शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षणाने लेखनाच्या गतीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST

शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होते. विद्यार्थी वर्गात शिक्षकांनी दिलेला अभ्यास शाळेतच किंवा घरी पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचा लेखनाचा ...

शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होते. विद्यार्थी वर्गात शिक्षकांनी दिलेला अभ्यास शाळेतच किंवा घरी पूर्ण करतात. त्यामुळे त्यांचा लेखनाचा सराव होतो. परंतु, कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी घरी आहेत. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांकडून गृहपाठ पूर्ण करून घेण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. एकूणच विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. काही पालक विद्यार्थ्यांकडून नियमितपणे अभ्यास करून घेतात. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होत आहे. परंतु, काही ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील मुलांच्या पालकांना आपल्या पाल्याचा अभ्यास करून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या गतीवर परिणाम झाला आहे.

------------

कोरोनामुळे विद्यार्थी वर्षभरापासून घरी आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनावर परिणाम झाला.त्यामुळेच मुख्याध्यापक व प्राध्यापक संघटनेने राज्य मंडळाकडे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून द्यावा, अशी मागणी केली . विद्यार्थ्यांच्या लेखनाला गती नसल्यामुळे मंडळाने अर्धा तास वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

- हनुमंत कुबडे, अध्यक्ष,मराठी अध्यापक संघ

-------------

सरावाने स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर काढता येते. एकदा हस्ताक्षर स्थिरावले की त्यात बदल होत नाही. त्यामुळे कोरोना काळात जरी लेखनाचा सराव कमी झाला असला तरी सर्वच विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरावर त्याचा परिणाम होणार नाही. विद्यार्थ्यांनी सतत लेखनाचा सराव करावा.

- अनिल गोरे, मराठी भाषा अभ्यासक

---------------------

विद्यार्थी घरात बसून ऑनलाइन शिक्षणाला कंटाळले आहेत. शिक्षकांकडून त्यांना मर्यादित लेखन दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या गतीवर परिणाम झाला आहे. शिक्षकांनी ही बाब गंभीरपणे घ्यायला हवी.

- सुवर्णा सूर्यवंशी, पालक

------------------

विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. घरात बसून अभ्यास करा, असे सांगूनही मुलं ऐकत नाहीत. ऑनलाइन शिक्षणाने कानावर काही चांगल्या गोष्टी पडत असल्या तरी विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित होण्यास मर्यादा येत आहेत.

- मनोज केदारे, पालक