शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

ऑनलाइन शिक्षणाने लेखनाच्या गतीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST

शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होते. विद्यार्थी वर्गात शिक्षकांनी दिलेला अभ्यास शाळेतच किंवा घरी पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचा लेखनाचा ...

शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होते. विद्यार्थी वर्गात शिक्षकांनी दिलेला अभ्यास शाळेतच किंवा घरी पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचा लेखनाचा सराव होतो. परंतु, कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी घरी आहेत. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांकडून गृहपाठ पूर्ण करून घेण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. एकूणच विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. काही पालक विद्यार्थ्यांकडून नियमितपणे अभ्यास करून घेतात. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होत आहे. परंतु, काही ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याचा अभ्यास करून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या गतीवर परिणाम झाला आहे.

------------

कोरोनामुळे विद्यार्थी वर्षभरापासून घरी आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनावर परिणाम झाला.त्यामुळेच मुख्याध्यापक व प्राध्यापक संघटनेने राज्य मंडळाकडे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून द्यावा, अशी मागणी केली . विद्यार्थ्यांच्या लेखनाला गती नसल्यामुळे मंडळाने अर्धा तास वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

- हनुमंत कुबडे, अध्यक्ष,मराठी अध्यापक संघ

-------------

सरावाने स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर काढता येते. एकदा हस्ताक्षर स्थिरावले की त्यात बदल होत नाही. त्यामुळे कोरोना काळात जरी लेखनाचा सराव कमी झाला असला तरी सर्वच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरावर त्याचा परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांनी सतत लेखनाचा सराव करावा.

- अनिल गोरे, मराठी भाषा अभ्यासक

---------------------

विद्यार्थी घरात बसून ऑनलाइन शिक्षणाला कंटाळले आहेत. शिक्षकांकडून त्यांना मर्यादित लेखन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या गतीवर परिणाम झाला आहे. शिक्षकांनी ही बाब गंभीरपणे घ्यायला हवी.

- सुवर्णा सूर्यवंशी, पालक

------------------

विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. घरात बसून अभ्यास करा, असे सांगूनही मुलं ऐकत नाहीत. ऑनलाइन शिक्षणाने कानावर काही चांगल्या गोष्टी पडत असल्या तरी विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित होण्यास मर्यादा येत आहेत.

- मनोज केदारे, पालक