शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

संपर्क, जात, खर्चाची तयारी याचा होणार विचार

By admin | Updated: November 7, 2016 01:45 IST

दिवाळीनंतर आता राजकीय पक्षांकडून प्रभागातील उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विद्यमान नगरसेवकांना काही अपवाद वगळता

पुणे : दिवाळीनंतर आता राजकीय पक्षांकडून प्रभागातील उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विद्यमान नगरसेवकांना काही अपवाद वगळता पुन्हा संधी दिली जाईल. ज्या ठिकाणी विद्यमान उमेदवार नसेल तिथली जागा निवडून आणण्यासाठी उमेदवारी देताना विविध गोष्टींचा विचार राजकीय पक्षांकडून केला जात आहे. त्यामध्ये इच्छुक उमेदवारांचा लोकांशी असलेला संपर्क, प्रभागातील बहुसंख्य मतदारांची जात, खर्च करण्याची तयारी, प्रभागातील विशिष्ट भाग आदी गोष्टींचा विचार करून उमेदवारी अंतिम होणार आहे.महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यत होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दीड महिना अगोदर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करून निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल. महापालिका निवडणुकीमध्ये घरोघर जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जातो. मात्र यंदा प्रथमच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक पार पडणार असल्याने याकडे मिनी आमदारकीची निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनाही ६० ते ६५ हजार मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. यापार्श्वभूमीवर उमेदवारांना प्रचार करण्यासाठी जास्त वेळ मिळावा यासाठी उमेदवारांच्या याद्या यंदा लवकर जाहीर करण्याचे नियोजन सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोव्हेंबरअखेर आपली पहिली यादी जाहीर केली जाईल असे स्पष्ट केले आहे.चार सदस्यीय प्रभागामध्ये उमेदवार हा बहुसंख्य लोकांच्या परिचयाचा असणे महत्त्वाचे असणार आहे. विद्यमान नगरसेवक हे गेल्या ५ वर्षांतील त्यांच्या कामामुळे नागरिकांशी जोडले गेलेले असतात. प्रभागात त्यांची ओळख निर्माण झालेली असते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारीच्या पहिल्या यादीमध्ये बहुतांश विद्यमान नगरसेवकांना तिकिटांचे वाटप केले जाईल.राजकीय पक्षांकडून त्यांच्या पातळीवर वेगवेगळे सर्व्हे केले जात आहेत. भाजपाने संपूर्ण प्रभागांचे सर्व्हे करून ए, बी, सी, डी अशी जागांची वर्गवारी केली. जेथून भाजपाचा उमेदवार निश्चित निवडून येईल ती जागा ए, त्या खालोखाल बी, सी, डी अशा जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार सी आणि डी जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पेठांमध्ये कसा शिरकाव करता येईल यावर खल सुरू आहे. याठिकाणांहून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उभे राहावे यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वात पहिल्यांदा धावून जाणारा नगरसेवक असतो. त्यामुळे तो आपल्या घराजवळचा असावा अशी त्यांची मानसिकता असते. चार सदस्यीय प्रभागही खूप मोठे झाले आहेत. त्यामुळे पॅनल तयार करताना प्रभागांमधील वेगवेगळ्या भागातील उमेदवार त्यामध्ये असतील याची खबरदारी राजकीय पक्षांकडून घेतली जाणार आहे. त्या त्या भागातील उमेदवारांना तिथल्या मतदारांची मते एकगठ्ठा मिळतात. त्यांना आता स्वत:बरोबर आपल्या पक्षाच्या इतर उमेदवारांसाठीही मते घ्यावी लागतील.खर्चाबाबत द्विधा मनस्थितीनिवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्च करण्याची एक विशिष्ट मर्यादा आखून दिली आहे. मात्र ही मर्यादा क्वचितच एखाद्या उमेदवाराकडून पाळली जाते. चार सदस्यीय प्रभाग झाल्यामुळे साहजिकच उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे. विविध भेटवस्तू वाटप, पार्ट्या यावर खर्च करताना तो संपूर्ण प्रभागात करायचा की आपापल्या भागापुरता करायचा याबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये द्विधा मनस्थिती दिसून येत आहे. चारच्या प्रभागामध्ये आपल्या एकट्यावरच खर्चाचा भार पडणार नाही ना याची चिंता विद्यमान नगरसेवकांना सतावू लागली आहे.जात फॅक्टर ठरणार महत्त्वाचाराज्यभरात विविध शहरांमधून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण वातावरण ढवळून काढले आहे. त्यापाठोपाठ ओबीसी मोर्चा, बहुजन मोर्चेही काढण्यात आले. यापार्श्वभूमीवर जातीय अस्मिता अधिक टोकदार बनल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना ‘जात’ फॅक्टरचा राजकीय पक्षांना खूप विचार करावा लागणार आहे. प्रभागांमधून वेगवेगळी जातीय समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत.