शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

शेलपिंपळगाव : शासनाने भामा-आसखेड व चासकमान धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी; अन्यथा ...

शेलपिंपळगाव : शासनाने भामा-आसखेड व चासकमान धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी; अन्यथा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा गर्भित इशारा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे खेड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजी नांदखिले, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वस्ताज दौंडकर, तालुकाध्यक्ष सुभाष पवळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, तालुका युवा अध्यक्ष सुनील पोटवडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब तात्याबा कोळेकर, समाधान भाडळे, आप्पासाहेब दिघे, कैलास बवले, रामदास बवले, माऊली ढोमे, माजी उपसरपंच एकनाथ आवटे, माजी सरपंच बाळासाहेब येधुजी कोळेकर, माजी उपसरपंच विकास भिवरे, बापूसाहेब सरवदे, सरपंच गणेश कोळेकर, विशेष कार्यकारी अधिकारी भूदेव शिंदे, माजी सरपंच गणेश पवळे, बाळासाहेब खैरे, के. एन. घेनंद, लक्ष्मण शिंदे, उपसरपंच उज्ज्वला घेनंद, सुवर्णा पठारे उपस्थित होते.

रघुनाथदादा पाटील म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचे घोंगडे भिजत आहे. मात्र, माझ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेल्या पुनर्वसनच्या शिक्क्यांमुळे भावा-भावांमधील जमिनींची खातेफोड रखडली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने येत्या पंधरा दिवसांत उसाची एफआरपी जाहीर करावी. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला व दुधाला हमीभाव जाहीर करावा. शासन जर शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत असेल तर आम्हाला आमच्या हक्कांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, वडगाव - घेनंद व कोयाळी - भानोबाची येथे शेतकरी संघटनेच्या शाखांचे उद्घाटन रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सुभाष पवळे यांनी केले. सूत्रसंचालन आप्पा दिघे यांनी केले.

रेल्वेचा प्रवास सुखकर व सर्वांना परवडेल असा असल्याने रेल्वे प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामुळे रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध करू नका. मात्र, रिंग रोडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन बाधित होत असल्याने रिंग रोडला विरोध होणे स्वाभाविक आहे. शेतकऱ्यांनी शेतीपंपांची वीज बिले भरू नका.

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना.

१९ शेलपिंपळगाव

शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना रघुनाथदादा पाटील.