शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदलण्याची मागणी सांगवी : सांगवी (ता. बारामती) ग्रामपंचायतीकडून अपुरा, अनियमित ...

कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदलण्याची मागणी

सांगवी : सांगवी (ता. बारामती) ग्रामपंचायतीकडून अपुरा, अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना राबवून स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास महिला व आबालवृद्धांसह ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा माजी सरपंच भानुदास जगताप यांनी ग्रामपंचायतीस निवेदनाद्वारे दिला आहे. सध्या जिल्ह्यात सामाधानकारक पाऊस झाला असताना देखील परिसरात पाणीपुरवठ्याच्या योग्य नियोजनाअभावी पाण्याचा प्रश्न कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सांगवी गावात दोन दिवसांआड दूषित व अपुऱ्या पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. मिलिंदनगर येथे वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न कायम असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. गावात दोन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडण्यात येत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तीन ते चार दिवस पाणी कसे पुरवायचे हा मोठा प्रश्न आता ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. गावात दीड लाख क्षमतेची पाण्याची टाकी आहे. पाणीपुरवठा करत असताना पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरलेली असताना पाणी सोडल्यास पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत असतो,मात्र, टाकीतील पाणी खाली गेल्यानंतर मिलिंदनगर भागात पाणीपुरवठा होत असतो, गावात इतर ठिकाणी पूवीर्पासून जुन्या चार इंची पाईप लाईन आहेत. तर मिलिंदनगर येथे तीन इंची पाईपलाईन असल्याने आणखी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यापुढे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त करण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे.

---------------------------

मिलिंदनगर परिसरात ग्रामस्थांच्या मागणीनुसार योग्य ती काळजी घेऊन स्वच्छ व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार आहोत. तसेच जलप्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणा नंतर गावात लवकरात लवकर नवीन जलवाहिन्यांच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- चंद्रकांत तावरे

(सरपंच सांगवी ग्रामपंचायत)

-----------------------------

सध्या केनॉलच्या कामकाजामुळे साठवण तलावात पाणी अल्प प्रमाणात असल्याने पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. मागील महिनाभरापूर्वी जल प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी जुन्या पाण्याच्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर गावातील सर्वच जलवाहिन्यांचे नव्याने कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे पुढील काळात पाण्याची समस्या मिटणार आहे.

- संजय चांदगुडे

(ग्रामविकास अधिकारी )