शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महापालिका शाळेतील नम्रता निघाली युरोपला

By admin | Updated: June 16, 2015 00:52 IST

महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जा चांगला नसतो, तिथे शिक्षणासाठी चांगले वातावरण नसते असा सर्वसाधारण समज आहे.

पुणे : महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जा चांगला नसतो, तिथे शिक्षणासाठी चांगले वातावरण नसते असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, गंज पेठेतील पालिकेच्या आचार्य विनोबा भावे शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या नम्रताने हा समज खोटा ठरविला आहे. कारण ती आता पुढील शिक्षणासाठी युरोपला चालली आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजेस या संस्थेच्या एका शिष्यवृत्तीअंतर्गत तिची निवड केली आहे. नम्रता खानविलकर असे या विद्यार्थिनीचे नाव. आठवीपर्यंतचे शिक्षण बिबवेवाडीतील पालिकेच्या शाळेत पूर्ण केल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी आचार्य विनोबा भावे शाळेत प्रवेश घेतला. इथे तिने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. दहावीच्या परीक्षेत तिला ८७.६० टक्के गुण मिळाले आहेत. तिची आई आशा खानविलकर या गृहिणी असून, वडील अनंत खानविलकर हे खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतात. आता नम्रता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी युरोप खंडातील अरमेनिया इथे जाणार आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजस या संस्थेची जगभरात विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालये आहेत. संस्थेमार्फत शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी शाळेमार्फत पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. देशातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विविध टप्प्यांवर परीक्षा, चर्चा, मुलाखत, उपक्रमाच्या माध्यमातून १२० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भावे शाळेतील नम्रतासह रमेश बी. व श्लोक सदलाकपूरकर यांची निवड झाली आहे. ही शाळा ही आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेतर्फे चालविली जाते. तिघांपैकी नम्रताची निवड अरमेनियातील महाविद्यालयात झाली आहे. तर दोघे मुळशीतील महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतील. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना नम्रता म्हणाली, की मला खूप आनंद झाला आहे. शाळेनेच अर्ज केला होता. पण, अभ्यास करून त्यात यश मिळविले. तिथे नियमित शिक्षणाबरोबरच खूप उपक्रम असल्याने फायदा होणार आहे. आशा खानविलकर यांनीही आपल्या मुलीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या मुलींनी इंग्रजी शिकावे असे खूप वाटत होते. पण त्यांनी अपेक्षेपेक्षा खूप काही दिले आहे. नम्रताच्या या यशात तिच्या शाळेचा मोठा वाटा आहे. तसेच वडिलांनीही खूप कष्टाने सर्वांना उभे केले आहे.