शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास बंदीने जेजुरीत गैरसोय

By admin | Updated: November 17, 2016 01:39 IST

सहकारी बँका आणि जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये १,००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनजीवनात विस्कळीतपणा आला आहे.

जेजुरी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सहकारी बँका आणि जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये १,००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनजीवनात विस्कळीतपणा आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी व कामगारांनी या निर्णयाबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य कामगार, शेतकरी, हातावर पोट असणारे विक्रेते-व्यवसायिक यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये विस्कळीतपणा आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा भरण्यासाठी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र ज्या शेतकऱ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नाही. त्यांना मर्यादित नोटा भरून (फक्त ४,५००) रक्कम स्वीकारावी लागत होती; त्यासाठी प्रचंड वेळ रांगेत उभे राहावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत ६ ते ७ हजार खातेदार असून गेल्या ८ तारखेपासून आजपर्यंत ३ ते ४ कोटी रुपये ५०० व १,००० नोटांच्या स्वरूपात भरणा झाला आहे. यामध्ये नोटा बदलून दिलेली रक्कमही आहे. मात्र १००, ५०, २०, १० व नव्याने आलेली २,००० रुपयांची उपलब्धता होईल तसे व्यवहार सुरळीत करण्यासाठी शाखा व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. गेल्या दोन दिवसांपासून बँकेमध्ये गर्दी वाढली आहे. मात्र बोटावर शाई लावण्याबाबतचेकोणतेही आदेश वरिष्ठ पातळीवरून आले नसल्याचे शाखाप्रबंधक अमित आनंद यांनी सांगितले.ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य कामगार विशेषत: शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे व्यवहार जिल्हा बँकेमध्ये असतात. त्यामुळे बहुतांश नागरिकांची दोन दिवसांपासून प्रचंड गैरसोय होत आहे. वीजबिले भरणा करताना अथवा सोसायटीकर्ज भरणा करताना अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे जिल्हा बँकेचे शाखाधिकारी प्रतापराव भुजबळ यांनी सांगितले. पतसंस्था व सहकारी बँकेमध्ये बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी सभासद आहेत. सध्या नोटाटंचाईमुळे व ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केल्याने व्यवहारांमध्ये विस्कळीतपणा आला आहे. मात्र पतसंस्थेशी निगडीत असलेल्या नागरिकांनी घाबरून जाण्यासारखे काही नाही. सहकारी बँकांना मोठ्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्यानेच नागरिकांची असुविधा होत असल्याचे व त्याचा परिणाम ग्रामीण जनजीवनावर होत असल्याचे कडेपठार पतसंस्थेचे माणिकराव झेंडे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)