शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

सरकारवर टीका केली तर होईल अटक...

By admin | Updated: May 1, 2017 03:20 IST

सध्याची परिस्थिती आणि सध्याच्या राजकारणावर भारत सरकार, पंतप्रधान, खासदार, मुख्यमंत्री इत्यादींवर कोणतीही पोस्ट

पुणे : सध्याची परिस्थिती आणि सध्याच्या राजकारणावर भारत सरकार, पंतप्रधान, खासदार, मुख्यमंत्री इत्यादींवर कोणतीही पोस्ट अथवा व्हिडिओ फॉरवर्ड करू नका़ पोलिसांनी नोटिफिकेशन काढले असून, त्यानुसार हे सायबर क्राइम  होईल आणि त्यावर तातडीने कारवाई केली जाईल़ कोणत्याही वॉरंटशिवाय अटक केली जाईल़ तेव्हा  राजकारणावर आणि धर्मावरील  चर्चेचा कोणताही मेसेज हा गुन्हा  होईल़ तेव्हा सर्वांनी हे गंभीरपणे  घ्यावे़ अशा प्रकारचे तद्दन बनावट  मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर धुमाकूळ घालत आहेत़  अशा प्रकारे लोकांना भीती दाखवण्याची नवी पद्धत आणि आपल्याविरुद्ध कोणताही तक्रारीचा  सूर उमटू नये, यासाठी हे प्रकार सुरू  झाले आहेत़ याबाबत पुणे शहर पोलीस आणि सायबर क्राइममधील तज्ज्ञ वकिलांनी असे कोणतेही नोटिफिकेशन पोलिसांनी काढले नसल्याचे सांगितले आहे़ सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही निर्णयावर उलटसुलट चर्चा होते़ विरोधक त्यावर टीका करतात़ पण, अशा सर्व प्रकारच्या निर्णयावर आपल्याला काय वाटते, हे मांडण्यासाठी सध्या सर्व जण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतात़ विविध ग्रुपवर होणाऱ्या चर्चांमध्ये राजकीय गोष्टीबाबतच सर्वाधिक चर्चा असते़ त्यातून  बऱ्याचदा सरकारवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका होताना दिसते़ अशा टीकेमुळे समाजातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण तयार होऊ  शकते, हे लक्षात घेऊन बहुदा अशाप्रकारचे मेसेज पसरविले जात असल्याचे बोलले जात आहे़  याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले,  की जाणूनबुजून अशाप्रकारचे =मेसेज पसरवून लोकांमध्ये  भीती निर्माण करण्याचा प्रयत्न  केला जात आहे़ लोकांनी त्याकडे  दुर्लक्ष करावे़ (प्रतिनिधी)टीका करण्याचा सर्वांना अधिकारसर्वोच्च न्यायालयाचा एका निवाडा आहे़ त्यानुसार सरकारच्या कोणत्याही निर्णयावर मत व्यक्त करण्याचा नागरिकांना अधिकार आहे़ तसेच कोणाच्याही मताविरोधात आपले मत व्यक्त करता येते़ केवळ त्यात वैयक्तिक बदनामी होईल असे काही नसावे़ टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे़ केवळ निर्णयावर टीका केली म्हणून कोणावरही कारवाई होऊ शकत नाही़- अ‍ॅड़ गौरव जाचक, सायबर क्राइममधील तज्ज्ञ पोलिसांचे अशा प्रकारचे कोणतेही नोटिफिकेशन नाही़ कोणताही शासकीय आदेश नाही़ व्हॉट्सअ‍ॅपचा हा गैरवापर आहे़ त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये़ - दीपक साकुरे, पोलीस उपायुक्त, सायबर सेल, पुणेहे म्हणजे सरकारच्या विरोधात कोणीच काही बोलायचे नाही़ जनतेसाठी सरकार चालवताय ना़, मग टीकाही ऐकून घ्यायलाच हवी़ अशा प्रकारे आवाज दाबणे किंवा मुस्कटदाबी करणे असे होईल व देश हळूहळू हुकूमशाहीकडे जातोय की काय अशी भीती वाटते़ - अ‍ॅड़ मिलिंद पवार