शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘कोरोना योद्ध्यां’च्या वारसांना तत्काळ मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:20 IST

पुणे : लॉकडाऊनमध्ये स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंतच्या सेवा देताना कोरोनाची लागण होऊन प्राण गमवाव्या लागलेल्या कोरोना योद्ध्यांच्या नातेवाईकांना पालिकेकडून दिली जाणारी ...

पुणे : लॉकडाऊनमध्ये स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंतच्या सेवा देताना कोरोनाची लागण होऊन प्राण गमवाव्या लागलेल्या कोरोना योद्ध्यांच्या नातेवाईकांना पालिकेकडून दिली जाणारी २५ लाखांची आर्थिक मदत आणि वारसास नोकरी तत्काळ दिली जावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये केली. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले, तर येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

‘ऑन ड्युटी’ कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वारसांना महापालिकेकडून ५० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. परंतु, ही घोषणा अद्यापही प्रत्यक्षात उतरु शकली नाही. याविषयी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी प्रश्न उपस्थित करीत ही मदत का दिली जात नाही, अशी विचारणा केली. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी भविष्यात अशा घटना घडल्या तर त्यांच्याही वारसांना मदतीचा लाभ मिळायला हवा, अशी महत्वाची सूचना केली. तर, कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी याविषयाकरिता विशेष सभा बोलविण्याची मागणी केली. कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी एक कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्याचे काय झाले असा सवाल करतानाच कर्मचाऱ्यांचा विमा काढला असता तर त्यांना मदत मिळाली असती असे नमूद केले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याविषयीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. याविषयी तत्काळ बैठक घेऊन मदत देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. याविषयी माहिती देताना कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त शिवाजी दौंडकर यांनी आजवर झालेल्या मृत्यूंपैकी पक्षनेत्यांच्या बैठकीत १५ जणांचे प्रस्ताव मान्य केले आहेत. स्थायी समितीने मुख्य सभा मान्यता देईल या भरवशावर सरसकट सर्वांना २५ लाख आणि नोकरी देण्यास मान्यता दिलेली आहे. येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

====

महापालिकेच्या साने गुरुजी कर्मचारी वसाहतीमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी वर्गीकरणास मान्यता दिली. या वेळी नगरसेवक सुभाष जगताप यांनी नेमक्या किती इमारती धोकायदायक आहेत आणि यापूर्वी बीओटी तत्त्वावर ठेकेदारासोबत केलेला पुनर्विकासाची निविदा रद्द केली आहे का, असा प्रश्न केला. तर, अविनाश बागवे यांनी भवानी पेठेतील पालिका वसाहतींच्या पुनर्विकासाचाही विचार प्राधान्याने करावा, अशी मागणी केली.