शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

गुणांत तफावत असल्यास सुधारणा करा

By admin | Updated: March 20, 2017 04:32 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून वेगवेगळ्या पॅनलमार्फत घेतल्या

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून वेगवेगळ्या पॅनलमार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीमध्ये उमेदवारांना देण्यात येणाऱ्या गुणांत मोठी तफावत दिसते. या प्रक्रियेमध्ये सुधारणा व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्यास आयोगाने त्याचा विचार करायला हवा, असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केले. ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’तर्फे आयोजित राज्य सेवा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.याप्रसंगी युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, सनदी अधिकारी नरेंद्र कुलकर्णी, मनोहर भोळे, नागेश गव्हाणे यांच्यासह अ‍ॅकॅडमीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारीपासून ते कक्षाधिकारी पद मिळालेल्या गुणवंतांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी गणेश कला क्रीडा मंच येथे मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमात ‘महाराष्ट्र वार्षिकी २0१७’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यात प्रथम आलेल्या भूषण अहिरे, पूनम पाटील यांच्यासह इतर यशस्वी उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले.ठाकरे म्हणाले, एमपीएससी परीक्षेत कोणत्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले, हे कुणालाच माहिती नसते. यूपीएससी व सेना दलात तुम्हाला किती गुण मिळाले, त्यापेक्षा मुलाखतीला तुम्ही कशा प्रकारे सामोरे गेलात, त्यावरून गुण निश्चित केले जातात. त्याचप्रमाणे एमपीएससीमध्ये पद्धत आहे. परंतु, तहसीलदार म्हणून निवड झालेल्या श्रीकांत निळे या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतात मुलाखतीत पॅनेलकडून दिल्या जाणाऱ्या गुणपद्धतीवर शंका उपस्थित केली. मुलाखतीत एका पॅनलकडून ३0, २७ गुण दिले जातात, तर अन्य एका पॅनलकडून ६0 अथवा ७0 गुण दिले जातात. यात सुधारणा झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुलाखतीच्या प्रक्रियेत सुधारणा व्हावी, अशी उमेदवारांची मागणी असल्यास त्याचा विचार झाला पाहिजे. एमपीएससीमध्ये पास व नापास ही संकल्पना नाही, असे नमूद करून ठाकरे म्हणाले, की गेल्या काही वर्षांत एमपीएससीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. एमपीएससीच्या यंत्रणेत सर्वत्र पारदर्शकता आणली आहे. एमपीएसीच्या पारदर्शी यंत्रणेमुळे प्रतिकूल परिस्थितीत असणारे विद्यार्थी अधिकारी होत आहेत. त्याचप्रमाणे महिलाही अधिकारी होण्यात आघाडीवर आहेत.मनोहर भोळे म्हणाले, कठोर परिश्रम व अडचणीवर मात करून स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रवेशाचे द्वार खुले होते. राज्यात पहिला आलेला भूषण अहिरे याचा उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून दिले. राज्य सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या एकूण १३0 उमेदवारांमध्ये युनिक अ‍ॅकॅडमीच्या ८२ विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून निवड झाली आहे.तुकाराम जाधव म्हणाले, स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळू शकते, हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अ‍ॅकॅडमीतर्फे केला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा कौतुक सोहळा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकते. (प्रतिनिधी)