शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शहराकडे जाण्याचे प्रमाण घटल्यास आत्महत्यांना पायबंद

By admin | Updated: October 16, 2015 01:21 IST

शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो

पुणे : शेतकऱ्यांची मुले नोकरी-व्यवसायासाठी शहरात जातात. वृद्ध शेतकऱ्यांना शेतीची आधुनिक तंत्रे माहीत नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या कोरडवाहू शेतीवरच तो अवलंबून राहतो आणि हतबल होतो. या तरुणांचे शहराकडे जाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आत्महत्यांचे प्रमाणही कमी होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. लायन्स क्लबतर्फे शताब्दीनिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी परिवारांना मदतीचा हात देण्यासाठी नाना पाटेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला. या वेळी पाटेकर बोलत होते. याप्रसंगी लायन्स क्लबचे श्रीकांत सोनी, शैैलेश शहा, सतीश देसाई, श्याम अगरवाल, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे आदी उपस्थित होते.पाटेकर म्हणाले, की मन हेलावून टाकणारी घटना घडली की भावनेचा उद्रेक होतो आणि भूमिका बदलते. औैरंगाबादमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पाहिल्या आणि मन हेलावले. त्यातूनच या चळवळीची सुरुवात झाली.राजकीय घडामोडींवर, राजकारण्यांच्या नाकर्तेपणावर भाष्य करण्यापेक्षा मदतीचा हात पुढे करणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. मदतीतून शेतकऱ्यांना अपंग न करता त्यांना केवळ पाठिंब्याची जाणीव आपण करून द्यायची आहे. शेतकऱ्यांना मदत केली की आपले काम संपत नाही, तर प्रक्रिया सुरू होते. या पाठिंब्याची चळवळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हायला हवी. बळीराजाच्या जमिनीत राहून श्रमदान करायला हवे, असे मत पाटेकर यांनी व्यक्त केले.आयुष्यभर संपत्तीचा संचय करण्यापेक्षा तो गरजूंसाठी खर्च करायला शिकले पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी राजकारण्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा ६७ वर्षांत ते जो बदल घडवून आणू शकले नाहीत, तो आपण सर्व जण मिळून १०-१५ वर्षांमध्ये घडवून आणू शकतो, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)