शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

‘कोरोना योद्ध्यां’च्या वारसांना तत्काळ मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:20 IST

पुणे : लॉकडाऊनमध्ये स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंतच्या सेवा देताना कोरोनाची लागण होऊन प्राण गमवाव्या लागलेल्या कोरोना योद्ध्यांच्या नातेवाईकांना पालिकेकडून दिली जाणारी ...

पुणे : लॉकडाऊनमध्ये स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंतच्या सेवा देताना कोरोनाची लागण होऊन प्राण गमवाव्या लागलेल्या कोरोना योद्ध्यांच्या नातेवाईकांना पालिकेकडून दिली जाणारी २५ लाखांची आर्थिक मदत आणि वारसास नोकरी तत्काळ दिली जावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये केली. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले, तर येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

‘ऑन ड्युटी’ कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वारसांना महापालिकेकडून ५० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. परंतु, ही घोषणा अद्यापही प्रत्यक्षात उतरु शकली नाही. याविषयी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी प्रश्न उपस्थित करीत ही मदत का दिली जात नाही, अशी विचारणा केली. शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी भविष्यात अशा घटना घडल्या तर त्यांच्याही वारसांना मदतीचा लाभ मिळायला हवा, अशी महत्वाची सूचना केली. तर, कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी याविषयाकरिता विशेष सभा बोलविण्याची मागणी केली. कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी एक कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्याचे काय झाले असा सवाल करतानाच कर्मचाऱ्यांचा विमा काढला असता तर त्यांना मदत मिळाली असती असे नमूद केले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याविषयीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. याविषयी तत्काळ बैठक घेऊन मदत देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. याविषयी माहिती देताना कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त शिवाजी दौंडकर यांनी आजवर झालेल्या मृत्यूंपैकी पक्षनेत्यांच्या बैठकीत १५ जणांचे प्रस्ताव मान्य केले आहेत. स्थायी समितीने मुख्य सभा मान्यता देईल या भरवशावर सरसकट सर्वांना २५ लाख आणि नोकरी देण्यास मान्यता दिलेली आहे. येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

====

महापालिकेच्या साने गुरुजी कर्मचारी वसाहतीमधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी वर्गीकरणास मान्यता दिली. या वेळी नगरसेवक सुभाष जगताप यांनी नेमक्या किती इमारती धोकायदायक आहेत आणि यापूर्वी बीओटी तत्त्वावर ठेकेदारासोबत केलेला पुनर्विकासाची निविदा रद्द केली आहे का, असा प्रश्न केला. तर, अविनाश बागवे यांनी भवानी पेठेतील पालिका वसाहतींच्या पुनर्विकासाचाही विचार प्राधान्याने करावा, अशी मागणी केली.