शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा राजगुरू स्मारकाचे काम अनास्थेने रखडलेलेच, आंदोलनाचा पवित्रा घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 04:18 IST

देश स्वातंत्र्य होऊन आज सत्तर वर्षे उलटली तरी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाºया हुतात्म्यांची उपेक्षा संपलेलीच नाही. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मारकाचे रखडलेले काम कधी मार्गी लागणार, असा सवाल राजगुरुनगरवासीय करीत आहेत.

राजगुरुनगर : देश स्वातंत्र्य होऊन आज सत्तर वर्षे उलटली तरी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाºया हुतात्म्यांची उपेक्षा संपलेलीच नाही. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मारकाचे रखडलेले काम कधी मार्गी लागणार, असा सवाल राजगुरुनगरवासीय करीत आहेत. स्मारकाच्या पूर्णत्वासाठी लोक पुन्हा आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.इंग्रजांच्या जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी चळवळ उभारणाºया भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी इंग्रजांनी फाशी दिली. पंजाबमध्ये हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. पंजाब सरकारकडून राज्यभर विविध कार्यक्रम होतात. मात्र, राजगुरूंच्या जन्मभूमीत - महाराष्ट्रामध्ये हा हुतात्मा अनेक वर्षे दुर्लक्षितच राहिला आहे. हुतात्मा राजगुरूचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरुवाड्यांचे राजगुरूंच्या कर्तृत्वाला साजेशा हुतात्मा राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती केली जावी, अशी येथील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. शासनाने राजगुरुवाडा हा ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केला. राजगुरुवाड्यातील थोरल्या वाड्याचे काम पूर्ण झाले आहे.वाड्यात हुतात्मा राजगुरूंचे भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार होते. पुणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील एक महत्त्वाचे प्रेरणास्थळ व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाईल, अशा पद्धतीने या स्मारकाची उभारणी केली जाणार होती. खरंतर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. उलट क्रांतिकारकांच्यासंदर्भात शासकीय अनास्थेचाच प्रत्यय येत आहे.वर्ष २००७ मध्ये राजगुरुनगर येथे राजगुरू यांच्या वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा करण्यात आली. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती व राजगुरुनगर नगर परिषद यांच्या वतीने दरवर्षी राजगुरुंच्या पुण्यतिथी, जंयतीनिमित्त कार्यक्रम तसेच १५ आॅगस्ट, २६ जानेवारी या दिवशी वाड्यावर ध्वजवंदन करण्यात येते.तेव्हाच ही उपेक्षा थांबेलक्रांतीकारकांच्या हुतात्मा दिनीच सर्वांना पुतळ्याची आणि स्मारकाची आठवण होते, मग पुन्हा विचारांचा जागर होतो.आश्वासनांची खैरात होते आणि पुन्हा सगळे शांत! ही गेल्या कित्येक वर्षांची कैफियत आहे ती बदलायला हवी, तरच स्मारकाची आणि खºया अर्थाने राजगुरूंची उपेक्षा थांबेल, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.हुतात्मा राजगुरु यांचा वाडा राज्य सरकार आणि पुरातत्त्व विभाग यांच्या अखत्यारित येतो. स्मारकासाठी अर्थसंकल्पात निधीची सोय करण्याची, तसेच स्मारकाच्या विकासकामाला गती देण्याची ८४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मंत्र्यांनी घोषणा झाली. आतापर्यंत सव्वादोन कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून स्मारकाचे काम केवळ ८ ते १० टक्केच पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा कागदी आराखडा सिद्ध झाला आहे. परंतु निधीअभावी सर्व कामे रखडली आहेत.- सुशील मांजरे, सचिव,हुतात्मा राजगुरु स्मारक समिती