शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण मर्यादा वाढल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:12 IST

तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश यांसह इतर राज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणे योग्य असल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात केला आहे. मराठा आरक्षणाच्या ...

तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश यांसह इतर राज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणे योग्य असल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात केला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर इतर राज्यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे म्हणाले, देशातील अनेक राज्यांत आरक्षणावरून असंतोष निर्माण झालेला होता, त्यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने १०३ वी घटना दुरुस्ती करून घटनेत १५ (६) व १६ (६) या नवीन कलमांचा समावेश करून ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांचे १० टक्के आरक्षण सुरू केले आहे, तसेच हे आरक्षण घटना दुरुस्तीने ५० टक्क्यांच्या पुढे गेले असून, ते आरक्षणही सर्वोच्च न्यायालयात आव्हानीत आहे.

सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या आधारावरील आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादा ओलांडणे किंवा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग वगळून इतर सर्व घटकांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे या दोन्ही बाबी न्यायालयासमोर आल्याने, आता केंद्राला व राज्यांना ५० टक्क्यांच्या पुढील आरक्षणाला सकारात्मक भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही, असेही कोंढरे यांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर म्हणाले, आरक्षण मर्यादा ओलांडण्याबाबत इतर राज्यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागतच केले पाहिजे. त्याचप्रमाणे, गायकवाड मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालानुसार, मराठा समाजातील काही वर्ग अंधश्रद्धा व रूढी परंपरेत अडकलेला आहे. त्याला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा निर्णय झाल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो.