शहरं
Join us  
Trending Stories
1
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
3
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
4
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
5
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
6
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
7
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
8
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
9
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
10
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
11
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
12
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
13
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
14
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
15
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
16
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
17
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
18
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
19
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
20
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

शेलपिंपळगाव : शासनाने भामा-आसखेड व चासकमान धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी; अन्यथा ...

शेलपिंपळगाव : शासनाने भामा-आसखेड व चासकमान धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी; अन्यथा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा गर्भित इशारा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे खेड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजी नांदखिले, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वस्ताज दौंडकर, तालुकाध्यक्ष सुभाष पवळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, तालुका युवा अध्यक्ष सुनील पोटवडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब तात्याबा कोळेकर, समाधान भाडळे, आप्पासाहेब दिघे, कैलास बवले, रामदास बवले, माऊली ढोमे, माजी उपसरपंच एकनाथ आवटे, माजी सरपंच बाळासाहेब येधुजी कोळेकर, माजी उपसरपंच विकास भिवरे, बापूसाहेब सरवदे, सरपंच गणेश कोळेकर, विशेष कार्यकारी अधिकारी भूदेव शिंदे, माजी सरपंच गणेश पवळे, बाळासाहेब खैरे, के. एन. घेनंद, लक्ष्मण शिंदे, उपसरपंच उज्ज्वला घेनंद, सुवर्णा पठारे उपस्थित होते.

रघुनाथदादा पाटील म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचे घोंगडे भिजत आहे. मात्र, माझ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेल्या पुनर्वसनच्या शिक्क्यांमुळे भावा-भावांमधील जमिनींची खातेफोड रखडली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने येत्या पंधरा दिवसांत उसाची एफआरपी जाहीर करावी. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला व दुधाला हमीभाव जाहीर करावा. शासन जर शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत असेल तर आम्हाला आमच्या हक्कांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, वडगाव - घेनंद व कोयाळी - भानोबाची येथे शेतकरी संघटनेच्या शाखांचे उद्घाटन रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सुभाष पवळे यांनी केले. सूत्रसंचालन आप्पा दिघे यांनी केले.

रेल्वेचा प्रवास सुखकर व सर्वांना परवडेल असा असल्याने रेल्वे प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामुळे रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध करू नका. मात्र, रिंग रोडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन बाधित होत असल्याने रिंग रोडला विरोध होणे स्वाभाविक आहे. शेतकऱ्यांनी शेतीपंपांची वीज बिले भरू नका.

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना.

१९ शेलपिंपळगाव

शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना रघुनाथदादा पाटील.