शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

टेकड्यांसह संवेदनशील ठिकाणांवरची गस्त वाढवणार

By admin | Updated: February 28, 2016 03:50 IST

शहरातील टेकड्यांसह महिलांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर गस्त वाढवण्यात येणार असून, याबाबतीत कायम ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना

पुणे : शहरातील टेकड्यांसह महिलांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणांवर गस्त वाढवण्यात येणार असून, याबाबतीत कायम ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी सांगितले. हनुमान टेकडीवर पुस्तक वाचण्यासाठी गेलेल्या तरुणीवर चोरट्याने केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील टेकड्यांवरील सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत’च्या सविस्तर वृत्ताची दखल पोलीस आयुक्तांनी घेतली असून,याभागात ‘महिला मार्शल्स’ची संख्या वाढवण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. हनुमान टेकडीवर बुधवारी संध्याकाळी पुस्तक वाचण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीला लुटण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांनी विजय विकास कांबळे (वय २१, रा. वडारवाडी) याला अटक केली आहे. या घटनेच्या निमित्ताने शहरातील टेकड्यांवर जाणाऱ्या महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबतची सद्य:स्थिती आणि महिला सुरक्षा समितीच्या अहवालाकडे करण्यात येणाऱ्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. ‘लोकमत’च्या टीमने शुक्रवारी काही टेकड्यांवर फिरून सुरक्षेचा आढावाही घेतला. यासोबतच महिला, तरुणी आणि नागरिकांमध्ये स्वत:च्याच सुरक्षेबाबत असलेली उदासीनताही समोर मांडली. या वृत्ताची दखल पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी घेतली आहे. टेकड्यांवर, तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. यासोबतच पोलिसांना अशा घटनांबाबत कायम ‘अ‍ॅलर्ट’ राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात महिला पोलिसांची गस्त वाढवण्यावर भर देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी वाहनांनी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महिला आणि तरुणींनीही निर्जनस्थळी जाताना सुरक्षेचा विचार करावा. स्वत:ला धोका होईल अथवा इजा पोहोचेल, अशा ठिकाणी जाणे टाळावे. जर शंकास्पद काही वाटलेच तर पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांना अवश्य मदत पुरवली जाईल, असा वडीलकीचा सल्लाही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. टेकड्यांची सुरक्षा ही केवळ पोलिसांचीच जबाबदारी नाही. वन विभागानेही यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. महिला सुरक्षा समितीमध्ये पोलिसांसह महापालिका, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधीही आहेत. सुरक्षेचा मुद्दा आला, की केवळ पोलिसांकडे बोट दाखवून चालणार नाही. उर्वरित विभागांनीही त्यांची जबाबदारी ओळखून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कारण पोलीस सुरक्षेसाठी असले, तरी बाकी सर्व महत्त्वाच्या उपाययोजना उर्वरित विभागांनाच कराव्या लागणार आहेत.