शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात घट होऊन ते क्षेत्र सोयाबीनकडे वळलेले दिसते आहे. सोयाबीनचे क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले आहे.

सप्टेबर ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका तेलबियांनाही बसला. काही पिकाची नासाडी झाली असली तरीही क्षेत्र वाढल्यामुळे खरीपाचा हंगाम चांगला झाल्याची शेतकऱ्यांची पीक काढणीनंतर भावना झालेली दिसते. हेक्टरी किती पिक आले त्याची आकडेवारी जिल्हा कृषी विभागाकडून तयार केली जात आहे.

जिल्ह्यातील तेलबीयांचे एकूण क्षेत्र सरासरी ३८ हजार ३६७ हेक्टर आहे. खरीपाच्या हंगामात यंदा ते ४४ हजार २०४ हेक्टर झाले. एकूण ११५ टक्के पेरणी झाली. त्यातही सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनचे जिल्ह्यातील नेहमीचे क्षेत्र १७ हजार ४८२ हेक्टर आहे. यंदा ते २७ हजार ४६८ हेक्टर झाले.

भुईमूगाचे पेरणी यावर्षी ९९ टक्के झाली. १६ हजार ८९० हेक्टरवर भुईमूग पेरला गेला. पावसामुळे पेरणीस थोडा विलंब झाला होता. मात्र शेतकऱ्यांनी हंगाम साधला आहे.

तीळ, कारळे, सूर्यफूल यांचे क्षेत्र तुलनेने यंदा कमी झाले. त्यातही सूर्यफूल पेरणीला फार पसंती मिळालेली दिसत नाही. सूर्यफुलाचे क्षेत्र ३५३ हेक्टर आहे. त्यातील फक्त ३६ टक्के क्षेत्रावर म्हणजे केवळ १२७ हेक्टरवरच पेरणी झाली. तीळाचे क्षेत्र ३१२ हेक्टर आहे. त्यापैकी १९३ हेक्टरवर पेरणी झाली.

बहुसंख्य शेतकऱ्यांकडून तेलबियांचे उत्पादन घरच्यासाठी म्हणूनच केले जाते. व्यावसायिक कारणासाठी म्हणून फार कमी ठिकाणी तेलबिया केल्या जातात. अनेक ठिकाणी तेलासाठी घाणा चालवला जातो. त्यासाठीची भुईमूग घेतला जातो. सोयाबीन हे हमखास पैसे देणारे पिक म्हणून आता त्याच्या क्षेत्रात जिल्ह्यामध्ये वाढ होते आहे.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक