शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

समाविष्ट २३ गावे वंचितच

By admin | Updated: December 24, 2016 00:55 IST

चांगल्या सुविधांच्या अपेक्षेने महापालिेकत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सन २००८

पुणे : चांगल्या सुविधांच्या अपेक्षेने महापालिेकत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना सन २००८ पासून रस्त्यांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही नगरसेवकांनी पाणी, वीज, पदपथ, ड्रेनेज अशा सुविधा काही परिसरासाठी केल्या आहेत, मात्र एकूण क्षेत्र व लोकसंख्या यांच्या तुलनेत त्या कमीच भासत आहेत. सर्वाधिक मोठी समस्या रस्त्यांची असून नेमके त्याकडेच पदाधिकारी व प्रशासन, बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमतातून दुर्लक्ष करण्यात येत आहे.नियमाप्रमाणे या आराखड्यात एकूण क्षेत्राच्या तुलनेत १५ टक्के रस्ते असायला हवे होते. प्रत्यक्षात आराखडा करताना ते फक्त साडेनऊ टक्के दाखविण्यात आले. राज्य सरकारने याला आक्षेप घेतला व त्यात त्वरित सुधारणा करण्यास सांगितले, मात्र आराखड्याला मंजुरी देण्यात आली. तेव्हापासून या गोष्टीकडे त्या भागातून निवडून आलेले सर्वपक्षीय नगरसेवक व प्रामुख्याने प्रशासन यांनी लक्षच दिलेले नाही. १२ मीटर रुंदीपेक्षा जास्त असलेले सुमारे ९५० किलोमीटर अंतराचे रस्ते रुंद करणे आता वाढत्या वाहनसंख्येमुळे गरजेचे झाले आहे.रस्ते अरुंद असले तरी या क्षेत्रात पालिकेच्या बांधकाम खात्याकडून परवानग्या मात्र मोठ्या संख्येने दिल्या जात आहेत. मोठ्या वसाहती, बंगले, व्यापारी इमारती यांना रस्ते, पाणी, ड्रेनेज यांची व्यवस्था आहे किंवा नाही याची तपासणी न करता किंवा बांधकाम व्यावसायिकावर या सुविधा निर्माण करणे बंधनकारक न करता सर्रासपणे परवानग्या दिल्या जात आहेत. जागांची कमतरता असल्यामुळे या सदनिका त्वरित विकल्या जातात व त्यात रहिवासी येतात. या वाढत्या लोकसंख्येचा ताण आधीच अपुऱ्या असलेल्या या भागातील नागरी सुविधांवर येत आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करून या गावांमध्ये शहरी निकषांनुसार रस्ते तर हवे आहेतच, पण दवाखाने, शाळा, उद्याने, तलाव अशा सुविधा असणेही गरजेचे आहे. त्यासाठी विकास आराखड्यात वेगवेगळ्या भूखंडांवर आरक्षणही टाकण्यात आले आहे. मात्र गावांचा हद्दीत समावेश होऊन आता ८ वर्षे पूर्ण होत आली तरीही यातील बहुसंख्य आरक्षणे अद्याप कागदावरच आहेत. त्याची अंमलबजावणीच केली जात नाही. यातही अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यातूनच या विषयाला विलंब केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)