शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एकजूट असेल तर जमिनी वाचतील

By admin | Updated: March 6, 2016 01:09 IST

देशात शेतकऱ्यांची संमती नसेल तर शासनाला कोणाच्याही शेतजमिनी घेता येऊ शकत नाहीत. जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी जेजुरी परिसरातील मावडी

जेजुरी : देशात शेतकऱ्यांची संमती नसेल तर शासनाला कोणाच्याही शेतजमिनी घेता येऊ शकत नाहीत. जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी जेजुरी परिसरातील मावडी, कोळविहीरे व नावळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने शिक्के मारले आहेत. आजी व माजी आमदारांनी यापूर्वी येथे स्वस्तात जागा घेऊन ठेवल्या आहेत. शासन, लोकप्रतिनिधी, उद्योजक यांच्याविरोधात शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. गावकऱ्यांची एकजूट असेल तर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन हभप बंडातात्या कऱ्हाडकर यांनी केले.नावळी येथे यासंदर्भात शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी मावडी, कोळविहीरे व नावळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवदेन कऱ्हाडकर यांना दिले. या वेळी कऱ्हाडकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्यात एकजूट असेल तर आंदोलनाबरोबरच कायद्याचीही लढाई करून न्याय निश्चित मिळतो. नीरा येथील जुब्लियंट कंपनी विरोधातला लढा, तळेगावजवळील नवलाख उंबरे, चाकण विमानतळ लढा, पेरणे फाटा टोल नाका लढा हा एकजुटीचा विजय आहे. जेजुरी एमआयडीसीमध्ये पहिलेच प्लॉट रिकामे असताना केवळ स्वार्थासाठी पुढाऱ्यांनी पाचव्या टप्प्याचा आग्रह धरला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतजमिनींवर आरक्षण टाकले आहे. याला शेतकऱ्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून विरोध दर्शविला आहे. मावडी गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकून शासनाला गावकऱ्यांची एकजूट दाखवून दिली आहे. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला आहे, दुसरीकडे शासन औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली प्रचंड प्रदूषण वाढवीत आहे. येथे शेतीला पाणी हवे आहे ते द्या.’’जोपर्यंत येथील शेतजमिनींवरील शिक्के शासन काढत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. माझा व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचा या आंदोलनाला पाठिंबा राहील, असे कऱ्हाडकर यांनी सांगितले.या वेळी गेनबा म्हस्के, छबन म्हस्के, सुनील गिरमे, भाग्यवान म्हस्के, बाळासाहेब गांजुरे, चंद्रकांत भामे, सुरेश निकम, तसेच नावळी, मावडी व कोळविहीरे येथील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.