शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

बेकायदा बांधकामांवर हातोडा पडणारच!

By admin | Updated: March 27, 2017 02:35 IST

विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक ज्या मुद्द्यावर पार पडल्या, त्या शहरातील अनधिकृत बांधकामाबात उच्च

पिंपरी : विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक ज्या मुद्द्यावर पार पडल्या, त्या शहरातील अनधिकृत बांधकामाबात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहे. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांना संरक्षण न देता त्या बांधकामांवर कारवाई करण्यात यावी निर्णय असा उच्च न्यायालयाने दिलेला आहे. या निर्णयाची पिंपरी-चिंचवड महापालिका अंमलबजावणी करणार असल्याने शहरातील अनधिकृत निवासी बांधकाम केलेल्या रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शहरात तब्बल अडीच लाख अनधिकृत बांधकामे आहेत. त्यातील केवळ ७० हजार बांधकामांची नोंद आहे. महापालिका, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे क्षेत्र, रेडझोन, म्हाडा आदी भागांत अनधिकृत बांधकामे सर्रासपणे केली गेली आहेत. शेती विभागात आरक्षणांवर, पूररेषेच्या आत, नागरी वस्तीत बांधकामे, संरक्षण खात्याच्या संरक्षित क्षेत्रात अशी त्याची वर्गवारी आहे. शासनाने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याचे धोरण जाहीर केले आहे. शहरी भागांतील सर्व बेकायदा बांधकामांना सशर्त संरक्षण देऊन नियमित करण्यासाठी राज्य सरकारने नव्याने तयार केलेले धोरण मुंबई उच्च न्यायालयाने दुस-यांदा फेटाळून लावले आहे. न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयात शासनाचे धोरण हे बेकायदा, अवैध व राज्यघटनेतील अनुच्छेद १४ मधील (समानतेचा हक्क) तरतुदीचे उल्लंघन करणारे असल्याचे म्हटले आहे. सरकारचे धोरण मनमानी व अतार्किक स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने शासनाचा दावा फेटाळून लावला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक रचना कायद्यात (एमआरटीपी) मूळ बांधकामातील बेकायदा बांधकामे नियमित करून घेण्यासाठी तरतुदी आहेत. याचबरोबर काही शहरात विकास नियंत्रण नियमावलीच्या अंतर्गतही फ्लेक्झिबल एफएसआय, प्रीमिअम, टीडीआर आदींच्या माध्यमातून अशी सुविधा आहे. मात्र मूळ बांधकाम कायद्याच्या कक्षेत केलेले असेल, तर बांधकाम नियमित केले जाऊ शकते; मात्र ती बांधकामे मुळातच विकास नियंत्रण नियमावलीचे नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेली आहेत. त्यांना सरसकट नियमित केले, तर एमआरटीपी कायद्यांतर्गत शहरांचे करण्यात आलेले नियोजन कोलमडून पडेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. अतिक्रमीत बांधकामांना नियमित केले तर समानतेच्या हक्काचे उल्लंघन ठरेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)