शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पी. चिदंबरम, अरुण जेटली यांची भाषणे आवडतात : युवराज संभाजीराजे छत्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:02 IST

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोन व्यक्तींचे भाषण मला खूप आवडते. वकिलीचा अभ्यास राजकारण्यांना फायद्याचा आहे, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपुण्यात १९७० साली जेव्हा आलो तेव्हा हातगाडी ओढण्याचे काम करीत होतो : विनायक करकंडेवकिलीचा अभ्यास राजकारण्यांना सर्वार्थाने फायद्याचा : युवराज संभाजीराजे छत्रपती

पुणे : वकिली पेशा हा उत्तम व हुशारीचा पेशा आहे. पूर्वी वकील म्हणजे हुशार व्यक्ती, न्यायालयात खटला चालविणारे असा अर्थ होत असे. परंतु आज त्याचा फायदा राजकारणात देखील होताना दिसतो. राज्यसभेत बोलताना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोन व्यक्तींचे भाषण मला खूप आवडते. त्यांची मांडणी, बोलण्याचे कौशल्य उत्तम आहे. हे दोघेही अर्थमंत्री असले तरी त्यांनी वकिलीचा अभ्यास केला आहे. त्यामुळे वकिलीचा अभ्यास राजकारण्यांना सर्वार्थाने फायद्याचा आहे, असे मत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात ज्येष्ठ वकील अ‍ॅड. विनायक करकंडे यांंच्या पासष्टीपूर्ती सोहळ्यात त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा व त्यांच्या पत्नी भाग्यश्री करकंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. राज्याचे माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. के. आर. शहा, नियती शहा, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, नगरसेविका अश्विनी कदम, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर, प्रशासकीय शिक्षण अधिकारी दीपक माळी, अनिल पायगुडे, अजय पाटील, वडझिरे ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी औटी, बार कौन्सिलचे सदस्य हर्षद निंबाळकर उपस्थित होते. याशिवाय पुणे बार असोसिएशन, लॉयर कन्झुमर सोसायटी, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, शिवाजी मराठा संस्था यांच्यावतीने देखील अ‍ॅड. विनायक करकंडे यांचा सन्मान करण्यात आला.     शशिकांत सुतार म्हणाले, की करकंडे हे पेशाने वकिल असले तरी दोन वाद होणाºया संस्थांच्या बाजूने ते असायचे आणि त्या संस्था पुन्हा एकत्रित येवून काम कशा करतील, यासाठी ते प्रयत्न करायचे. करकंडे यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत अनेक माणसे जोडली त्यांचा हा प्रवास आजच्या युवकांसाठी आदर्श ठरेल व युवकांना त्यांनी केलेल्या कायार्ची प्रेरणा मिळेल.अ‍ॅड. के. आर. शहा म्हणाले, की माणूस जीवन जगताना ते कसे जगतो हे महत्त्वाचे नाही, तर त्याने आयुष्यात काय कमाविले आहे हे महत्त्वाचे आहे. करकंडे जेव्हा पुण्यात आले, तेव्हा हातात काही नसताना त्यांनी गरीबीतून विश्व उभे केले. त्यांच्या कार्यातून त्यांनी अनेक माणसे जोडली. कोणतीही गोष्ट हाती घेतली तर ती पूर्णत्वाला घेऊन जाण्याची जिद्द त्यांच्या अंगी आहे. स्वमेहनतीने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले आहे,  त्यामुळे त्यांचा वानप्रस्थ सुखकारक होईल, असेही त्यांनी सांगितले.                                            सन्मानाला उत्तर देत अ‍ॅड. विनायक करकंडे म्हणाले, की पुण्यात १९७० साली जेव्हा आलो तेव्हा हातगाडी ओढण्याचे काम करीत होतो. तेव्हा अनेक व्यक्ती भेटल्या, त्यामुळे निरखून पारखून मैत्री करणे कधी जमलेच नाही म्हणून आजमितीस अनेक माणसे जोडली गेली. पुणे शहराने मला विद्या, उत्तम ज्ञान, संपत्ती, सुख आणि जिव्हाळ्याची माणसे दिली. यापुढील १० वर्षात विद्यार्थ्यांची मानसिकता घडविण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री करकंडे यांनी आभार मानले.  

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPuneपुणे