शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

एकजूट असेल तर जमिनी वाचतील

By admin | Updated: March 6, 2016 01:09 IST

देशात शेतकऱ्यांची संमती नसेल तर शासनाला कोणाच्याही शेतजमिनी घेता येऊ शकत नाहीत. जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी जेजुरी परिसरातील मावडी

जेजुरी : देशात शेतकऱ्यांची संमती नसेल तर शासनाला कोणाच्याही शेतजमिनी घेता येऊ शकत नाहीत. जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी जेजुरी परिसरातील मावडी, कोळविहीरे व नावळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने शिक्के मारले आहेत. आजी व माजी आमदारांनी यापूर्वी येथे स्वस्तात जागा घेऊन ठेवल्या आहेत. शासन, लोकप्रतिनिधी, उद्योजक यांच्याविरोधात शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. गावकऱ्यांची एकजूट असेल तर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन हभप बंडातात्या कऱ्हाडकर यांनी केले.नावळी येथे यासंदर्भात शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी मावडी, कोळविहीरे व नावळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवदेन कऱ्हाडकर यांना दिले. या वेळी कऱ्हाडकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्यात एकजूट असेल तर आंदोलनाबरोबरच कायद्याचीही लढाई करून न्याय निश्चित मिळतो. नीरा येथील जुब्लियंट कंपनी विरोधातला लढा, तळेगावजवळील नवलाख उंबरे, चाकण विमानतळ लढा, पेरणे फाटा टोल नाका लढा हा एकजुटीचा विजय आहे. जेजुरी एमआयडीसीमध्ये पहिलेच प्लॉट रिकामे असताना केवळ स्वार्थासाठी पुढाऱ्यांनी पाचव्या टप्प्याचा आग्रह धरला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतजमिनींवर आरक्षण टाकले आहे. याला शेतकऱ्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून विरोध दर्शविला आहे. मावडी गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकून शासनाला गावकऱ्यांची एकजूट दाखवून दिली आहे. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला आहे, दुसरीकडे शासन औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली प्रचंड प्रदूषण वाढवीत आहे. येथे शेतीला पाणी हवे आहे ते द्या.’’जोपर्यंत येथील शेतजमिनींवरील शिक्के शासन काढत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. माझा व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचा या आंदोलनाला पाठिंबा राहील, असे कऱ्हाडकर यांनी सांगितले.या वेळी गेनबा म्हस्के, छबन म्हस्के, सुनील गिरमे, भाग्यवान म्हस्के, बाळासाहेब गांजुरे, चंद्रकांत भामे, सुरेश निकम, तसेच नावळी, मावडी व कोळविहीरे येथील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.