शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अंदाजपत्रकाचे महत्त्व अंमलबजावणीत

By admin | Updated: May 23, 2017 05:36 IST

पुणे महापालिकेचा तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर करण्यात आला. आता पुण्यातील आगामी वर्षभराचे सर्व कामकाज

पुणे महापालिकेचा तब्बल ५ हजार ९१२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प नुकताच मंजूर करण्यात आला. आता पुण्यातील आगामी वर्षभराचे सर्व कामकाज या अंदाजपत्रकानुसार चालेल. त्यामुळेच समस्त पुणेकरांसाठी ते महत्त्वाचे आहे. या अंदाजपत्रकावर महापालिका सभागृहात अनेक नगरसेवकांनी आपले मत व्यक्त केले. त्यातील काही ज्येष्ठ नगरसेवकांचे विचार ‘लोकमत’च्या वाचकांसाठी. स्थायी समिती अध्यक्ष तरुण आहेत, उत्साही आहेत. चांगला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला, पण त्यात काही त्रुटीही आहेत. स्थायी समितीचा माजी अध्यक्ष म्हणून त्या लक्षात आणून देणे माझे कर्तव्य आहे. १ हजार ८९ कोटी ६९ लाख रुपयांच्या ६९ योजना त्यांनी जाहीर केल्या आहेत. त्या झाल्या तर चांगलेच आहे, पण होतील कशा? असा प्रश्न आहे. यातील अनेक योजनांवर आर्थिक तरतूदच केलेली नाही. काहींवर केली ती अत्यंत तटपुंजी आहे.असाच प्रकार कुंडलिका नदीतून पुण्यासाठी पाणी आणण्याचा आहे. योजना चांगली आहे, देशात सगळीकडे त्यांचेच सरकार आहे. पूर्ण होऊ शकते, मात्र तरतूद अपुरी आहे. ही नदी उगम पावते मुळशी तालुक्यात निव्हे व ताम्हिणी या गावांजवळ. रायगड जिल्ह्यातील पाटनूजपर्यंत ती जाते. त्या जवळचा परिसर कुंडलिका व्हॅली म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुळशीमधून पाणी आणण्याचा यशस्वी प्रयोग केला होता त्याची यानिमित्ताने आठवण होते.ई-लर्निंग स्कूल योजना त्यांनी मांडली आहे. अनेक प्रभागांमध्ये या स्कूलसाठी इमारत बांधण्याची गरज आहे. या इमारती बांधण्यासाठी निधी ठेवणे आवश्यक होते. इमारतीच नसतील तर मग ई-लर्निंग स्कूल कसे सुरू करणार. त्यासाठीही त्यांनी मोठी तरतूद करायला हवी होती. तशी केलेली दिसत नाही.स्मार्ट सिटीमध्ये बाणेर- बालेवाडीच्या परिसराची निवड झाली हे मी तिथे माझ्या कार्यकाळात केलेल्या रस्ते, पूल, एचटीपी प्लांट, गणपती विसर्जन घाट अशा विविध कामांचेच यश आहे. युवा राष्ट्रकुल स्पर्धांमधून काही निधी मिळाला, काही मी स्थायी समिती अध्यक्ष झाल्यावर मिळाला, त्यातून ही कामे झाली. पण बाणेर-बालेवाडीचा फक्त १५ टक्के भागच स्मार्ट सिटीत आहे. ८५ टक्के भाग महापालिकेतच आहे, त्यासाठी त्यांनी पुरेसा निधी द्यायला हवा.सनसिटी रस्ता ते सिंहगड रस्ता या मार्गावरची वाहतूककोंडी सोडवायला तिथे उड्डाणपूल हवा आहे. मी विधानसभेची निवडणूक लढवली आहे, ती गरज मला माहिती आहे, पण अध्यक्षांनी त्यासाठी फक्त २ कोटी रुपयांची तरतूद केली. या भागात येणाऱ्या २ प्रभागांमध्ये एकूण ८ नगरसेवक आहेत. त्यातील ७ सत्ताधारी भाजपाचे आहे. त्यांना जास्त निधी मिळाला आहे. त्यांनी आपल्या निधीतील प्रत्येकी १ कोटी रुपये वर्ग करून द्यावेत अशी माझी सूचना आहे. त्यातून किमान या पुलाचे काम सुरू तरी होईल. महापालिका हद्दीत येणाऱ्या ३४ गावांसाठी त्यांनी शून्य निधी ठेवला आहे ही मोठी चूक आहे असे मला वाटते. माझ्या वेळी असाच प्रश्न होता, मी ही गावे येतील असे गृहीत धरून त्यासाठी तब्बल ४२ कोटी ६८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. विषय लांबल्यामुळे ती नंतर वर्ग करून इतर कामांसाठी वापरण्यात आली, मात्र आता सरकारनेही सकारात्मक भूमिका घेतली आहे. ३४ गावांमधील १९ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका होत्या. त्यातील १५ गावांनी या निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार घातला यावरून तेथील जनमत महापालिकेत येण्यास उत्सुक आहे हे दिसते आहे. खुद्द भाजपाचेच ३ आमदार त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ४ मे रोजी सरकारने यावर न्यायालयात लेखी दिले. त्यानंतर अंदाजपत्रक तयार केले गेले. त्यामुळे या गावांसाठी अंदाजपत्रकात किमान प्राथमिक तरतूद तरी करणे शक्य होते. ती का केली गेली नाही हे समजत नाही.