शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वृत्ती बदलल्यास पाणीप्रश्न कायमचा सुटेल

By admin | Updated: January 12, 2017 03:03 IST

आजकाल पावसाच्या अनियमिततेबाबत ओरड केली जाते. मात्र, पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून जिरवल्यास आणि संवर्धन

पुणे : आजकाल पावसाच्या अनियमिततेबाबत ओरड केली जाते. मात्र, पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून जिरवल्यास आणि संवर्धन केल्यास दररोज जलउत्सव साजरा करता येईल. रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून नदी, विहिरी, नाले यांचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. लोकांसह सरकार, प्रशासन, राजकीय व्यक्ती यांची वृत्ती बदलल्यास आणि सजगता निर्माण झाल्यास पाण्याशी संबंधित सर्व समस्या सुटतील, असे मत वॉटर लिटरसी फाउंडेशनचे संस्थापक अयप्पा मसगी यांनी व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी वसुंधरा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अयप्पा मसगी यांना वसुंधरा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, माधव चंद्रचूड, वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.प्लॅस्टिकमुक्त दापोलीसाठी कार्यरत असलेले रामदास कोकरे, चित्रपट निर्माते सुबय्या नलामुत्थु आणि सीडब्लूपीआरएस संस्थेसाठी डॉ. एम. के. सिन्हा यांना वसुंधरामित्र, सांगलीतील अग्रणी नदी पुनरु ज्जीवन प्रकल्पासाठी सुनील जोशी, नरेंद्र चुग, लातूरमधील मांजरा प्रकल्पासाठी अशोक कोकरे आणि पुण्यातील रामनदी प्रकल्पांसाठी इंदू गुप्ता, प्रगती कौशिक, अनिल गायकवाड यांना वसुंधरागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राजेंद्रसिंह म्हणाले, ‘‘नद्यांबाबत प्रत्येकाला आत्मीयता वाटली तरच त्यांचे पुनरु ज्जीवन खऱ्या अर्थाने होईल. नद्यांची स्वच्छता आणि सौंदर्य जपण्यासाठी होणाऱ्या प्रकल्पांना नदीसंवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा पाठिंबा आहे. मात्र, ते काम योग्य रीतीने होणे आवश्यक आहे.’’इंदू गुप्ता म्हणाल्या, ‘‘पुण्यातील राम नदीला २०१० मध्ये पूर आला. त्यानंतर नदीने जणू मदतीची हाक दिली. या नदीला महापालिका आणि जिल्हाधिकारी असे दोन पालक आहेत. नदीची स्वच्छता आणि ती पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एप्रिल २०११ मध्ये उपोषण केले. फेब्रुवारी २०१४ मध्ये राडारोडा टाकून नदीपात्र बुजवण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांनी सुरू केला. त्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण नाल्याचे नदीत रूपांतर करण्यात आम्हाला यश आले. १७ बांधकाम व्यावसायिकांविरोधात आमचा लढा सुरू आहे.’’ रामदास कोकरे म्हणाले, ‘‘कचरामुक्त शहर शक्य आहे. त्यासाठी जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. ’’ सुनील जोशी म्हणाले, ‘‘लोकसहभाग आणि समाज, सरकार यांच्या सहकार्यातून अग्रणी नदीला पुनरुज्जीवित करण्यात आले.’’