शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटी योजना धूळ खात पडून!

By admin | Updated: January 11, 2017 02:27 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे केंद्र सरकार पुरस्कृत आयसीटी योजना धूळ खात पडली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १६ लाख विद्यार्थी संगणक

इंदापूर : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे केंद्र सरकार पुरस्कृत आयसीटी योजना धूळ खात पडली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १६ लाख विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.सविस्तर वृत्त असे की, सन २००८-२००९ या वर्षापासून शासनाने अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये केंद्र पुरस्कृत आयसीटी योजना सुरू केली. ही योजना एनआयटी, आयएलएफएस, कोअर एज्युकेशन, बिर्ला, शुक्ला या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करून राज्यांमध्ये ८ हजार संगणक कक्ष तयार करण्यात आले. या योजनेत एका कक्षासाठी १२.५ लाख खर्च शासनाने केला. त्यामध्ये १० संगणक संच, यूपीएस, ओव्हरहेड प्रोजेक्टर आणि इतर साहित्य मोफत पुरवण्यात आले होते. एका कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. त्यास महिन्याला किमान दहा हजार रुपयेप्रमाणे पाच वर्षांचे वेतन निश्चित करण्यात आले होते. संगणक निदेशकानी, ज्या विद्यार्थ्यास कधी संगणक माहीतसुद्धा नव्हता, त्याला संगणक साक्षर बनवले होते. दरवर्षी पाच शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आले होते. विद्यार्थी आयसीटीच्या तासाकडे लक्ष देऊन, विलक्षण उत्सुकतेने वाट बघत शिकलेसुद्धा. मात्र ही योजना संपून बरेच दिवस झाले. महाराष्ट्रातील अनुदानित माध्यमिक शाळेत पहिल्या टप्प्यात पाचशे, दुसऱ्या टप्प्यात अडीच हजार आणि तिसऱ्या टप्प्यात पाच हजार असे एकूण ८ हजार शिक्षक आणि संगणक कक्ष तयार करण्यात आले खरे; मात्र ही योजना संपल्याने तीन हजार शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक मोर्चे आंदोलने करण्यात आली. शिक्षकांना शासनाने कोणालाही बेरोजगार होऊ देणार नसल्याची आश्वासने दिली आहेत. संपूर्ण पाच वर्षांत या शिक्षकांची कंपन्यांनी खूप पिळवणूक केली. १० हजार रुपये किमान वेतन असतानाही केवळ ३ ते ५ हजारच मानधन तेही अवेळी दिले गेले. पगारवाढ दरवर्षी असूनदेखील पाच वर्षांत एकदाही दिली गेली नाही. भविष्यनिर्वाह निधी खात्यात अजून जमा नाही. पाच वर्षांत करार संपला. मात्र शाळेतील संगणक हे शिक्षकांच्या अभावामुळे धूळ खात पडून आहेत. (वार्ताहर)४महाराष्ट्रातील सुमारे १६ लाख विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मग ही योजना नेमकी कुणासाठी हा ही एक प्रश्नच आहे. शासन या शिक्षणासारख्या गंभीर विषयावर विचार करणार तरी कधी? त्यातच मोर्चे काढणाऱ्या शिक्षकांवर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात लाठीमार झाला. आता संगणक शिक्षकांनी करायचे तरी काय, हा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.