शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
3
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
4
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
5
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
6
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
7
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
8
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
9
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
10
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
11
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
12
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
13
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
14
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
15
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
16
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
17
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
18
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
19
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
20
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पास करण्याच्या प्रमाणात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:13 IST

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेस निवड करण्याच्या प्रमाणात वाढ करावी, ...

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेस निवड करण्याच्या प्रमाणात वाढ करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा समजली जाते. या परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येते. एका जागेसाठी १४ उमेदवारांची निवड केली जाते. त्यामुळे अनेकांना अवघा एक गुण जरी कमी पडला तरी मुख्य परीक्षा देता येत नाही. पासिंगचे प्रमाण हे एकास चौदा किंवा कधी कधी वाढविलेदेखील जाते. यावर विचार करून एका जागेसाठी १४ ऐवजी २५ उमेदवारांची निवड करावी. एमपीएसीने परीक्षा देण्यावर प्रवर्गानुसार मर्यादांचे बंधन घातले आहे. त्यामुळे परीक्षा देण्यावर आता मर्यादा आल्या आहेत. मुख्य परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

चौकट

१:१४ ऐवजी १:२५ प्रमाण केल्यास अनेकांना संधी

केंद्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये १:२५ या प्रमाणात निवड केली जाते. एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा, संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब आणि क आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आदी परीक्षांसाठी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १:१४ ऐवजी १:२५ केले, तर अधिक संधी मिळू शकते.

कोट

वयोमर्यादा वाढविणे हा जसा पर्याय आहे, त्याचप्रमाणे पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी देणे त्यापेक्षा उत्तम पर्याय आहे. प्रमाणात वाढ केली तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच मानसिकता बदलेल.

- सुवर्णा पगार, परीक्षार्थी

कोट

मेहनती विद्यार्थ्यांचे केवळ काही पॉइंट्सच्या फरकामुळे वर्ष वाया जाते. मागील दोन वर्षांत पहिल्यांदाच परीक्षा होत आहे. त्यामुळे वय वाढलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता सरकारने मुख्य परीक्षेचे प्रमाण हे १:२५ करावे.

-अविनाश शेंबटवाड, परीक्षार्थी