शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

यवतच्या सरपंचांवर तोतयागिरीचा गुन्हा

By admin | Updated: January 25, 2016 00:58 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्यानंतरही ग्रामपंचायतीच्या कामकाजात सह्यांचा वापर केल्याने सरपंच रजिया अजमुद्दीन तांबोळी यांच्यावर तोतयागिरी केल्याचा गुन्हा यवत पोलिसांनी दाखल केला आहे.

यवत : जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्यानंतरही ग्रामपंचायतीच्या कामकाजात सह्यांचा वापर केल्याने सरपंच रजिया अजमुद्दीन तांबोळी यांच्यावर तोतयागिरी केल्याचा गुन्हा यवत पोलिसांनी दाखल केला आहे.याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्या मनीषा सचिन बधे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : यवत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर असलेल्या रजिया तांबोळी यांना अपर जिल्हाधिकारी यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे कारणावरून अपात्र ठरविले होते. त्यांच्याविरोधात गावातील रोहन कैलास दोरगे व अशोक जांबले यांनी २५ आॅगस्ट २०१५ रोजी सरकारी जागेवर अतिक्रमण असल्याचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता.या प्रकरणात सुनावणी होऊन दि. २३ डिसेंबर २०१५ रोजी अपर जिल्हाधिकारी यांनी यवत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संपत वाबळे यांना सरपंच रजिया तांबोळी यांना पदावरून अपात्र ठरविण्यात आल्याबाबतचे पत्र पारित केले होते, तर या पत्राची प्रत सरपंच रजिया तांबोळी यांना दि. २४ डिसेंबर २०१५ रोजी आदा करण्यात आली होती. तरीही त्यांनी सह्यांचे अधिकार वापरून ग्रामपंचायत कारभार सुरू ठेवला होता. दि. १४ जानेवारी २०१६ रोजी ग्रामपंचायतीच्या सभेचे सूचनापत्र रजिया तांबोळी यांनी त्यांच्या व ग्रामविकास अधिकारी यांच्या सहीनिशी पाठवले होते.मनीषा बधे यांनी तक्रार दिल्यानंतर भा.द.वि. कलम १७0 अन्वये तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. एस. वाघ करीत आहेत. (वार्ताहार)