शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास बंदीने जेजुरीत गैरसोय

By admin | Updated: November 17, 2016 01:39 IST

सहकारी बँका आणि जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये १,००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनजीवनात विस्कळीतपणा आला आहे.

जेजुरी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सहकारी बँका आणि जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये १,००० व ५०० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी करण्यात आल्याने ग्रामीण भागातील जनजीवनात विस्कळीतपणा आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी व कामगारांनी या निर्णयाबाबत तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे.ग्रामीण भागातील सर्वसामान्य कामगार, शेतकरी, हातावर पोट असणारे विक्रेते-व्यवसायिक यांच्या दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये विस्कळीतपणा आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ५०० व १,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा भरण्यासाठी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र ज्या शेतकऱ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये नाही. त्यांना मर्यादित नोटा भरून (फक्त ४,५००) रक्कम स्वीकारावी लागत होती; त्यासाठी प्रचंड वेळ रांगेत उभे राहावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत ६ ते ७ हजार खातेदार असून गेल्या ८ तारखेपासून आजपर्यंत ३ ते ४ कोटी रुपये ५०० व १,००० नोटांच्या स्वरूपात भरणा झाला आहे. यामध्ये नोटा बदलून दिलेली रक्कमही आहे. मात्र १००, ५०, २०, १० व नव्याने आलेली २,००० रुपयांची उपलब्धता होईल तसे व्यवहार सुरळीत करण्यासाठी शाखा व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. गेल्या दोन दिवसांपासून बँकेमध्ये गर्दी वाढली आहे. मात्र बोटावर शाई लावण्याबाबतचेकोणतेही आदेश वरिष्ठ पातळीवरून आले नसल्याचे शाखाप्रबंधक अमित आनंद यांनी सांगितले.ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य कामगार विशेषत: शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे व्यवहार जिल्हा बँकेमध्ये असतात. त्यामुळे बहुतांश नागरिकांची दोन दिवसांपासून प्रचंड गैरसोय होत आहे. वीजबिले भरणा करताना अथवा सोसायटीकर्ज भरणा करताना अडचणी निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे जिल्हा बँकेचे शाखाधिकारी प्रतापराव भुजबळ यांनी सांगितले. पतसंस्था व सहकारी बँकेमध्ये बहुतांश ग्रामीण भागातील शेतकरी सभासद आहेत. सध्या नोटाटंचाईमुळे व ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी केल्याने व्यवहारांमध्ये विस्कळीतपणा आला आहे. मात्र पतसंस्थेशी निगडीत असलेल्या नागरिकांनी घाबरून जाण्यासारखे काही नाही. सहकारी बँकांना मोठ्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातल्यानेच नागरिकांची असुविधा होत असल्याचे व त्याचा परिणाम ग्रामीण जनजीवनावर होत असल्याचे कडेपठार पतसंस्थेचे माणिकराव झेंडे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)