शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

संकटांवर मात करून आदर्श शेती

By admin | Updated: September 5, 2015 03:22 IST

स्वत:चे विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात असेल, तर डोंगराएवढी संकटे जमीनदोस्त करता येतात. त्याच जमिनीवर सोने उगवता येते.

शैलेश काटे, इंदापूरस्वत:चे विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात असेल, तर डोंगराएवढी संकटे जमीनदोस्त करता येतात. त्याच जमिनीवर सोने उगवता येते. निमगाव केतकी जवळच्या राऊतवाडी येथील सिंधूबाई लक्ष्मण राऊत या ६४ वर्षे वयाच्या शेतकरी महिलेने हे दाखवून दिले आहे. वयाच्या ३८व्या वर्षी विधात्याने माथ्यावर वैधव्याचा शाप लिहिला. पदरात एकुलता एक मुलगा, त्याचे शिक्षण, पालनपोषण व घर चालवण्याची जबाबदारी सिंधूबार्इंवर येऊन पडली. सोबत कर्तसवरतं कुणीच नव्हतं. होती तीन एकर जिरायती जमीन. ६३ फूट खोल कोरडी विहीर. मात्र न डगमगता, सिंधूबार्इंनी पडेल ते कष्ट करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. तो प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागला. सन २००४पासून गेल्या दोन वर्षांपर्यंत तीन वेळा रानात बोअर खोदल्या. पण एकदाही पाणी लागलं नाही. हिंमत न हारता, शिक्षक असणाऱ्या मुलाला शिक्षक पतसंस्थेतून साडेतीन लाख रुपये कर्ज काढावयास लावले. त्या रकमेतून रानातील बारा गुंठ्यांत ६० लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे तयार करून घेतले. शेजारच्या शेतकऱ्याच्या विहिरीतून ३०० रुपये प्रतितास प्रमाणे पाणी घेऊन शेततळे भरले. त्यावर ठिबक सिंचन संच जोडून घेतला.शेळगाव परिसरामध्ये तेल्या रोगामुळे डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबेबहारमध्ये सुमारे ६० टक्के नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सप्टेंबरमध्ये आता हस्तबहार छाटणीला सुरुवात झाली आहे. येथील १० टक्के लोकांनी बागा काढून टाकल्या आहेत. तेल्याचे जिवाणू सुप्तावस्थेत दीर्घकाळ राहात असल्यामुळे योग्य वातावरणात त्याची वाढ होऊन अचानक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.- भजनदास पवार (डाळिंब उत्पादक, शेळगाव)