शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

हंगाम संपत आला तरी भाव मिळेना

By admin | Updated: April 10, 2017 02:13 IST

तर्डोबाच्या वाडीतील जांभळीमळा येथील शेतकरी शिवाजी कर्डिले यांनी सुमारे

गोलेगाव : तर्डोबाच्या वाडीतील जांभळीमळा येथील शेतकरी  शिवाजी कर्डिले यांनी सुमारे अडीच एकरात कांद्याची लागवड केली असून आता कांदा काढणी शेवटच्या टप्यात आहे. तरीही प्रतिक्विंटलला पाचशे रुपये इतका कवडीमोल भाव मिळाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पोषक हवामानामुळे कांदापिक जोमात आल्याने उत्पादन भरघोस झाले. मात्र त्या तुलनेत उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेती करावी की करु नये याच प्रश्नाभोवती शेतकरी घुटमळत आहे. म्हणूनच की काय शेतकरी आजपर्यंत संपावर गेला नव्हता तो आत्ता जाण्याच्या तयारीत आहे. आणि त्यामुळेच ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या शेतीला अनुदान स्वरुपात किंवा पिकांच्या हमीभाव स्वरुपात भाव देण्याची चर्चा शेतकरी वर्गातून ऐकायला मिळत आहे. कांदा हे एक नगदी पिक असुन त्याचे पैसे रोख स्वरुपात मिळत असल्याने बहुतेक शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणावर लावतात. बाजारभाव कमी असल्यावर काहीजण तो साठवून ठेवतात. परंतु सर्वांकडेच साठवणुकीच्या सुविधा नसतात. साठवणुकीची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा काढल्यावर लगेचच व्यापाऱ्याला जागेवर देणे भाग पडते. व्यापारी तो पड्या भावाने मागतो. नाईलाजाने शेतकऱ्याला तो द्यावा लागतो. ज्यांनी मागील वषीर्चा कांदा साठवून ठेवला होता त्यांनाही वर्षभर चांगला भाव मिळाला नाही व तो आरणीतच सडून गेला. त्यामुळे सरकारने नियोजनबद्ध शेतीव्यवस्थापन व बाजारभावाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी संपूर्ण शेतकरी वगार्ची आहे.(वार्ताहर)