शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

औद्योगिक क्षेत्रामधील अपघाताकडे दुर्लक्ष

By admin | Updated: October 13, 2016 02:12 IST

येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक उत्पादन करणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत प्रशासन कमालीचे

कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक उत्पादन करणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत प्रशासन कमालीचे निर्ढावल्याचे चित्र आहे. मंगळवारी संध्याकाळी पटनी फोमस या कंपनीला लागलेल्या भीषण आगीमध्ये पूर्ण कंपनी जळून खाक झाली. मात्र, त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उडालेली तारांबळ पाहता, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील कामगार तसेच परिसरात असणाऱ्या कुरकुंभ, पांढरेवाडी तसेच अन्य जवळपास असणाऱ्या नागरिकांचे भविष्य धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.पटनी फोमस या कंपनीमध्ये गाद्यांमध्ये वापरण्यात येणारे फोम बनवले जाते. अगदीच वीसच्या जवळपास कामगार असणारी ही कंपनी सामान्यत: कुठल्याही प्रकारचा धोका न संभवणारी अशी ही कंपनी असल्याचा गैरसमज हा मंगळवारी लागलेल्या आगीमुळे दूर झाला. आग विझविण्यासाठी प्रथम कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशामक दलाला पाचारण केले. मात्र, त्याच्या क्षमतेच्या पलीकडे असणाऱ्या भीषण आगीला विझविण्यासाठी जवळपास ५ अग्निशामक गाड्यांचा वापरदेखील कमी पडत होता. तर, रिकाम्या झालेल्या अग्निशामक गाड्यांमध्ये पाणी मिळविण्यासाठी फायर हायड्रन्ट लाईनदेखील जवळपास नसल्यामुळे अडचणीत आणखी भर पडत गेली.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक पदार्थ उत्पादन करणारे देशातील एक महत्त्वपूर्ण स्थान मानले जाते. मोठमोठ्या उद्योगसमूहांचे या ठिकाणी कारखाने आहेत. वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे, वायूचे प्रदूषण येथील ग्रामस्थ सोसत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या स्फोट व आग लागण्याच्या समस्येमुळे एक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. (वार्ताहर)