शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सक्षम उमेदवार मिळाले तर कर्मयोगीची निवडणूक लढवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:13 IST

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्या ...

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कारखाना चालवण्यासाठी सक्षम असणाऱ्या चांगल्या उमेदवारांचा शोध घेत आहे. असे सक्षम उमेदवार मिळाले तर शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हितासाठी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करेन, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह येथे बुधवारी (दि. २२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील विशेष बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

गारटकर म्हणाले, कर्मयोगी शंकराव पाटील यांनी साखर कारखाना अतिशय काटकसरीने चालवला. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र, याउलट परिस्थिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आधिपत्याखाली सद्य:परिस्थितीला निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर नाही. उसाचे पेमेंट अद्याप झाले नाही. वाहतूकदारांचे पैसे नाहीत. अशा अनेक समस्यांनी हा साखर कारखाना ग्रासला आहे. या सहकारी साखर कारखान्याला अत्यंत उसाची जवळची वाहतूक असताना देखील, आर्थिक अडचणीत कसा ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केला.

कारखान्याच्या व्यवस्थापनाने कधी शेतकऱ्यांचे प्रपंच सुधारावेत, असा विचार केलेला दिसत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय नाही. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार त्रस्त करून सोडले आहेत. नियोजनशून्य कारभार चालू असल्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या कारखान्यात चांगल्या पद्धतीने कारभार करू शकत नाहीत. केवळ हर्षवर्धन पाटील मनमानीने कारभार चालवतात, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे, तक्रार आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील आणि त्यांच्या पत्नी गेल्यानंतर अतिशय मनमानी पद्धतीने हर्षवर्धन पाटील यांनी या कारखान्याचा कारभार चालवला आहे. कारखान्यावर आर्थिक कर्जाचा बोजा वाढतो आहे. जर पुन्हा हा कारखाना हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात ठेवला तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असे शेतकऱ्यांचे, सभासदांचे म्हणणे आहे.

कारखान्याबद्दल कारभार मनमानी पद्धतीने चालतोय, ही भावना नुसत्या सभासदांची नाही, तर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचीही आहे. कामगारसुद्धा म्हणताहेत पॅनल लावा व यांना हटवा, ऊस उत्पादक शेतकरी हाच हेका धरत आहेत. मात्र, त्या कारखान्यात मोठी गंमत आहे. हर्षवर्धन पाटलांनी ही संस्था कायम आपल्याकडेच राहावी, यासाठी काही नियम केले आहेत, असे गारटकर म्हणाले.

चौकट : माजी मंत्री यांनी ऊस उत्पादक सभासद उमेदवार होऊ नयेत याची काळजी घेतली

ज्या शेतकऱ्यांना या कारखान्यात ऊस घालायचा आहे, त्यांचा ऊस गाळपासाठी घेतला जात नाही. मग असे शेतकरी कसे निवडणूक लढणार जे विरोधातील लोक आहेत. त्यांचे ठरावीक सभासद म्हणून नावे आहेत. मात्र, हे सभासद उमेदवार होणार नाहीत, याची विशेष काळजी हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली आहे. मात्र, सक्षम उमेदवार मिळाले तर निवडणूक लढविण्यात येईल. गुरुवारी ( दि. २३ ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या निवडणुकीसंदर्भात निर्णय जाहीर करणार आहे, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.