शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सक्षम उमेदवार मिळाले तर कर्मयोगीची निवडणूक लढवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:13 IST

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्या ...

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्या चांगल्या उमेदवारांचा शोध घेत आहे. असे सक्षम उमेदवार मिळाले तर शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करेन, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह येथे बुधवारी (दि. २२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील विशेष बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गारटकर म्हणाले, कर्मयोगी शंकराव पाटील यांनी साखर कारखाना अतिशय काटकसरीने चालवला. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र, याउलट परिस्थिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आधिपत्याखाली सद्य:परिस्थितीला निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर नाही. उसाचे पेमेंट अद्याप झाले नाही. वाहतूकदारांचे पैसे नाहीत. अशा अनेक समस्यांनी हा साखर कारखाना ग्रासला आहे. या सहकारी साखर कारखान्याला अत्यंत उसाची जवळची वाहतूक असताना देखील, आर्थिक अडचणीत कसा ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला.

कारखान्याच्या व्यवस्थापनाने कधी शेतकऱ्यांचे प्रपंच सुधारावेत, असा विचार केलेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय नाही. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार त्रस्त करून सोडले आहेत. नियोजनशून्य कारभार चालू असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या कारखान्यात चांगल्या पद्धतीने कारभार करू शकत नाहीत. केवळ हर्षवर्धन पाटील मनमानीने कारभार चालवतात, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे, तक्रार आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील आणि त्यांच्या पत्नी गेल्यानंतर अतिशय मनमानी पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी या कारखान्याचा कारभार चालवला आहे. कारखान्यावर आर्थिक कर्जाचा बोजा वाढतो आहे. जर पुन्हा हा कारखाना हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात ठेवला तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे शेतकऱ्यांचे, सभासदांचे म्हणणे आहे.

कारखान्याबद्दल कारभार मनमानी पद्धतीने चालतोय, ही भावना नुसत्या सभासदांची नाही, तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचीही आहे. कामगारसुद्धा म्हणताहेत पॅनल लावा व यांना हटवा, ऊस उत्पादक शेतकरी हाच हेका धरत आहेत. मात्र, त्या कारखान्यात मोठी गंमत आहे. हर्षवर्धन पाटलांनी ही संस्था कायम आपल्याकडेच राहावी, यासाठी काही नियम केले आहेत, असे गारटकर म्हणाले.

चौकट : माजी मंत्री यांनी ऊस उत्पादक सभासद उमेदवार होऊ नयेत याची काळजी घेतली

ज्या शेतकऱ्यांना या कारखान्यात ऊस घालायचा आहे, त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला जात नाही. मग असे शेतकरी कसे निवडणूक लढणार जे विरोधातील लोक आहेत. त्यांचे ठरावीक सभासद म्हणून नावे आहेत. मात्र, हे सभासद उमेदवार होणार नाहीत, याची विशेष काळजी हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली आहे. मात्र, सक्षम उमेदवार मिळाले तर निवडणूक लढविण्यात येईल. गुरुवारी ( दि. २३ ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या निवडणुकीसंदर्भात निर्णय जाहीर करणार आहे, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.