूमीत खून, दरोडे, जबरीचोरी, घरफोडी, महिला अत्याचार सारख्या घटना वाढू लागल्या आहेत. दिवसा ढवळ्या या घटना घडत असताना पोलिसांना या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी काहीही धागेदोरे हाती लागत नाही. महिनोनमहिने आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. नागरिकही पोलिसांना घटनांची माहिती देण्यासाठी धजावत नाहीत हे पोलिसांची जनमाणसातील प्रतिमा खालावल्याचे उघडे सत्य आहे. जसा पोलीस हा खाकी वर्दीतील माणूस आहे तसाच माणूस हादेखील साध्या वेशातील पोलीस आहे हे साधे समीकरण पोलिसवाले विसरले आहेत. सध्या बहुतांश गुन्ह्यांची उकल ही सीसीटीव्ही कॅमेरे व मोबाईल लोकेशनवर केली जाते. मात्र, ज्या ठिकाणी या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे, असे गुन्हे महिनोनमहिने पडून आहेत. ना आरोपींचा शोध लागतो, ना नागरिकांना न्याय भेटतो. ज्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे व मोबाईल नव्हते अथवा त्यातील अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी विकसित झालेली नव्हती. तेव्हा हेच साध्या वेशातील पोलीस हे कायद्याचे नाक, कान व डोळे होते. आता सर्वच पोलीस ठाण्यांची परिस्थिती बदलली आहे. पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेगारांना सन्मानाची वागणूक व सर्वसामान्यांना गुन्हेगारांची वागणूक दिली जाते. किरकोळ प्रथमदर्शनी गुन्हे मिटत असताना नागरिकांना त्रास दिला जातो. अनेकवेळा गुन्हा केलेला नसतानाही खऱ्या गुन्हेगाराची मर्जी सांभाळण्यासाठी सर्वसामान्यांचा बळी दिला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्याची पायरी चढण्यासही धजावत नाहीत. नागरिकांच्या मनातील पोलिसांबाबतची नकारात्मक प्रतिमा बदलण्याची गरज आहे.पोलिसांचा नाहक ससेमिरा मागे नको, म्हणून नागरिक देखील एखादी घटना माहीत असूनही पोलिसांना सांगत नाही. कारण पोलिसांची समाजमनातील विश्वासार्हता कमी झाली आहे. पोलिसांनी समाजाभिमुख काम केल्यास समाजही नक्कीच पोलिसांभिमुख काम करेल यामध्ये तीळमात्र शंका नाही. एखादी मोठी घटना घडल्यानंतर संबंधित परिसरातील नागरिकांना एकत्र बोलावून समज देण्याची वेगळी प्रथा सध्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये पहायला मिळत आहे. खरे तर पोलिसांनी नागरिकांसोबत सलोख्यांचे संबंध प्रस्तापित करून स्वत:चे माहितीचे स्रोत वाढविल्यास वाढत्या गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल. साध्या वेशातील पोलिसांचा नाक,कान व डोळे म्हणून उपयोग केल्यास गुन्ह्यांची उकलही तत्काळ होईल, असा आशावाद जाणकार व्यक्त करीत आहेत.