शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील तेलबीयांच्या क्षेत्रात ६ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कारळे, सूर्यफूल, तीळ यांच्या क्षेत्रात घट होऊन ते क्षेत्र सोयाबीनकडे वळलेले दिसते आहे. सोयाबीनचे क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले आहे.

सप्टेबर ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका तेलबियांनाही बसला. काही पिकाची नासाडी झाली असली तरीही क्षेत्र वाढल्यामुळे खरीपाचा हंगाम चांगला झाल्याची शेतकऱ्यांची पीक काढणीनंतर भावना झालेली दिसते. हेक्टरी किती पिक आले त्याची आकडेवारी जिल्हा कृषी विभागाकडून तयार केली जात आहे.

जिल्ह्यातील तेलबीयांचे एकूण क्षेत्र सरासरी ३८ हजार ३६७ हेक्टर आहे. खरीपाच्या हंगामात यंदा ते ४४ हजार २०४ हेक्टर झाले. एकूण ११५ टक्के पेरणी झाली. त्यातही सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीनचे जिल्ह्यातील नेहमीचे क्षेत्र १७ हजार ४८२ हेक्टर आहे. यंदा ते २७ हजार ४६८ हेक्टर झाले.

भुईमूगाचे पेरणी यावर्षी ९९ टक्के झाली. १६ हजार ८९० हेक्टरवर भुईमूग पेरला गेला. पावसामुळे पेरणीस थोडा विलंब झाला होता. मात्र शेतकऱ्यांनी हंगाम साधला आहे.

तीळ, कारळे, सूर्यफूल यांचे क्षेत्र तुलनेने यंदा कमी झाले. त्यातही सूर्यफूल पेरणीला फार पसंती मिळालेली दिसत नाही. सूर्यफुलाचे क्षेत्र ३५३ हेक्टर आहे. त्यातील फक्त ३६ टक्के क्षेत्रावर म्हणजे केवळ १२७ हेक्टरवरच पेरणी झाली. तीळाचे क्षेत्र ३१२ हेक्टर आहे. त्यापैकी १९३ हेक्टरवर पेरणी झाली.

बहुसंख्य शेतकऱ्यांकडून तेलबियांचे उत्पादन घरच्यासाठी म्हणूनच केले जाते. व्यावसायिक कारणासाठी म्हणून फार कमी ठिकाणी तेलबिया केल्या जातात. अनेक ठिकाणी तेलासाठी घाणा चालवला जातो. त्यासाठीची भुईमूग घेतला जातो. सोयाबीन हे हमखास पैसे देणारे पिक म्हणून आता त्याच्या क्षेत्रात जिल्ह्यामध्ये वाढ होते आहे.

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक