शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

दौंडमधील उर्वरित गावांचा पीएमआरडीएमध्ये समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST

खोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण योजनेच्या आराखड्यात दौंड तालुक्यातील समाविष्ट नसलेल्या उर्वरित गावांनाही प्राधिकरणात समाविष्ट करा, अशी ...

खोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण योजनेच्या आराखड्यात दौंड तालुक्यातील समाविष्ट नसलेल्या उर्वरित गावांनाही प्राधिकरणात समाविष्ट करा, अशी मागणी पुढे येत आहे. दौंड तालुक्यातील जवळपास ५१ महसुली गावांचा या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे.

ज्या गावांना या योजनेची गरज आहे तीच गावे सध्या या योजनेपासून वंचित राहिली आहेत. पुण्यापासून पुणे-सोलापूर रस्त्याच्या डावीकडून उत्तर भागातील गावांचा या योजनेच्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे. महसुली ५१ गावांमधील ही बागायती भागातील गावे त्यामध्ये येत आहेत. मात्र, दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर रोडच्या दक्षिण भागातील दुष्काळी पट्ट्यातील गावे या योजनेच्या आराखड्यातून वगळली गेली आहेत.

यामध्ये खोर, देऊळगावगाडा, कुसेगाव, पडवी ही गावे या पीएमआरडी योजनेच्या आराखड्यात येत नाहीत. या गावांना या पीएमआरडी योजनेचा फायदा सर्वांत मोठा असून, या भागातील गावांचा जर या योजनेच्या आराखड्यात समाविष्ट केला गेला, तर या दुष्काळी गावांचा कायापालट होऊन शासकीय योजनेचा लाभ घेता येईल हेही तितकेच खरे आहे. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यामध्ये लक्ष घालून दौंड तालुक्यातील राहिलेल्या उर्वरित दक्षिण भागातील गावांचा या पीएमआरडी योजनेत समाविष्ट करण्याच्या बाबतीत पाठपुरावा करण्याची मागणी पुढे आली आहे.

शासकीय योजनेच्या आराखड्यात ५१ गावे ही पश्चिम भागातील असून, या योजनेचे क्षेत्रीय कार्यालय यवत या ठिकाणी व्हावे अशी मागणी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार जर दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील गावांचा या योजनेत समाविष्ट केला गेला, तर भविष्यात यवत हे जर क्षेत्रीय कार्यालय जर झाले तर ही समाविष्ट नसलेले गावे या योजनेत घेतली गेली तर मध्यवर्ती होणारे यवत क्षेत्रीय कार्यालयापासून अगदी जवळ ही गावे आहेत. याबाबत माहिती देताना देऊळगावगाडा चे माजी सरपंच डी. डी. बारवकर म्हणाले की, देऊळगावगाडा ग्रामपंचायतच्या पूर्वेच्या शिवेवरती वरवंड या गावाचा पीएमआरडी समाविष्ट केलेला आहे. मग देऊळगावगाडा या गावाचा समाविष्ट होणे अनिवार्य आहे. या गावाच्या हद्दीत श्री क्षेत्र सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान बेट असून, या ट्रस्ट विकासाच्या दृष्टिकोनातून ही गावे समाविष्ट करणे महत्वपूर्ण आहे.

--

चौकट

दौंड तालुक्यातील दक्षिणपट्टा हा दुष्काळी छायेत येत असून या गावांचा पीएमआरडीएमध्ये समावेश होणे गरजेचे आहे. भविष्यात क्षेत्रीय कार्यालय यवत येथे झाले तर खोर हे गाव हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदने दिले असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

नितीन दोरगे, सदस्य, पंचायत समिती दौंड