शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सक्षम उमेदवार मिळाले तर कर्मयोगीची निवडणूक लढवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:13 IST

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्या ...

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्या चांगल्या उमेदवारांचा शोध घेत आहे. असे सक्षम उमेदवार मिळाले तर शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करेन, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह येथे बुधवारी (दि. २२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील विशेष बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गारटकर म्हणाले, कर्मयोगी शंकराव पाटील यांनी साखर कारखाना अतिशय काटकसरीने चालवला. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र, याउलट परिस्थिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आधिपत्याखाली सद्य:परिस्थितीला निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर नाही. उसाचे पेमेंट अद्याप झाले नाही. वाहतूकदारांचे पैसे नाहीत. अशा अनेक समस्यांनी हा साखर कारखाना ग्रासला आहे. या सहकारी साखर कारखान्याला अत्यंत उसाची जवळची वाहतूक असताना देखील, आर्थिक अडचणीत कसा ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला.

कारखान्याच्या व्यवस्थापनाने कधी शेतकऱ्यांचे प्रपंच सुधारावेत, असा विचार केलेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय नाही. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार त्रस्त करून सोडले आहेत. नियोजनशून्य कारभार चालू असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या कारखान्यात चांगल्या पद्धतीने कारभार करू शकत नाहीत. केवळ हर्षवर्धन पाटील मनमानीने कारभार चालवतात, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे, तक्रार आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील आणि त्यांच्या पत्नी गेल्यानंतर अतिशय मनमानी पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी या कारखान्याचा कारभार चालवला आहे. कारखान्यावर आर्थिक कर्जाचा बोजा वाढतो आहे. जर पुन्हा हा कारखाना हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात ठेवला तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे शेतकऱ्यांचे, सभासदांचे म्हणणे आहे.

कारखान्याबद्दल कारभार मनमानी पद्धतीने चालतोय, ही भावना नुसत्या सभासदांची नाही, तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचीही आहे. कामगारसुद्धा म्हणताहेत पॅनल लावा व यांना हटवा, ऊस उत्पादक शेतकरी हाच हेका धरत आहेत. मात्र, त्या कारखान्यात मोठी गंमत आहे. हर्षवर्धन पाटलांनी ही संस्था कायम आपल्याकडेच राहावी, यासाठी काही नियम केले आहेत, असे गारटकर म्हणाले.

चौकट : माजी मंत्री यांनी ऊस उत्पादक सभासद उमेदवार होऊ नयेत याची काळजी घेतली

ज्या शेतकऱ्यांना या कारखान्यात ऊस घालायचा आहे, त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला जात नाही. मग असे शेतकरी कसे निवडणूक लढणार जे विरोधातील लोक आहेत. त्यांचे ठरावीक सभासद म्हणून नावे आहेत. मात्र, हे सभासद उमेदवार होणार नाहीत, याची विशेष काळजी हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली आहे. मात्र, सक्षम उमेदवार मिळाले तर निवडणूक लढविण्यात येईल. गुरुवारी ( दि. २३ ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या निवडणुकीसंदर्भात निर्णय जाहीर करणार आहे, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.