शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

शहराकडे जाण्याचे प्रमाण घटल्यास आत्महत्यांना पायबंद

By admin | Updated: October 16, 2015 01:21 IST

शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो

पुणे : शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो आणि हतबल होतो. या तरुणांचे शहराकडे जाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आत्महत्यांचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. लायन्स क्लबतर्फे शताब्दीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी परिवारांना मदतीचा हात देण्यासाठी नाना पाटेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला. या वेळी पाटेकर बोलत होते. याप्रसंगी लायन्स क्लबचे श्रीकांत सोनी, शैैलेश शहा, सतीश देसाई, श्याम अगरवाल, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे आदी उपस्थित होते.पाटेकर म्हणाले, की मन हेलावून टाकणारी घटना घडली की भावनेचा उद्रेक होतो आणि भूमिका बदलते. औैरंगाबादमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पाहिल्या आणि मन हेलावले. त्यातूनच या चळवळीची सुरुवात झाली.राजकीय घडामोडींवर, राजकारण्यांच्या नाकर्तेपणावर भाष्य करण्यापेक्षा मदतीचा हात पुढे करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. मदतीतून शेतकऱ्यांना अपंग न करता त्यांना केवळ पाठिंब्याची जाणीव आपण करून द्यायची आहे. शेतकऱ्यांना मदत केली की आपले काम संपत नाही, तर प्रक्रिया सुरू होते. या पाठिंब्याची चळवळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हायला हवी. बळीराजाच्या जमिनीत राहून श्रमदान करायला हवे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले.आयुष्यभर संपत्तीचा संचय करण्यापेक्षा तो गरजूंसाठी खर्च करायला शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा ६७ वर्षांत ते जो बदल घडवून आणू शकले नाहीत, तो आपण सर्व जण मिळून १०-१५ वर्षांमध्ये घडवून आणू शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)