शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

गावातून कोरोना हद्दपार केल्यास देणार प्रोत्साहन भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गावात कोरोनाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने गावातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. गावातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी केल्यास, गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना व जनजागृती केल्यास गावातील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

जिल्ह्यात कोविड रुग्ण प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच सध्या ऑक्सिजन बेड्ससह रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी पडू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गावात आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी गाव पातळीवरील घरोघरी जाऊन तापसणी करणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, कोविड रुग्ण सापडला तर तातडीने कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करणे, कोविड रुग्णांची नोंद ठेवणे आदी उपाययोजना करतात. सदर कामामध्ये साथरोग व मृत्यूदर शून्य होणे तसेच जनजागृती व कोविड-१९ साथरोग प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी व यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना आखली आहे.

...तर प्रत्येक कर्मचाऱ्यास २ हजार रुपये भत्ता

गावात कोणत्याही संक्रमक रोगाचा उद्रेक, फैलाव किंवा पुनर्उदभव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी २३ एप्रिल ते ७ मे या पंधरा दिवसांत गावात ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाल्यास व कोरोनामुळे एकही मृत्यू न झाल्यास प्रत्येक कर्मचाऱ्यास २ हजार रुपये भत्ता, पंधरा दिवसांत गावात कोरोना रुग्णांची संख्या ६० ते ८० टक्क्यांनी कमी केल्यास व एकही कोविड रुग्णांचा मृत्यू न झाल्यास प्रत्येकी १५०० रुपये आणि गावात कोविड रुग्णांची संख्या ४० ते ६० टक्क्यांनी कमी केल्यास प्रत्येकी एक हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देणार आहे. गावात जीव धोक्यात घालून जनजागृतीचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा कामास दाद देणे आणि गावातील कोविडचा प्रादुर्भाव कमी करणे दोन्ही उद्देश असल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले.