शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

औद्योगिक क्षेत्रामधील अपघाताकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 13, 2016 02:12 IST

येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक उत्पादन करणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत प्रशासन कमालीचे

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक उत्पादन करणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत प्रशासन कमालीचे निर्ढावल्याचे चित्र आहे. मंगळवारी संध्याकाळी पटनी फोमस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये पूर्ण कंपनी जळून खाक झाली. मात्र, त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उडालेली तारांबळ पाहता, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील कामगार तसेच परिसरात असणाऱ्या कुरकुंभ, पांढरेवाडी तसेच अन्य जवळपास असणाऱ्या नागरिकांचे भविष्य धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.पटनी फोमस या कंपनीमध्ये गाद्यांमध्ये वापरण्यात येणारे फोम बनवले जाते. अगदीच वीसच्या जवळपास कामगार असणारी ही कंपनी सामान्यत: कुठल्याही प्रकारचा धोका न संभवणारी अशी ही कंपनी असल्याचा गैरसमज हा मंगळवारी लागलेल्या आगीमुळे दूर झाला. आग विझविण्यासाठी प्रथम कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, त्याच्या क्षमतेच्या पलीकडे असणाऱ्या भीषण आगीला विझविण्यासाठी जवळपास ५ अग्निशामक गाड्यांचा वापरदेखील कमी पडत होता. तर, रिकाम्या झालेल्या अग्निशामक गाड्यांमध्ये पाणी मिळविण्यासाठी फायर हायड्रन्ट लाईनदेखील जवळपास नसल्यामुळे अडचणीत आणखी भर पडत गेली.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक पदार्थ उत्पादन करणारे देशातील एक महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते. मोठमोठ्या उद्योगसमूहांचे या ठिकाणी कारखाने आहेत. वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे, वायूचे प्रदूषण येथील ग्रामस्थ सोसत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या स्फोट व आग लागण्याच्या समस्येमुळे एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)