शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भटक्या विमुक्तांचा समावेश अनुसूचित जातीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “ इंग्रज सत्तेत होते तेव्हापासून आजपर्यंत भटका विमुक्त समाज दुर्लक्षित आहे. या समाजाच्या विकासासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “ इंग्रज सत्तेत होते तेव्हापासून आजपर्यंत भटका विमुक्त समाज दुर्लक्षित आहे. या समाजाच्या विकासासाठी शासनाकडे पुरेसा निधी नाही. या समाजाला पुढे आणायचे असेल तर त्यांचा समावेश ‘आदिवासी’ म्हणून अनुसूचित जमातीत करून न्याय मिळवून दिला पाहिजे,” असे मत ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले.

राष्ट्र सेवा दल आयोजित दलदिन मेळाव्यात ते मंगळवारी (दि. २९) बोलत होते. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी, संपत कांबळे, वृंदा हजारे, ज्योती भिलारे, मंगला कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

माने म्हणाले की, पूर्वी चोऱ्यामाऱ्या करणारा हा समाज आज रस्त्यावर फुलं विकून आपली गुजराण करत आहे. मात्र आरक्षणात आणि शिक्षणात भटक्या विमुक्त समाजातील मुलांना एक टक्कासुद्धा लाभ मिळत नाही. पुरेशा सुविधा नाहीत. त्यांच्यासाठी असलेल्या सुविधांवर दुसरेच चलाखीने डल्ला मारत आहेत. या समाजाची ताकद कमी असल्याने शासन कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. संवेदनशील भारतीय नागरिक व सेवादलासारख्या समविचारी संघटनांनी एकत्र येऊन आमच्या या हक्काच्या लढ्याला साथ दिली पाहिजे.

भगवान कोकणे, प्रकाश कदम, दत्ता पाकीरे, रमेश शिंदे, राजेंद्र सासवडे, उमाकांत भावसार, सलीम शेख यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. मगन ताटे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा ताटे यांनी आभार मानले.