शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
2
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
3
IndiGo Bomb Threat: एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
4
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
5
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
6
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
7
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
8
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
9
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
10
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
11
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
12
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
13
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
14
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
15
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
16
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
17
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
19
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
20
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?

आरक्षण मर्यादा वाढल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:12 IST

तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश यांसह इतर राज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणे योग्य असल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात केला आहे. मराठा आरक्षणाच्या ...

तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश यांसह इतर राज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणे योग्य असल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात केला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर इतर राज्यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचा प्रश्न सुटेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे म्हणाले, देशातील अनेक राज्यांत आरक्षणावरून असंतोष निर्माण झालेला होता, त्यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने १०३ वी घटना दुरुस्ती करून घटनेत १५ (६) व १६ (६) या नवीन कलमांचा समावेश करून ईडब्ल्यूएस म्हणजेच आर्थिक दुर्बल घटकांचे १० टक्के आरक्षण सुरू केले आहे, तसेच हे आरक्षण घटना दुरुस्तीने ५० टक्क्यांच्या पुढे गेले असून, ते आरक्षणही सर्वोच्च न्यायालयात आव्हानीत आहे.

सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या आधारावरील आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादा ओलांडणे किंवा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग वगळून इतर सर्व घटकांसाठी ईडब्ल्यूएस आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडणे या दोन्ही बाबी न्यायालयासमोर आल्याने, आता केंद्राला व राज्यांना ५० टक्क्यांच्या पुढील आरक्षणाला सकारात्मक भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही, असेही कोंढरे यांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर म्हणाले, आरक्षण मर्यादा ओलांडण्याबाबत इतर राज्यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागतच केले पाहिजे. त्याचप्रमाणे, गायकवाड मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालानुसार, मराठा समाजातील काही वर्ग अंधश्रद्धा व रूढी परंपरेत अडकलेला आहे. त्याला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा निर्णय झाल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो.