शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

पी. चिदंबरम, अरुण जेटली यांची भाषणे आवडतात : युवराज संभाजीराजे छत्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 18:02 IST

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोन व्यक्तींचे भाषण मला खूप आवडते. वकिलीचा अभ्यास राजकारण्यांना फायद्याचा आहे, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपुण्यात १९७० साली जेव्हा आलो तेव्हा हातगाडी ओढण्याचे काम करीत होतो : विनायक करकंडेवकिलीचा अभ्यास राजकारण्यांना सर्वार्थाने फायद्याचा : युवराज संभाजीराजे छत्रपती

पुणे : वकिली पेशा हा उत्तम व हुशारीचा पेशा आहे. पूर्वी वकील म्हणजे हुशार व्यक्ती, न्यायालयात खटला चालविणारे असा अर्थ होत असे. परंतु आज त्याचा फायदा राजकारणात देखील होताना दिसतो. राज्यसभेत बोलताना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोन व्यक्तींचे भाषण मला खूप आवडते. त्यांची मांडणी, बोलण्याचे कौशल्य उत्तम आहे. हे दोघेही अर्थमंत्री असले तरी त्यांनी वकिलीचा अभ्यास केला आहे. त्यामुळे वकिलीचा अभ्यास राजकारण्यांना सर्वार्थाने फायद्याचा आहे, असे मत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहात ज्येष्ठ वकील अ‍ॅड. विनायक करकंडे यांंच्या पासष्टीपूर्ती सोहळ्यात त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा व त्यांच्या पत्नी भाग्यश्री करकंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. राज्याचे माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. के. आर. शहा, नियती शहा, एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे, नगरसेविका अश्विनी कदम, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र दौंडकर, प्रशासकीय शिक्षण अधिकारी दीपक माळी, अनिल पायगुडे, अजय पाटील, वडझिरे ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी औटी, बार कौन्सिलचे सदस्य हर्षद निंबाळकर उपस्थित होते. याशिवाय पुणे बार असोसिएशन, लॉयर कन्झुमर सोसायटी, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी, शिवाजी मराठा संस्था यांच्यावतीने देखील अ‍ॅड. विनायक करकंडे यांचा सन्मान करण्यात आला.     शशिकांत सुतार म्हणाले, की करकंडे हे पेशाने वकिल असले तरी दोन वाद होणाºया संस्थांच्या बाजूने ते असायचे आणि त्या संस्था पुन्हा एकत्रित येवून काम कशा करतील, यासाठी ते प्रयत्न करायचे. करकंडे यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत अनेक माणसे जोडली त्यांचा हा प्रवास आजच्या युवकांसाठी आदर्श ठरेल व युवकांना त्यांनी केलेल्या कायार्ची प्रेरणा मिळेल.अ‍ॅड. के. आर. शहा म्हणाले, की माणूस जीवन जगताना ते कसे जगतो हे महत्त्वाचे नाही, तर त्याने आयुष्यात काय कमाविले आहे हे महत्त्वाचे आहे. करकंडे जेव्हा पुण्यात आले, तेव्हा हातात काही नसताना त्यांनी गरीबीतून विश्व उभे केले. त्यांच्या कार्यातून त्यांनी अनेक माणसे जोडली. कोणतीही गोष्ट हाती घेतली तर ती पूर्णत्वाला घेऊन जाण्याची जिद्द त्यांच्या अंगी आहे. स्वमेहनतीने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले आहे,  त्यामुळे त्यांचा वानप्रस्थ सुखकारक होईल, असेही त्यांनी सांगितले.                                            सन्मानाला उत्तर देत अ‍ॅड. विनायक करकंडे म्हणाले, की पुण्यात १९७० साली जेव्हा आलो तेव्हा हातगाडी ओढण्याचे काम करीत होतो. तेव्हा अनेक व्यक्ती भेटल्या, त्यामुळे निरखून पारखून मैत्री करणे कधी जमलेच नाही म्हणून आजमितीस अनेक माणसे जोडली गेली. पुणे शहराने मला विद्या, उत्तम ज्ञान, संपत्ती, सुख आणि जिव्हाळ्याची माणसे दिली. यापुढील १० वर्षात विद्यार्थ्यांची मानसिकता घडविण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी प्रास्ताविक केले. भाग्यश्री करकंडे यांनी आभार मानले.  

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPuneपुणे