शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

दौंडमधील उर्वरित गावांचा पीएमआरडीएमध्ये समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST

खोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण योजनेच्या आराखड्यात दौंड तालुक्यातील समाविष्ट नसलेल्या उर्वरित गावांनाही प्राधिकरणात समाविष्ट करा, अशी ...

खोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण योजनेच्या आराखड्यात दौंड तालुक्यातील समाविष्ट नसलेल्या उर्वरित गावांनाही प्राधिकरणात समाविष्ट करा, अशी मागणी पुढे येत आहे. दौंड तालुक्यातील जवळपास ५१ महसुली गावांचा या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.

ज्या गावांना या योजनेची गरज आहे तीच गावे सध्या या योजनेपासून वंचित राहिली आहेत. पुण्यापासून पुणे-सोलापूर रस्त्याच्या डावीकडून उत्तर भागातील गावांचा या योजनेच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे. महसुली ५१ गावांमधील ही बागायती भागातील गावे त्यामध्ये येत आहेत. मात्र, दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर रोडच्या दक्षिण भागातील दुष्काळी पट्ट्यातील गावे या योजनेच्या आराखड्यातून वगळली गेली आहेत.

यामध्ये खोर, देऊळगावगाडा, कुसेगाव, पडवी ही गावे या पीएमआरडी योजनेच्या आराखड्यात येत नाहीत. या गावांना या पीएमआरडी योजनेचा फायदा सर्वांत मोठा असून, या भागातील गावांचा जर या योजनेच्या आराखड्यात समाविष्ट केला गेला, तर या दुष्काळी गावांचा कायापालट होऊन शासकीय योजनेचा लाभ घेता येईल हेही तितकेच खरे आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यामध्ये लक्ष घालून दौंड तालुक्यातील राहिलेल्या उर्वरित दक्षिण भागातील गावांचा या पीएमआरडी योजनेत समाविष्ट करण्याच्या बाबतीत पाठपुरावा करण्याची मागणी पुढे आली आहे.

शासकीय योजनेच्या आराखड्यात ५१ गावे ही पश्चिम भागातील असून, या योजनेचे क्षेत्रीय कार्यालय यवत या ठिकाणी व्हावे अशी मागणी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार जर दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील गावांचा या योजनेत समाविष्ट केला गेला, तर भविष्यात यवत हे जर क्षेत्रीय कार्यालय जर झाले तर ही समाविष्ट नसलेले गावे या योजनेत घेतली गेली तर मध्यवर्ती होणारे यवत क्षेत्रीय कार्यालयापासून अगदी जवळ ही गावे आहेत. याबाबत माहिती देताना देऊळगावगाडा चे माजी सरपंच डी. डी. बारवकर म्हणाले की, देऊळगावगाडा ग्रामपंचायतच्या पूर्वेच्या शिवेवरती वरवंड या गावाचा पीएमआरडी समाविष्ट केलेला आहे. मग देऊळगावगाडा या गावाचा समाविष्ट होणे अनिवार्य आहे. या गावाच्या हद्दीत श्री क्षेत्र सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान बेट असून, या ट्रस्ट विकासाच्या दृष्टिकोनातून ही गावे समाविष्ट करणे महत्वपूर्ण आहे.

--

चौकट

दौंड तालुक्यातील दक्षिणपट्टा हा दुष्काळी छायेत येत असून या गावांचा पीएमआरडीएमध्ये समावेश होणे गरजेचे आहे. भविष्यात क्षेत्रीय कार्यालय यवत येथे झाले तर खोर हे गाव हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदने दिले असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

नितीन दोरगे, सदस्य, पंचायत समिती दौंड