शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

हंगाम संपत आला तरी भाव मिळेना

By admin | Updated: April 10, 2017 02:13 IST

तर्डोबाच्या वाडीतील जांभळीमळा येथील शेतकरी शिवाजी कर्डिले यांनी सुमारे

गोलेगाव : तर्डोबाच्या वाडीतील जांभळीमळा येथील शेतकरी  शिवाजी कर्डिले यांनी सुमारे अडीच एकरात कांद्याची लागवड केली असून आता कांदा काढणी शेवटच्या टप्यात आहे. तरीही प्रतिक्विंटलला पाचशे रुपये इतका कवडीमोल भाव मिळाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पोषक हवामानामुळे कांदापिक जोमात आल्याने उत्पादन भरघोस झाले. मात्र त्या तुलनेत उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेती करावी की करु नये याच प्रश्नाभोवती शेतकरी घुटमळत आहे. म्हणूनच की काय शेतकरी आजपर्यंत संपावर गेला नव्हता तो आत्ता जाण्याच्या तयारीत आहे. आणि त्यामुळेच ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या शेतीला अनुदान स्वरुपात किंवा पिकांच्या हमीभाव स्वरुपात भाव देण्याची चर्चा शेतकरी वर्गातून ऐकायला मिळत आहे. कांदा हे एक नगदी पिक असुन त्याचे पैसे रोख स्वरुपात मिळत असल्याने बहुतेक शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणावर लावतात. बाजारभाव कमी असल्यावर काहीजण तो साठवून ठेवतात. परंतु सर्वांकडेच साठवणुकीच्या सुविधा नसतात. साठवणुकीची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा काढल्यावर लगेचच व्यापाऱ्याला जागेवर देणे भाग पडते. व्यापारी तो पड्या भावाने मागतो. नाईलाजाने शेतकऱ्याला तो द्यावा लागतो. ज्यांनी मागील वषीर्चा कांदा साठवून ठेवला होता त्यांनाही वर्षभर चांगला भाव मिळाला नाही व तो आरणीतच सडून गेला. त्यामुळे सरकारने नियोजनबद्ध शेतीव्यवस्थापन व बाजारभावाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी संपूर्ण शेतकरी वगार्ची आहे.(वार्ताहर)