शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टेकड्यांसह संवेदनशील ठिकाणांवरची गस्त वाढवणार

By admin | Updated: February 28, 2016 03:50 IST

शहरातील टेकड्यांसह महिलांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर गस्त वाढवण्यात येणार असून, याबाबतीत कायम ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना

पुणे : शहरातील टेकड्यांसह महिलांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर गस्त वाढवण्यात येणार असून, याबाबतीत कायम ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सांगितले. हनुमान टेकडीवर पुस्तक वाचण्यासाठी गेलेल्या तरुणीवर चोरट्याने केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील टेकड्यांवरील सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत’च्या सविस्तर वृत्ताची दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून,याभागात ‘महिला मार्शल्स’ची संख्या वाढवण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. हनुमान टेकडीवर बुधवारी संध्याकाळी पुस्तक वाचण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीला लुटण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी विजय विकास कांबळे (वय २१, रा. वडारवाडी) याला अटक केली आहे. या घटनेच्या निमित्ताने शहरातील टेकड्यांवर जाणाऱ्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबतची सद्य:स्थिती आणि महिला सुरक्षा समितीच्या अहवालाकडे करण्यात येणाऱ्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. ‘लोकमत’च्या टीमने शुक्रवारी काही टेकड्यांवर फिरून सुरक्षेचा आढावाही घेतला. यासोबतच महिला, तरुणी आणि नागरिकांमध्ये स्वत:च्याच सुरक्षेबाबत असलेली उदासीनताही समोर मांडली. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी घेतली आहे. टेकड्यांवर, तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. यासोबतच पोलिसांना अशा घटनांबाबत कायम ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात महिला पोलिसांची गस्त वाढवण्यावर भर देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी वाहनांनी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महिला आणि तरुणींनीही निर्जनस्थळी जाताना सुरक्षेचा विचार करावा. स्वत:ला धोका होईल अथवा इजा पोहोचेल, अशा ठिकाणी जाणे टाळावे. जर शंकास्पद काही वाटलेच तर पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांना अवश्य मदत पुरवली जाईल, असा वडीलकीचा सल्लाही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. टेकड्यांची सुरक्षा ही केवळ पोलिसांचीच जबाबदारी नाही. वन विभागानेही यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. महिला सुरक्षा समितीमध्ये पोलिसांसह महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधीही आहेत. सुरक्षेचा मुद्दा आला, की केवळ पोलिसांकडे बोट दाखवून चालणार नाही. उर्वरित विभागांनीही त्यांची जबाबदारी ओळखून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कारण पोलीस सुरक्षेसाठी असले, तरी बाकी सर्व महत्त्वाच्या उपाययोजना उर्वरित विभागांनाच कराव्या लागणार आहेत.