शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात घट होऊन ते क्षेत्र सोयाबीनकडे वळलेले दिसते आहे. सोयाबीनचे क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले आहे.

सप्टेबर ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका तेलबियांनाही बसला. काही पिकाची नासाडी झाली असली तरीही क्षेत्र वाढल्यामुळे खरीपाचा हंगाम चांगला झाल्याची शेतकऱ्यांची पीक काढणीनंतर भावना झालेली दिसते. हेक्टरी किती पिक आले त्याची आकडेवारी जिल्हा कृषी विभागाकडून तयार केली जात आहे.

जिल्ह्यातील तेलबीयांचे एकूण क्षेत्र सरासरी ३८ हजार ३६७ हेक्टर आहे. खरीपाच्या हंगामात यंदा ते ४४ हजार २०४ हेक्टर झाले. एकूण ११५ टक्के पेरणी झाली. त्यातही सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनचे जिल्ह्यातील नेहमीचे क्षेत्र १७ हजार ४८२ हेक्टर आहे. यंदा ते २७ हजार ४६८ हेक्टर झाले.

भुईमूगाचे पेरणी यावर्षी ९९ टक्के झाली. १६ हजार ८९० हेक्टरवर भुईमूग पेरला गेला. पावसामुळे पेरणीस थोडा विलंब झाला होता. मात्र शेतकऱ्यांनी हंगाम साधला आहे.

तीळ, कारळे, सूर्यफूल यांचे क्षेत्र तुलनेने यंदा कमी झाले. त्यातही सूर्यफूल पेरणीला फार पसंती मिळालेली दिसत नाही. सूर्यफुलाचे क्षेत्र ३५३ हेक्टर आहे. त्यातील फक्त ३६ टक्के क्षेत्रावर म्हणजे केवळ १२७ हेक्टरवरच पेरणी झाली. तीळाचे क्षेत्र ३१२ हेक्टर आहे. त्यापैकी १९३ हेक्टरवर पेरणी झाली.

बहुसंख्य शेतकऱ्यांकडून तेलबियांचे उत्पादन घरच्यासाठी म्हणूनच केले जाते. व्यावसायिक कारणासाठी म्हणून फार कमी ठिकाणी तेलबिया केल्या जातात. अनेक ठिकाणी तेलासाठी घाणा चालवला जातो. त्यासाठीची भुईमूग घेतला जातो. सोयाबीन हे हमखास पैसे देणारे पिक म्हणून आता त्याच्या क्षेत्रात जिल्ह्यामध्ये वाढ होते आहे.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक