शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीच्या संवेदनशीलतेची दृष्टी हरपली

By admin | Updated: December 31, 2014 00:13 IST

मोतीबिंदूमुळे दृष्टिहीन झालेला एक श्वान संभाजी उद्यानात आहे. दोन्ही डोळ््यांनी काहीही दिसत नसल्याने त्याला खाण्याचीही भ्रांत असते. उद्यानात फिरणारे काही नागरिकच त्याला थोडेफार खायला देतात.

पुणे : मोतीबिंदूमुळे दृष्टिहीन झालेला एक श्वान संभाजी उद्यानात आहे. दोन्ही डोळ््यांनी काहीही दिसत नसल्याने त्याला खाण्याचीही भ्रांत असते. उद्यानात फिरणारे काही नागरिकच त्याला थोडेफार खायला देतात. त्यातीलच एका प्राणीमित्राने श्वानाची ही अवस्था पाहून काही प्राणीमित्र संस्थांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. मात्र, या प्राणीमित्र संस्थांनी श्वानाला आसरा देण्यास टाळाटाळ केल्याने संवेदनशीलतेची दृष्टीच हरपल्याचे दिसून आले.संभाजी उद्यानात गेल्या काही दिवसांपासून एक दृष्टिहीन श्वान अडखळत फिरत आहे. श्वानाच्या डोळ््यांकडे पाहिले, की त्याला मोतीबिंदू झाल्याचे लक्षात येते. उद्यानातील एकाच ठिकाणी तो दिवसभर बसून असतो. कधी भूक लागली तर तिथल्या तिथेच वास घेत अन्न शोधत असतो. उद्यानात फिरायला येणाऱ्यांना त्याची कीव आली तर ते त्याला खायला टाकतात, अन्यथा उपाशी राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. त्यातच उद्यानात काही भटके श्वान असून या श्वानाला त्रास देतात. काहीच दिसत नसल्याने हा त्रास सहन करणे त्याला भागच आहे. उद्यानात दररोज सकाळी फिरायला येणारे काही जण या श्वानाला खायला घेऊन येतात. त्यामध्ये गणेश पानसरे हे प्राणीमित्रही असतात. त्यांना या श्वानाचे हाल पाहवले नाहीत म्हणून त्यांनी काही प्राणीमित्र संस्थांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली. या श्वानाच्या डोळ््याची शस्त्रक्रिया करणे किंवा त्याला कायमस्वरूपी आसरा देण्याची विनंती त्यांना संबंधितांना केली. मात्र, त्यांच्याकडून विविध कारणे पुढे करीत टाळाटाळ करण्यात आली.(प्रतिनिधी)४याविषयी अधिक माहिती देताना पानसरे म्हणाले, ‘शहरालगतच्या तीन संस्थांच्या प्रतिनिधींना दूरध्वनीवरून श्वानाची माहिती दिली. त्यातील एका संस्थेने डोळ््यांच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च आहेत, तोपर्यंत संस्थेमध्ये ठेवू शकणार नाही, असे उत्तर दिले. ४दुसऱ्या संस्थेने तुम्ही स्वत: त्या श्वानाला आणून सोडा, असे सांगून हात झटकले. तर तिसऱ्या संस्थेने नव्याने कोणताही प्राणी निवाऱ्यासाठी घेत नसल्याचे थेट सांगून टाकले. संबंधित संस्थांना अनेक सवलती मिळतात.४ स्वत:ला प्राण्यांचे आश्रयदाते म्हणत या संस्था लाखो रुपयांच्या देणग्याही घेतात, त्यामुळे त्यांच्याकडून प्राण्यांना आसरा मिळण्याची अपेक्षा सामान्य नागरिक करतात. मात्र, या संस्थांकडूनच याबाबत टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते. ४ श्वानाला अनेकजण खायला टाकतात, अन्यथा त्याला उपाशीच रहावे लागत आहे.