शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावर अवैध वाहतूक

By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST

पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक येत्या दोन दिवसांत पूर्णपणे

लोणी काळभोर : पोलिसांच्या आशीर्वादाने हडपसर गाडीतळ येथून टाटा मॅजिक, जीप, पॅगो रिक्षा यांद्वारे पुणे-सोलापूर महामार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक येत्या दोन दिवसांत पूर्णपणे न थांबल्यास २५ मार्चपासून सहा आसनी रिक्षाचालक आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा चिंतामणी सहा आसनी रिक्षा संघाचे अध्यक्ष व पुणे बार असोसिएशनचे सेक्रेटरी राहुल झेंडे यांनी पोलीस खात्याला दिला आहे.या संदर्भात अधिक माहिती देताना झेंडे म्हणाले, की सध्या हडपसर गाडीतळ येथून जीप, टाटा मॅजिक, मारुती व्हॅन, मारुती इको व पुणे शहरात परवाना नसलेल्या आणी स्कॅ्रप झालेल्या पॅगो रिक्षा, तसेच जिल्ह्याबाहेरील सहा आसनी रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या शेकडो वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. या वाहनांमध्ये पोलीस व त्यांच्या नातलगांची वाहने असल्याने त्यांना वाहतूक पोलिसांचा आशीर्वाद आहे. सहा आसनी रिक्षाचालकांवर कारण नसताना कारवाई होत असल्याने वाहतुकीचा कायदेशीर परवाना असूनही या सहा आसनी रिक्षाचालकांना व्यवसाय करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे.आज सर्व सहा आसनी रिक्षाचालक निवेदन देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आले होते. आज त्यांनी रिक्षा रस्त्यांवर न उतरवता लोणी काळभोर बाजार मैदानांवर लावल्या होत्या; परंतु हडपसर गाडीतळ येथून जीप, टाटा मँजिक, मारुती व्हॅन, मारुती इको व पुणे शहरात परवाना नसलेल्या आणी स्क्रॅप झालेल्या पॅगो रिक्षा तसेच जिल्ह्याबाहेरील सहा आसनी रिक्षा आदी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक मात्र विनाव्यत्यय सुरू होती. प्रवाशांचे विशेषत: महिला, लहान मुले व वृद्धांना प्रवासासाठी पर्याय शोधावा लागल्याने हाल झाले. (वार्ताहर)> सध्या रासरोसपणे विनापरवाना होत असलेली अवैध प्रवासी वाहतूक कायमस्वरूपी बंद व्हावी व सहा आसनी रिक्षाचालकांना न्याय मिळावा याकरिता रिक्षा संघाच्या वतीने पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर, परिवहन विभाग, वाहतूक शाखा हडपसर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे यांना एका निवेदनाद्वारे सदर अवैध प्रवासी वाहतूक २५ मार्चपर्यंत कायमस्वरूपी बंद न झाल्यास सर्व सहा आसनी रिक्षाचालक आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.