शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अग्निशमनची गाडी नसतानाच केंद्राचे उद्घाटन

By admin | Updated: January 4, 2017 05:30 IST

कोंढवा अग्निशमन केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या केंद्रासाठी फायर गाडी तसेच मनुष्यबळच उपलब्ध

पुणे : कोंढवा अग्निशमन केंद्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या केंद्रासाठी फायर गाडी तसेच मनुष्यबळच उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्राचे उद्घाटन हा केवळ दिखावा ठरला असल्याची जोरदार टीका मंगळवारी नगरसेवकांनी मुख्य सभेत केली.कोंढवा येथील अग्निशमन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतर या केंद्राला गाडी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. त्यानंतर ६ दिवसांनी तिथल्या एका बेकरीला आग लागून ६ कामगारांचा मृत्यू झाला. या केंद्रामध्ये गाडी उपलब्ध असती तर ही घटना टाळता आली असती. पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसताना उद्घाटनाची घाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी मुख्य सभेत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली.मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले, ‘‘अग्निशमन दलाकडे मनुष्यबळ कमी असून, कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.’’प्रशासनाच्या खुलाशानंतर नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. जर नवीन केंद्र सुरू करण्यासाठी मनुष्यबळ व फायर गाडी उपलब्ध नव्हती तर कोंढवा येथील केंद्राचे उद्घाटन करून दिखावा करण्याचा घाट का घालण्यात आला? अग्निशमन केंद्रासाठी कोणतीही मान्यता घेण्यात आली नसताना मुख्यमंत्री उद्घाटनासाठी का आले? यासाठी कोणाकडून घाई करण्यात आली? अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले, ‘‘कोंढव्यातील जागा अग्निशमन केंद्रासाठी राखीव असल्याने पालिकेच्या वतीने ताब्यात घेण्यात आली. पक्षनेत्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.’’ (प्रतिनिधी)