शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

समाविष्ट २३ गावे वंचितच

By admin | Updated: December 24, 2016 00:55 IST

चांगल्या सुविधांच्या अपेक्षेने महापालिेकत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सन २००८

पुणे : चांगल्या सुविधांच्या अपेक्षेने महापालिेकत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सन २००८ पासून रस्त्यांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही नगरसेवकांनी पाणी, वीज, पदपथ, ड्रेनेज अशा सुविधा काही परिसरासाठी केल्या आहेत, मात्र एकूण क्षेत्र व लोकसंख्या यांच्या तुलनेत त्या कमीच भासत आहेत. सर्वाधिक मोठी समस्या रस्त्यांची असून नेमके त्याकडेच पदाधिकारी व प्रशासन, बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमतातून दुर्लक्ष करण्यात येत आहे.नियमाप्रमाणे या आराखड्यात एकूण क्षेत्राच्या तुलनेत १५ टक्के रस्ते असायला हवे होते. प्रत्यक्षात आराखडा करताना ते फक्त साडेनऊ टक्के दाखविण्यात आले. राज्य सरकारने याला आक्षेप घेतला व त्यात त्वरित सुधारणा करण्यास सांगितले, मात्र आराखड्याला मंजुरी देण्यात आली. तेव्हापासून या गोष्टीकडे त्या भागातून निवडून आलेले सर्वपक्षीय नगरसेवक व प्रामुख्याने प्रशासन यांनी लक्षच दिलेले नाही. १२ मीटर रुंदीपेक्षा जास्त असलेले सुमारे ९५० किलोमीटर अंतराचे रस्ते रुंद करणे आता वाढत्या वाहनसंख्येमुळे गरजेचे झाले आहे.रस्ते अरुंद असले तरी या क्षेत्रात पालिकेच्या बांधकाम खात्याकडून परवानग्या मात्र मोठ्या संख्येने दिल्या जात आहेत. मोठ्या वसाहती, बंगले, व्यापारी इमारती यांना रस्ते, पाणी, ड्रेनेज यांची व्यवस्था आहे किंवा नाही याची तपासणी न करता किंवा बांधकाम व्यावसायिकावर या सुविधा निर्माण करणे बंधनकारक न करता सर्रासपणे परवानग्या दिल्या जात आहेत. जागांची कमतरता असल्यामुळे या सदनिका त्वरित विकल्या जातात व त्यात रहिवासी येतात. या वाढत्या लोकसंख्येचा ताण आधीच अपुऱ्या असलेल्या या भागातील नागरी सुविधांवर येत आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करून या गावांमध्ये शहरी निकषांनुसार रस्ते तर हवे आहेतच, पण दवाखाने, शाळा, उद्याने, तलाव अशा सुविधा असणेही गरजेचे आहे. त्यासाठी विकास आराखड्यात वेगवेगळ्या भूखंडांवर आरक्षणही टाकण्यात आले आहे. मात्र गावांचा हद्दीत समावेश होऊन आता ८ वर्षे पूर्ण होत आली तरीही यातील बहुसंख्य आरक्षणे अद्याप कागदावरच आहेत. त्याची अंमलबजावणीच केली जात नाही. यातही अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यातूनच या विषयाला विलंब केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)