शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन : आढळराव

By admin | Updated: February 20, 2017 01:57 IST

खासदारांमुळे विमानतळ खेडबाहेर गेले हा आरोप सिद्ध करा, मी राजकारण सोडेन. सिद्ध करता आले नाही

मंचर : ‘‘आंबेगावचे लोकप्रतिनिधी खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. खासदारांमुळे विमानतळ खेडबाहेर गेले हा आरोप सिद्ध करा, मी राजकारण सोडेन. सिद्ध करता आले नाही आले तर तुम्ही राजीनामा द्या,’’ असे आव्हान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा समारोप मंचर येथे झाला. त्या वेळी झालेल्या सभेत आढळराव पाटील बोलत होते. ते म्हणाले, वळसे पाटील ६ वेळा आमदार झाले. त्यांनी २७ वर्षांत काय केले याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे. मी ३ वेळा लोकसभेला निवडून आलो आहे. त्यामुळे जनतेने निवडून दिल्याने कामाचा हिशेब मी जनतेला सांगण्यास बांधिल आहे.माझ्या सोबत होते त्या वेळी सुधारणा झाली होती, आता कोण कोण बरोबर असते ते काय माहीत, असा टोला त्यांनी लगावला.बैलगाडा शर्यतीसंदर्भात मार्चच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे. वळसे पाटील म्हणतात विधानसभेत खासगी विधेयक आणणार. मग २७ वर्षे काय करत होत? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राजाराम बाणखेले यांच्यावर टीका करताना आढळराव पाटील म्हणाले, माझी काय चूक झाली, माझ्यावर अन्याय झाला, असा अपप्रचार बाणखेले करतात. पक्षाच्या विरोधी लढायचे व मी निष्ठावंत म्हणायचे हे चालणार नाही. बऱ्याच लोकांचा विरोध असूनसुद्धा तुम्हाला पक्षात घेतले ही आमची चूक झाली. गद्दारांना परत शिवसेनेत प्रवेश नाही, असे आढळराव यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)