शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

कचरा आढळल्यास तत्काळ कळवा, शिरूर नगर परिषदेचा उपक्रम, स्वच्छता अभियानाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:42 IST

शिरूर : कचरा आढळल्यास नगर परिषदेस कळवा. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात स्वच्छता अभियानाला गती मिळाली आहे. शहरातील विविध भागांतून येणा-या कचरा समस्येचे तत्काळ निवारण केले जात असून, स्वच्छता अभियानाच्या पूर्ण यशासाठी सोशल मीडियावर नगर परिषदेनेच प्रतिष्ठित नागरिक नगर परिषद कर्मचारी व नगरसेवकांचा ग्रुप तयार केला आहे.

शिरूर : कचरा आढळल्यास नगर परिषदेस कळवा. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात स्वच्छता अभियानाला गती मिळाली आहे. शहरातील विविध भागांतून येणा-या कचरा समस्येचे तत्काळ निवारण केले जात असून, स्वच्छता अभियानाच्या पूर्ण यशासाठी सोशल मीडियावर नगर परिषदेनेच प्रतिष्ठित नागरिक नगर परिषद कर्मचारी व नगरसेवकांचा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर कच-याचे फोटो टाकले जात असून, त्याचा निपटारा केल्याचे फोटोही कर्मचारी टाकताना दिसत आहेत.‘स्वच्छता हीच सेवा’ या संकल्पनेंतर्गत १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिरूर नगर परिषदेने यात पूर्ण पारदर्शकता ठेवत शहरातील सत्ताधारी, विरोधक, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक यांना या मोहिमेत सामावून घेतले. सोशल मीडियावर (व्हॉट्स अ‍ॅप) या सर्व घटकांचा एक ग्रुप तयार केला. यात सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, स्वच्छता सभापती सचिन धारिवाल व मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी शहरात कुठे कचरा आढळल्यास तत्काळ त्याचा फोटो गु्रपवर टाकण्याचे आवाहन केले. याव्यतिरिक्त आरोग्य निरीक्षक डी. टी. बर्गे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता पथक तयार करून शहरातील सर्व भाग स्वच्छतेसाठी पिंजून काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. याचा प्रचंड सकारात्मक परिणाम जाणवला. ग्रुपवर शहरातील काही भागांतील कचरा असलेले फोटो टाकण्यात आले. त्याचा त्वरित निपटारा करण्यात येऊन कर्मचा-यांनीच तो कचरा उचलल्याचे, परिसर स्वच्छ केल्याचे फोटोही टाकले. गेली चार दिवसांपासून अशा प्रकारे अभियानाला गती प्राप्त झाली असून, अशा पद्धतीने नगर परिषद व नागरिकांमध्ये समन्वय राहिल्यास शहर कचरामुक्त होण्यास वेळ लागणार नाही असे दिसते.>तत्काळ दखल : कच-याचे वर्गीकरणग्रुपमुळे शहरातील कानाकोप-यात असणा-या कच-याची माहिती उपलब्ध होत असून, त्याच्यावर तत्काळ कार्यवाही होतानाचे चित्र आहे. वास्तविक शहरात स्वच्छतेच्या कायमस्वरूपी नियोजनासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा उचलण्यासाठी नागरिकांना दोन डस्टबिन मोफत वाटप करण्यात आले आहे. या डस्टबिनमध्ये एकात ओला व दुसºयात सुका कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात आले. घंटागाड्यांतही ओला व सुका कचºयासाठी स्वतंत्र जागा करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक घंटागाड्यांची वाट न पाहता दिसेल तिथे कचरा टाकताना दिसतात. अनेक नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करत नाहीत. नगर परिषदेने जर नागरिकांना सामावून घेऊन स्वच्छता अभियानाला गती दिली असेल तर नागरिकांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.