शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

राज्यकर्त्यांचे लोककलाकारांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 24, 2017 03:54 IST

प्रभाताई शिवणेकर म्हणाल्या, ‘‘पुणे महापालिकेच्या वतीने पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा केवळ माझा सन्मान नसून लोककलेचा सन्मान आणि तमाशा कलेचा सन्मान आहे

प्रभाताई शिवणेकर म्हणाल्या, ‘‘पुणे महापालिकेच्या वतीने पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा केवळ माझा सन्मान नसून लोककलेचा सन्मान आणि तमाशा कलेचा सन्मान आहे. एका तमाशा कलावंतास पठ्ठे बापूराव यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हा जीवनातील सर्वांत मोठा सन्मान आहे, असे मला वाटते. मी मूळची बेळगावची. परंतु, लहानपण मुळशी तालुक्यातील बालगुडी परिसरात गेले. नऊ वर्षांची होते त्या वेळी आई-वडील देवाघरी गेले. पुढे बहिणीने माझा सांभाळ केला. लहानपणी गाई-म्हशी वळणे, घरातील कामे करणे, लाकडाच्या मोळ्या वाहने ही कामे केली. बारा वर्षांची असताना दादू इंदुरीकरसह शंकर शिवणेकर यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. गवळणीत काम करू लागले. तसेच गाणी म्हणने आणि वगातही भूमिका साकारायला सुरुवात झाली. मला आठवतयं पहिला वग ‘लड्डूसिंग’ होता. त्यानंतर ‘मराठी शाहीची बोलकी’, ‘मल्हारराव होळकर’ अशा वगांत कामे करायला सुरुवात केली. त्यात छोट्यामोठ्या भूमिका साकारायला सुरुवात झाली. खरे तर तमाशात काम करण्याचा कोणताही अनुभव नाही. शिक्षण नाही. मला कला क्षेत्रात घडविण्यात दादू इंदुरीकर यांचे योगदान आहे. गाणी कशी म्हणायची, नृत्य कसे करायचे. अभिनय कसा करायचा हे शिकविले. त्यानंतर आलेल्या झाशी च्या राणीमधून झाशीच्या राणीची मुख्य भूमिका केली. त्यातून मला खूप लोकप्रियता मिळाली. तमाशात खूप बदल झाला आहे. कालचा तमाशा आणि आजचा तमाशा खूप वेगळाच आहे. गावात डबडी वाजवून तमाशाची दवंडी दिली जायची. त्यानंतर गावातील मोकळ्या जागेत दगडांचा उंचवटा करून त्यावर माती टाकून त्यावर तमाशा सादर व्हायचा. आजच्या सारखा झगमगाट त्या काळी नव्हता. पूर्वीचा तमाशा वगनाट्य प्रधान होता, आताचा तमाशा संगीत प्रधान आहे. काळ बदलला तशी आवडही बदलली. जीवनाला खरी कलाटणी मिळाली ती दादू इंदुरीकराच्या ‘गाढवाचं लग्न’ या वगनाट्यातून या वगनाट्यात सावळा कुंभाराबरोबरच गंगीचीही भूमिका महत्त्वाची आहे. गंगीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी केला. या वगनाट्यास मोठी लोकप्रियता मिळाली. प्रभा शिवणेकर आणि गंगी असे समीकरण बनले. या वगनाट्याचे सुमारे वीस वर्षे हजारो प्रयोग केले. त्यातून मनोरंजनाबरोबरच समाजाचे प्रबोधन करण्याचेही काम केले.’’‘‘लोककलांची अवस्था काय आहे, हे आपण सर्वच जण जाणतो आहोत. महाराष्ट्रातील संस्कृतीला एकसंध ठेवण्याचे काम लोककलांनी केले आहे. लोककलांनी महाराष्ट्राचे मनोरंजनच केले नाही, तर दिशा देण्याचे कामही केले आहे. त्यात तमाशा कलेचे योगदान मोलाचे आहे. या कलेची आजची परिस्थिती काय? तमाशाचे फड चालविणेही कठीण झाले आहे. कोणी तमाशात काम करायला तयार होत नाही. तमासगीरांनाही आपली मुलं, तमाशात काम करावी, असे वाटत नाही. त्यामुळे कलांचा ऱ्हास होणार नाही, याची दक्षता समाज, राजकारणी, शासनाने घ्यायला हवा. संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत. कलाकारांना कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये. कोणताही उद्देश न ठेवता कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या कलावंतांची कदर शासनाने करायला हवी. तरच कला आणि कलाकार टिकतील, असेही शिवणेकर म्हणाल्या.