शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मानवता हाच खरा धर्म !

By admin | Updated: November 30, 2015 01:59 IST

धर्मात राजकारणाचा प्रवेश झाला की विद्वेश निर्माण होतो, माणसा-माणसांत वैराची भावना निर्माण होते, शत्रुत्व निर्माण होते.

पुणे : धर्मात राजकारणाचा प्रवेश झाला की विद्वेश निर्माण होतो, माणसा-माणसांत वैराची भावना निर्माण होते, शत्रुत्व निर्माण होते. कुठल्याही धर्मग्रंथात दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. मानवता हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक अब्दुल कादीर मुकादम यांनी केले.‘वारजे विकास कृती समिती’तर्फे रविवारी राष्ट्रीय एकात्मता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘असहिष्णुता व दहशतवाद’ या विषयावर मुकादम बोलत होते. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख भानुप्रसाद बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेळाव्याचे संयोजक नगरसेवक दिलीप बराटे, नुरुद्दिन पटेल, बाबा खान व्यासपीठावर होते.मुकादम म्हणाले, सुशिक्षित तरुणांना संमोहित करून दहशतवादी कृत्याला बळी पाडले जात आहे. दहशतवादी कृत्याला तरुण बळी पडणार नाही, यासाठी समाजानेच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टींचा केवळ निषेध करून थांबविता येणार नाही. पाश्चात्य देशातील आणि भारतातील दहशतवादी कृत्यांबाबत वेगवेगळा विचार करावा लागेल. भारतातील दहशतवादाला पाकिस्तानचे पाठबळ मिळत आहे. कुवेत, दुबई, इराक, तुर्कस्तान, इराणच्या मनात अमेरिकेविषयी प्रचंड राग आहे. त्याचे कारण तेलसाठ्याचे राजकारण आहे. या राष्ट्रांना दावणीला बांधण्याचा अमेरिकेचा डाव आहे. इराक अमेरिकेला बळी न पडल्याने इराकला नेस्तनाबूत करण्यात आले. वास्तविक, इराकमधून एकही दहशतवादी तयार झालेला नाही. भारतासमवेत युद्ध करू शकत नाही, हे पाकिस्तानला माहीत असल्याने छुपे युद्ध खेळले जात आहे. दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांचा धर्मपालनाचा अधिकार काढून घेण्यासाठी जागतिक पातळीवर कायदा केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सहिष्णुता आणि असहिष्णुता यातील फरकही त्यांनी विषद केला.दहशतवादाचा निषेध करीत समतेचा संदेश देणारे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले. दिलीप बराटे यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. नवाज खान, हमीद शेख, सचिन दांगट, नूर सय्यद, मदिन खान, आलम पठाण, दत्ता झंजे आदी उपस्थित होते. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद सूर्यवंशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)