शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

वीज तोडल्यास न्यायालयात खटला दाखल करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

-- मंचर : वीज वसुली झाली नाही म्हणून मनमानी पध्दतीने बेकायदेशीररित्या कृषीपंपाची वीज तोडून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी ...

--

मंचर : वीज वसुली झाली नाही म्हणून मनमानी पध्दतीने बेकायदेशीररित्या कृषीपंपाची वीज तोडून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी संकटात आणले तर महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.

वीज वितरण कंपनीला कृषी पंपाची वीज तोडण्यीच सुचना तोडण्याची खुद्द उर्जा मंत्र्याने दिले आहेत. मात्र शेतकऱ्यांनी त्याला घाबरून जाऊ नये कारवाईला आलेच त्याचा कायदेशीर प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन प्रभाकर बांगर यांनी केले. सरकारने विज बिल वसुलीसाठी महावितरणला परवानगी देताना शेतकऱ्यांचा विचार करायला हवा होता. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात विज बिल सुद्धा येते. भरमसाठ वीज बिले देऊन शेतकऱ्यांची लूट चालू आहे. महावितरणकडून कुठल्याही प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जात नाही. पदरमोड करून शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. सरकारने सर्वप्रथम सर्व शेतीमालाचा हमीभावाचा कायदा करावा आणि मग वीज बिल वसूल करावे. महावितरणने शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता शेतकऱ्यांच्या शेतात उभे केलेले इलेक्ट्रिक पोल असतील डीपी, वीज वाहतूक करणाऱ्या तारा यांचे भाडे आज तागायत दिले नाही. ते आधी द्यावे. मग वसुलीचा तगादा लावावा. या सर्व बाबी वरून आपल्याला लक्षात येते की आपण सरकारचे किंवा महावितरणचे देणे लागत नाही. उलट आपल्याला महावितरणकडून घेणे आहे.तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपले म्हणणे लेखी व कायदेशीर मार्गाने मांडावे व कृषी पंपाचे वीज बिल भरू नये. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केले आहे.