शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या धाडसामुळे वाचला पतीचा जिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर: पत्नीच्या धाडसामुळे आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शेतकरी पती-पत्नीचा बिबट्याच्या हल्ल्यातून जीव वाचला आहे. एका बाजूला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर: पत्नीच्या धाडसामुळे आंबेगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शेतकरी पती-पत्नीचा बिबट्याच्या हल्ल्यातून जीव वाचला आहे. एका बाजूला शेतकरी दुसऱ्या बाजूला त्यांची पत्नी व मध्ये बिबट्या असा थरारक अनुभव विठ्ठलवाडी येथील शेतकरी बबन भालेराव व त्यांची पत्नी शिल्पा यांनी अनुभवला आहे.

दररोज बिबट्याच्या संदर्भात अनेक घटना होत असतानाही वनविभाग मात्र गप्प का असा सवाल नागरिकांमधून होत आहे. विठ्ठलवाडी परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. तसेच महावितरण कंपनीची थ्रीफेज वीज शुक्रवार ते रविवार रात्री उपलब्ध असते. दिवसा पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पिकांना रात्री पाणी द्यावे लागत आहे. विठ्ठलवाडीत रविवारी रात्री बबन भालेराव घराजवळच असलेल्या ऊस पिकाला पाणी भरत होते. पत्नी शिल्पा भालेराव बंगल्याच्या अंगणात येऊन पाण्याबाबत चौकशी करत होत्या. त्यांच्या घरापासून वीस फूट अंतरावर ऊसाजवळ बिबट्या होता. यावेळी आरडाओरड झाल्याने आई सुनीता भालेराव देखील घराबाहेर आल्या. पलीकडे उसाला पती बबन पाणी भरत असल्याने शिल्पा जिवाच्या आकांताने ओरडली ''''अहो, पळा पळा बिबट्या जवळ आलाय''''. बबन यांना नक्की बिबट्या कोठे आहे हे समजेना. अंधारात चाचपडत ते शेतातून घराकडे पळत सुटले. ते ज्या रस्त्याने घरी येत होते त्याच दिशेला बिबट्या उभा होता. आता नक्कीच काहीतरी विपरीत घडणार पतीवर बिबट्या हल्ला करणार असे पत्नी शिल्पा यांना वाटले. पण नशीब बलवत्तर होते म्हणून हातात असलेल्या बॅटरीच्या प्रकाशाने बिबट्या विचलित झाला. बिबट्या येथून निघून गेला अन्‌ बबन सुखरूप घरात आले. आई सुनीता यांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडेना. सुनेला घट्ट धरून त्यांनी हंबरडा फोडला. सासू आणि सून एकमेकीला धरून रडू लागल्या. दोघींना बबन यांनी धीर दिला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या भीतीने शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. वनविभाग मात्र कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नसून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.