शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेती पंपाची वीज तोडल्यास तीव्र आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:13 IST

उंब्रज येथील आयोजित पत्रकार परिषदेस शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे, जुन्नर तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, उपाध्यक्ष अजीत वाघ उपस्थित ...

उंब्रज येथील आयोजित पत्रकार परिषदेस शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे, जुन्नर तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, उपाध्यक्ष अजीत वाघ उपस्थित होते.

सर्वच पक्षांनी सत्तेवर येताना शेतकऱ्यांना मोफत वीज आणि कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. परंतु, सत्ता मिळाल्यानंतर या दोन्ही प्रश्नांना बगल देण्यात आली. कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण देश ग्रासला अनेकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. शेतकऱ्यांची तर दयनीय अवस्था झाली आहे. दुसरीकडे शेतकरीकडे नैसर्गिक संकटांचाही सामना करत आहेत. त्यातच आता महावितरणने थकबाकीदारांची वीज जोडणी तोडण्याचे काम सुरू केले आहे. महामारीमुळे लाॅकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या असताना वीज तोडणी करून सरकार कायद्याचा भंग करीत आहे. यापूर्वी औरंगाबाद खंडपीठामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने सन २०१०- २०११ मध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती त्याचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागलेला असताना निकालांमध्ये स्पष्ट म्हटले आहे की कोणत्याही शेतकऱ्यांची वीज तोडणी शासनाने करू नये असे असताना कायदा हातात घेऊन शेतकऱ्यास त्रास देण्याचे काम महावितरण कंपनीमार्फत केले जात आहे.

शासनाच्यावतीने विद्युत वितरण कंपनीने न्यायालयात आम्ही कोणत्याही शेतक-यांची वीज जोडणी तोडणार नाही, असे प्रतिज्ञापत्र करून दिलेले असताना कायद्याचा भंग करून आज सर्रास शेतक-यांची वीज तोडणी करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. तरी तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.