शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

शेतकरी जगला तर आपण जगू : डॉ. सदानंद मोरे; प्रा. बळवंतराव जगताप यांचा पुण्यात सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:32 IST

शेतकरी जगला तर आपण जगू, हे समाजातील प्रत्येक घटकाला समजले पाहिजे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात ते बोलत होते.

ठळक मुद्देकृषीतज्ज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष गौरवजगताप यांच्या ‘मनातले कागदावर’ या पुस्तकाचे यावेळी झाले प्रकाशन

पुणे : हिमालयापासून केरळच्या समुद्रापर्यंत आपला देश हा खंडप्राय देश आहे. जगातील सर्व देशातील कृषी भिन्नतेचा आविष्कार आपल्या देशात आहे. भारतातील ही शेती म्हणजे एक प्रयोगशाळाच आहे. पिकविणे ही एक निर्मिती आहे. त्यामुळे शेतकरी हा निर्मितीशील आणि पोशिंदा देखील आहे. शेतकरी जगला तर आपण जगू, हे समाजातील प्रत्येक घटकाला समजले पाहिजे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने कृषीतज्ज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जगताप यांच्या ‘मनातले कागदावर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी झाले. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले, आनंद कोठडिया, शेखर गायकवाड, प्रा. डॉ. पी. एन. रसाळ, अ‍ॅड. अशोक पवार, विकास देशमुख यावेळी उपस्थित होते. राम ताकवले म्हणाले, ‘शेती करणारा माणूस कोण आहे हे पाहिले जात नाही. तिथे प्रत्येकजण समान असतो. ही समानता शहरातील माणसामध्ये दिसत नाही. कृतीशी शिक्षणाचा संबंध लावायला हवा. जे शिक्षण कृतीशील असते, तेच शाश्वत असते. जे शिक्षण तुम्हाला समाज ज्ञान देते, तेच तुमच्या जीवनात उपयोगी असते.’ प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंतराव मोहिते यांनी आभार मानले.

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेPuneपुणे