शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

माणुसकीच्या संवेदनशीलतेची दृष्टी हरपली

By admin | Updated: December 31, 2014 00:13 IST

मोतीबिंदूमुळे दृष्टिहीन झालेला एक श्वान संभाजी उद्यानात आहे. दोन्ही डोळ््यांनी काहीही दिसत नसल्याने त्याला खाण्याचीही भ्रांत असते. उद्यानात फिरणारे काही नागरिकच त्याला थोडेफार खायला देतात.

पुणे : मोतीबिंदूमुळे दृष्टिहीन झालेला एक श्वान संभाजी उद्यानात आहे. दोन्ही डोळ््यांनी काहीही दिसत नसल्याने त्याला खाण्याचीही भ्रांत असते. उद्यानात फिरणारे काही नागरिकच त्याला थोडेफार खायला देतात. त्यातीलच एका प्राणीमित्राने श्वानाची ही अवस्था पाहून काही प्राणीमित्र संस्थांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. मात्र, या प्राणीमित्र संस्थांनी श्वानाला आसरा देण्यास टाळाटाळ केल्याने संवेदनशीलतेची दृष्टीच हरपल्याचे दिसून आले.संभाजी उद्यानात गेल्या काही दिवसांपासून एक दृष्टिहीन श्वान अडखळत फिरत आहे. श्वानाच्या डोळ््यांकडे पाहिले, की त्याला मोतीबिंदू झाल्याचे लक्षात येते. उद्यानातील एकाच ठिकाणी तो दिवसभर बसून असतो. कधी भूक लागली तर तिथल्या तिथेच वास घेत अन्न शोधत असतो. उद्यानात फिरायला येणाऱ्यांना त्याची कीव आली तर ते त्याला खायला टाकतात, अन्यथा उपाशी राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. त्यातच उद्यानात काही भटके श्वान असून या श्वानाला त्रास देतात. काहीच दिसत नसल्याने हा त्रास सहन करणे त्याला भागच आहे. उद्यानात दररोज सकाळी फिरायला येणारे काही जण या श्वानाला खायला घेऊन येतात. त्यामध्ये गणेश पानसरे हे प्राणीमित्रही असतात. त्यांना या श्वानाचे हाल पाहवले नाहीत म्हणून त्यांनी काही प्राणीमित्र संस्थांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली. या श्वानाच्या डोळ््याची शस्त्रक्रिया करणे किंवा त्याला कायमस्वरूपी आसरा देण्याची विनंती त्यांना संबंधितांना केली. मात्र, त्यांच्याकडून विविध कारणे पुढे करीत टाळाटाळ करण्यात आली.(प्रतिनिधी)४याविषयी अधिक माहिती देताना पानसरे म्हणाले, ‘शहरालगतच्या तीन संस्थांच्या प्रतिनिधींना दूरध्वनीवरून श्वानाची माहिती दिली. त्यातील एका संस्थेने डोळ््यांच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्च आहेत, तोपर्यंत संस्थेमध्ये ठेवू शकणार नाही, असे उत्तर दिले. ४दुसऱ्या संस्थेने तुम्ही स्वत: त्या श्वानाला आणून सोडा, असे सांगून हात झटकले. तर तिसऱ्या संस्थेने नव्याने कोणताही प्राणी निवाऱ्यासाठी घेत नसल्याचे थेट सांगून टाकले. संबंधित संस्थांना अनेक सवलती मिळतात.४ स्वत:ला प्राण्यांचे आश्रयदाते म्हणत या संस्था लाखो रुपयांच्या देणग्याही घेतात, त्यामुळे त्यांच्याकडून प्राण्यांना आसरा मिळण्याची अपेक्षा सामान्य नागरिक करतात. मात्र, या संस्थांकडूनच याबाबत टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते. ४ श्वानाला अनेकजण खायला टाकतात, अन्यथा त्याला उपाशीच रहावे लागत आहे.