शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात घट होऊन ते क्षेत्र सोयाबीनकडे वळलेले दिसते आहे. सोयाबीनचे क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले आहे.

सप्टेबर ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका तेलबियांनाही बसला. काही पिकाची नासाडी झाली असली तरीही क्षेत्र वाढल्यामुळे खरीपाचा हंगाम चांगला झाल्याची शेतकऱ्यांची पीक काढणीनंतर भावना झालेली दिसते. हेक्टरी किती पिक आले त्याची आकडेवारी जिल्हा कृषी विभागाकडून तयार केली जात आहे.

जिल्ह्यातील तेलबीयांचे एकूण क्षेत्र सरासरी ३८ हजार ३६७ हेक्टर आहे. खरीपाच्या हंगामात यंदा ते ४४ हजार २०४ हेक्टर झाले. एकूण ११५ टक्के पेरणी झाली. त्यातही सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनचे जिल्ह्यातील नेहमीचे क्षेत्र १७ हजार ४८२ हेक्टर आहे. यंदा ते २७ हजार ४६८ हेक्टर झाले.

भुईमूगाचे पेरणी यावर्षी ९९ टक्के झाली. १६ हजार ८९० हेक्टरवर भुईमूग पेरला गेला. पावसामुळे पेरणीस थोडा विलंब झाला होता. मात्र शेतकऱ्यांनी हंगाम साधला आहे.

तीळ, कारळे, सूर्यफूल यांचे क्षेत्र तुलनेने यंदा कमी झाले. त्यातही सूर्यफूल पेरणीला फार पसंती मिळालेली दिसत नाही. सूर्यफुलाचे क्षेत्र ३५३ हेक्टर आहे. त्यातील फक्त ३६ टक्के क्षेत्रावर म्हणजे केवळ १२७ हेक्टरवरच पेरणी झाली. तीळाचे क्षेत्र ३१२ हेक्टर आहे. त्यापैकी १९३ हेक्टरवर पेरणी झाली.

बहुसंख्य शेतकऱ्यांकडून तेलबियांचे उत्पादन घरच्यासाठी म्हणूनच केले जाते. व्यावसायिक कारणासाठी म्हणून फार कमी ठिकाणी तेलबिया केल्या जातात. अनेक ठिकाणी तेलासाठी घाणा चालवला जातो. त्यासाठीची भुईमूग घेतला जातो. सोयाबीन हे हमखास पैसे देणारे पिक म्हणून आता त्याच्या क्षेत्रात जिल्ह्यामध्ये वाढ होते आहे.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक