शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पाऊस आला नाही, तर दोन दिवसांनी पाणी

By admin | Updated: June 15, 2016 05:28 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यातील पाण्याची पातळी खालावलेली आहे. १४ जून उजाडला, तरी अजून मॉन्सूनचे आगमन झालेले नाही, त्यामुळे येत्या ३० जून पर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यातील पाण्याची पातळी खालावलेली आहे. १४ जून उजाडला, तरी अजून मॉन्सूनचे आगमन झालेले नाही, त्यामुळे येत्या ३० जून पर्यंत पुरेसा पाऊस न झाल्यास, शहराच्या पाण्यात आणखी कपात करून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मॉन्सूनचे आगमन आणखी ७ दिवस होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने पाणीपुरवठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी मंगळवारी हवामान विभागाचे संचालक मुख्योपाध्याय यांची भेट घेतली. आगामी काळात मॉन्सूनची स्थिती काय असणार आहे, याची माहिती महापौरांनी जाणून घेतली. मॉन्सून सक्रिय होण्यास आणखी ७ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यानंतर महापौरांनी पाटबंधारे विभाग व पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाण्याची परिस्थिती जाणून घेतली. या वेळी येत्या ३० जूनपर्यंत शहराच्या पाणीकपातीमध्ये कोणतीही वाढ करायची नाही; मात्र ३० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास, त्याचा पुन्हा एकदा आढावा घेऊन १ जुलैपासून शहराच्या पाणीकपातीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर, सलग १५-२० दिवस पाऊस झाल्यानंतरच धरणांमध्ये पाण्याचा साठा होण्यास सुरुवात होते. तोपर्यंत पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरपण्याचे प्रमाण मोठे असते. राज्यामध्ये मॉन्सूस सक्रिय होण्यास आणखी ७ दिवस लागणार आहेत, त्यानंतर पुढील २० दिवस पाणी साठण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे ३० जूनपर्यंत पाऊस न झाल्यास पाणीकपातीचा फेरआढावा घ्यावा लागणार आहे. पावसाची परिस्थिती चिंता वाढविणारी आहे.’’शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके पाणी धरणसाठ्यांमध्ये असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये सांगितले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा १५ जुलै पर्यंत पाणीपुरवठा होऊ शकेल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शहराच्या पाणीकपातीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ होणार नसल्याचे स्पष्ट करून, पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंड, इंदापूरसाठी पाणी सोडले होते. (प्रतिनिधी)