शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:15 IST

शेलपिंपळगाव : शासनाने भामा-आसखेड व चासकमान धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी; अन्यथा ...

शेलपिंपळगाव : शासनाने भामा-आसखेड व चासकमान धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी; अन्यथा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा गर्भित इशारा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे खेड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजी नांदखिले, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वस्ताज दौंडकर, तालुकाध्यक्ष सुभाष पवळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, तालुका युवा अध्यक्ष सुनील पोटवडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब तात्याबा कोळेकर, समाधान भाडळे, आप्पासाहेब दिघे, कैलास बवले, रामदास बवले, माऊली ढोमे, माजी उपसरपंच एकनाथ आवटे, माजी सरपंच बाळासाहेब येधुजी कोळेकर, माजी उपसरपंच विकास भिवरे, बापूसाहेब सरवदे, सरपंच गणेश कोळेकर, विशेष कार्यकारी अधिकारी भूदेव शिंदे, माजी सरपंच गणेश पवळे, बाळासाहेब खैरे, के. एन. घेनंद, लक्ष्मण शिंदे, उपसरपंच उज्ज्वला घेनंद, सुवर्णा पठारे उपस्थित होते.

रघुनाथदादा पाटील म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचे घोंगडे भिजत आहे. मात्र, माझ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेल्या पुनर्वसनच्या शिक्क्यांमुळे भावा-भावांमधील जमिनींची खातेफोड रखडली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने येत्या पंधरा दिवसांत उसाची एफआरपी जाहीर करावी. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला व दुधाला हमीभाव जाहीर करावा. शासन जर शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत असेल तर आम्हाला आमच्या हक्कांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, वडगाव - घेनंद व कोयाळी - भानोबाची येथे शेतकरी संघटनेच्या शाखांचे उद्घाटन रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सुभाष पवळे यांनी केले. सूत्रसंचालन आप्पा दिघे यांनी केले.

रेल्वेचा प्रवास सुखकर व सर्वांना परवडेल असा असल्याने रेल्वे प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामुळे रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध करू नका. मात्र, रिंग रोडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन बाधित होत असल्याने रिंग रोडला विरोध होणे स्वाभाविक आहे. शेतकऱ्यांनी शेतीपंपांची वीज बिले भरू नका.

- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना.

१९ शेलपिंपळगाव

शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना रघुनाथदादा पाटील.