शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गावातून कोरोना हद्दपार केल्यास देणार प्रोत्साहन भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गावात कोरोनाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने गावातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. गावातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी केल्यास, गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना व जनजागृती केल्यास गावातील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

जिल्ह्यात कोविड रुग्ण प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच सध्या ऑक्सिजन बेड्ससह रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी पडू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गावात आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी गाव पातळीवरील घरोघरी जाऊन तापसणी करणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, कोविड रुग्ण सापडला तर तातडीने कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करणे, कोविड रुग्णांची नोंद ठेवणे आदी उपाययोजना करतात. सदर कामामध्ये साथरोग व मृत्यूदर शून्य होणे तसेच जनजागृती व कोविड-१९ साथरोग प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी व यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना आखली आहे.

...तर प्रत्येक कर्मचाऱ्यास २ हजार रुपये भत्ता

गावात कोणत्याही संक्रमक रोगाचा उद्रेक, फैलाव किंवा पुनर्उदभव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी २३ एप्रिल ते ७ मे या पंधरा दिवसांत गावात ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाल्यास व कोरोनामुळे एकही मृत्यू न झाल्यास प्रत्येक कर्मचाऱ्यास २ हजार रुपये भत्ता, पंधरा दिवसांत गावात कोरोना रुग्णांची संख्या ६० ते ८० टक्क्यांनी कमी केल्यास व एकही कोविड रुग्णांचा मृत्यू न झाल्यास प्रत्येकी १५०० रुपये आणि गावात कोविड रुग्णांची संख्या ४० ते ६० टक्क्यांनी कमी केल्यास प्रत्येकी एक हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देणार आहे. गावात जीव धोक्यात घालून जनजागृतीचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा कामास दाद देणे आणि गावातील कोविडचा प्रादुर्भाव कमी करणे दोन्ही उद्देश असल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले.