शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

त्याच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर नागरिकांनी पुन्हा गर्दी करायला सुरुवात केली. विषाणू नाहीसा झाला आहे अशा थाटात सर्व व्यवहार ...

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर नागरिकांनी पुन्हा गर्दी करायला सुरुवात केली. विषाणू नाहीसा झाला आहे अशा थाटात सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. नागरिकांचा निष्काळजीपणा आणि गाफील राहिलेली आरोग्य यंत्रणा यामुळे दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आणि रुग्णसंख्येचा उद्रेक झाला. तिसऱ्या लाटेबद्दलची शक्यता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गृहीत धरण्यात आली आहे. या लाटेला रोखायचे असेल, तर पहिल्या लाटेनंतर झालेल्या चुका टाळाव्या लागणार आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रण, प्रशासन आणि नागरिक सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे.

------

या पाच चुका पुन्हा करू नका !

१. भारतालाही दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, असे भाकीत तज्ज्ञांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच वर्तवण्यात आले होते. त्यानुसार तयारी करण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला होता. मात्र, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी या वेळेचा सदुपयोग केला गेला नाही. बेडची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता, औषधांची गरज याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर अनेक आरोग्य सुविधांअभावी रुग्णांची ससेहोलपट झाली. पहिल्या लाटेत झालेली लूट टाळण्यासाठी दुसऱ्या लाटेत काहीही करण्यात आले नाही.

२. पहिल्या अनलॉकनंतर आणि पहिली लाट ओसरल्यावरही नागरिकांचा निष्काळजीपणा चिंतेत भर घालणारा होता. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर हे सगळे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले. कोरोना विषाणू जणू आपल्यातून निघून गेला आहे, असे समजण्याची चूक केली. या काळात सॅनिटायझर, मास्कची मागणी कमी झाल्याचे निरीक्षण औषध विक्रेत्यांनी नोंदवले होते. सर्व सार्वजनिक ठिकाणे खुली झाल्याने लोकांचे घराबाहेर पडण्याचे, पर्यटनाला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले.

३. पहिल्या लाटेत सर्वच शहरांमध्ये तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या होत्या. लाट ओसरल्यानंतर त्या तातडीने बंद करण्याची घाई शासनाने केली. त्या सुविधा सुरू ठेवल्या असत्या आणि त्याप्रमाणे मनुष्यबळ तैनात करून ठेवले असते तर दुसरी लाट अचानक आल्यावर त्याचा सामना करताना नाकी नऊ आले नसते.

४. पहिली लाट थोपवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच लसींच्या मानवी चाचण्यांना सुरुवात झाली होती. देशातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला किती मोठ्या प्रमाणात लसींचे डोस लागतील, याचा अंदाज बांधणे अवघड नव्हते. लसींची गरज लक्षात घेऊन आपल्या सरकारने लस उत्पादक कंपन्यामध्ये आर्थिक गुंतवणूक केली नाही. परिणामी, आपल्याला अद्याप लसीकरणात हवा तितका वेग पकडता आलेला नाही.

५. पाच राज्यांंतील निवडणुका, महाराष्ट्रातील पोटनिवडणूक यानिमित्ताने झालेल्या सभा, प्रचार यात्रा, कुंभमेळ्यासारखे कार्यक्रम यामुळे ठिकठिकाणी गर्दी वाढलेली पाहायला मिळाली. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढत गेला.

-----

पहिला अनलॉक :

४ ऑगस्ट २०२०

एकूण कोरोना रुग्ण - ५९४९६

बरे झालेले - ४१२५१

मृत्यू - १४१२

दुसरा अनलॉक :

१ जून २०२१

एकूण कोरोना रुग्ण - ४७०३११

बरे झालेले - ४५६५०९

मृत्यू - ८२८४

----

भरारी पथकांची असेल नजर :

महापालिकेने १ जूनपासून पुढील १० दिवस निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक आणि इतर दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असणार आहेत. दहा दिवसानी पॉझिटिव्हीटी रेटचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णसंख्या वाढल्याचे लक्षात आल्यास

निर्बंध पुन्हा कडक केले जाणार आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आपापल्या वॉर्डमधील पाहणी करण्यासाठी पथके निर्माण करण्यास सांगण्यात आले आहे.