शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

कचरा आढळल्यास तत्काळ कळवा, शिरूर नगर परिषदेचा उपक्रम, स्वच्छता अभियानाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:42 IST

शिरूर : कचरा आढळल्यास नगर परिषदेस कळवा. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात स्वच्छता अभियानाला गती मिळाली आहे. शहरातील विविध भागांतून येणा-या कचरा समस्येचे तत्काळ निवारण केले जात असून, स्वच्छता अभियानाच्या पूर्ण यशासाठी सोशल मीडियावर नगर परिषदेनेच प्रतिष्ठित नागरिक नगर परिषद कर्मचारी व नगरसेवकांचा ग्रुप तयार केला आहे.

शिरूर : कचरा आढळल्यास नगर परिषदेस कळवा. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात स्वच्छता अभियानाला गती मिळाली आहे. शहरातील विविध भागांतून येणा-या कचरा समस्येचे तत्काळ निवारण केले जात असून, स्वच्छता अभियानाच्या पूर्ण यशासाठी सोशल मीडियावर नगर परिषदेनेच प्रतिष्ठित नागरिक नगर परिषद कर्मचारी व नगरसेवकांचा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर कच-याचे फोटो टाकले जात असून, त्याचा निपटारा केल्याचे फोटोही कर्मचारी टाकताना दिसत आहेत.‘स्वच्छता हीच सेवा’ या संकल्पनेंतर्गत १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिरूर नगर परिषदेने यात पूर्ण पारदर्शकता ठेवत शहरातील सत्ताधारी, विरोधक, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक यांना या मोहिमेत सामावून घेतले. सोशल मीडियावर (व्हॉट्स अ‍ॅप) या सर्व घटकांचा एक ग्रुप तयार केला. यात सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, स्वच्छता सभापती सचिन धारिवाल व मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी शहरात कुठे कचरा आढळल्यास तत्काळ त्याचा फोटो गु्रपवर टाकण्याचे आवाहन केले. याव्यतिरिक्त आरोग्य निरीक्षक डी. टी. बर्गे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता पथक तयार करून शहरातील सर्व भाग स्वच्छतेसाठी पिंजून काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. याचा प्रचंड सकारात्मक परिणाम जाणवला. ग्रुपवर शहरातील काही भागांतील कचरा असलेले फोटो टाकण्यात आले. त्याचा त्वरित निपटारा करण्यात येऊन कर्मचा-यांनीच तो कचरा उचलल्याचे, परिसर स्वच्छ केल्याचे फोटोही टाकले. गेली चार दिवसांपासून अशा प्रकारे अभियानाला गती प्राप्त झाली असून, अशा पद्धतीने नगर परिषद व नागरिकांमध्ये समन्वय राहिल्यास शहर कचरामुक्त होण्यास वेळ लागणार नाही असे दिसते.>तत्काळ दखल : कच-याचे वर्गीकरणग्रुपमुळे शहरातील कानाकोप-यात असणा-या कच-याची माहिती उपलब्ध होत असून, त्याच्यावर तत्काळ कार्यवाही होतानाचे चित्र आहे. वास्तविक शहरात स्वच्छतेच्या कायमस्वरूपी नियोजनासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा उचलण्यासाठी नागरिकांना दोन डस्टबिन मोफत वाटप करण्यात आले आहे. या डस्टबिनमध्ये एकात ओला व दुसºयात सुका कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात आले. घंटागाड्यांतही ओला व सुका कचºयासाठी स्वतंत्र जागा करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक घंटागाड्यांची वाट न पाहता दिसेल तिथे कचरा टाकताना दिसतात. अनेक नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करत नाहीत. नगर परिषदेने जर नागरिकांना सामावून घेऊन स्वच्छता अभियानाला गती दिली असेल तर नागरिकांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.