शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

वीज तोडल्यास न्यायालयात खटला दाखल करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

-- मंचर : वीज वसुली झाली नाही म्हणून मनमानी पध्दतीने बेकायदेशीररित्या कृषीपंपाची वीज तोडून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी ...

--

मंचर : वीज वसुली झाली नाही म्हणून मनमानी पध्दतीने बेकायदेशीररित्या कृषीपंपाची वीज तोडून आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी संकटात आणले तर महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.

वीज वितरण कंपनीला कृषी पंपाची वीज तोडण्यीच सुचना तोडण्याची खुद्द उर्जा मंत्र्याने दिले आहेत. मात्र शेतकऱ्यांनी त्याला घाबरून जाऊ नये कारवाईला आलेच त्याचा कायदेशीर प्रतिकार करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन प्रभाकर बांगर यांनी केले. सरकारने विज बिल वसुलीसाठी महावितरणला परवानगी देताना शेतकऱ्यांचा विचार करायला हवा होता. शेतीमालाच्या उत्पादन खर्चात विज बिल सुद्धा येते. भरमसाठ वीज बिले देऊन शेतकऱ्यांची लूट चालू आहे. महावितरणकडून कुठल्याही प्रकारच्या सेवा सुविधा पुरवल्या जात नाही. पदरमोड करून शेतकऱ्यांना छोट्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. सरकारने सर्वप्रथम सर्व शेतीमालाचा हमीभावाचा कायदा करावा आणि मग वीज बिल वसूल करावे. महावितरणने शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता शेतकऱ्यांच्या शेतात उभे केलेले इलेक्ट्रिक पोल असतील डीपी, वीज वाहतूक करणाऱ्या तारा यांचे भाडे आज तागायत दिले नाही. ते आधी द्यावे. मग वसुलीचा तगादा लावावा. या सर्व बाबी वरून आपल्याला लक्षात येते की आपण सरकारचे किंवा महावितरणचे देणे लागत नाही. उलट आपल्याला महावितरणकडून घेणे आहे.तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपले म्हणणे लेखी व कायदेशीर मार्गाने मांडावे व कृषी पंपाचे वीज बिल भरू नये. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केले आहे.