शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीची खचली भिंत, कचराकुंडीसारखा केला जातोय वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:14 IST

भोसरी : आपल्याला अनावश्यक असलेले कपडे गोरगरीबांपर्यंत पोहोचावेत यासाठी शहरात ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला एकूणच अवकळा आली आहे.

भोसरी : आपल्याला अनावश्यक असलेले कपडे गोरगरीबांपर्यंत पोहोचावेत यासाठी शहरात ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला एकूणच अवकळा आली आहे. गरजूंसाठी नव्हे तर फेकून द्यायचे म्हणून येथे कपडे आणून टाकले जात आहेत. त्यातच हा उपक्रम सुरू करणाºयांनीही भिंतींकडे पाठ फिरवल्याने टाकाऊ कपडे, कचºयाचे ढीग या भिंतींसमोर साचले आहेत. माणुसकीच ‘खचल्या’ने या भिंती निरुपयोगी ठरू लागल्या आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरूकेला. नागरिकांनी नवीन कपडे खरेदी केल्यानंतर जुन्या कपड्यांचे काय करायचे? असा प्रश्न अनेकांसमोर असतो. त्यामुळे एकीकडे कपड्यांची वानवा असलेले गोरगरीब तर दुसरीकडे जुन्या कपड्यांचे काय करायचे? या चिंतेत असलेले नागरिक असे चित्र समाजात दिसून येते. जुने परंतु चांगल्या स्थितीत वापरलेले कपडे गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ते माणुसकीच्या भिंतीवर आणून टांगण्याची सोय या उपक्रमांतर्गत करण्यात आली. सामाजिक भावनेतून चांगल्या स्थितीतील जुने कपडे याठिकाणी आणून टाकले जात होते. गरजूंनीही सुरुवातीला या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय कार्यकर्त्यांमार्फत माणुसकीची भिंत सुरू करण्याची चढाओढ सुरू झाली. पिंपरीतील तीन ठिकाणी, चिखली, भोसरी, सांगवी, वाकड आदी ठिकाणी माणुसकीची भिंत सुरू करण्यात आली. काही राजकीय कार्यकर्त्यांनी ‘माणुसकीच्या भिंती’वर टाकलेली कपडे धुवून, इस्त्री करून गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उचलली. मात्र, महापालिका निवडणूक पार पडताच. राजकीय कार्यकर्त्यांनी भिंतींकडे पाठ फिरवली. काही नागरिकांनी फाटलेली, टाकाऊ स्वरूपातील कपडे फेकून देण्याऐवजी माणुसकीच्या भिंतीवर आणून टाकण्यास सुरुवात केली. हे कपडे जीर्ण झालेले तसेच वापरण्यासही योग्य नसल्याने गरजूंनीही या भिंतींकडे पाठ फिरवली आहे.कपड्याचे ढीग साचत असताना नागरिक याठिकाणी कचरा टाकत आहेत. शहरातील एकाही ठिकाणची ‘माणुसकीची भिंत’ वापरात नाही. या भिंतींना अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. कपड्याच्या ढिगातून ऊब मिळवण्यासाठी सध्या मोकाट जनावरांचा याठिकाणी ठिय्या आहे.>शहरातील माणुसकीच्या भिंतीची अवस्था पाहता माणुसकीच हरवल्याचे पहायला मिळत आहे. टाकाऊ कपड्यांबरोबरच याठिकाणी कचरादेखील टाकला जात आहे. त्यामुळे अशा भिंतींच्या परिसरात अस्वच्छता वाढत चालली आहे. हा उपक्रम चांगला आहे. त्यामुळे सामाजिक योगदानातून हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. राजकीय हेतूने सुरू झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ वगळता इतर ठिकाणी सामाजिक संस्थांनी सुरू केलेला हा उपक्रम पुढे सुरू रहावा यासाठी महापालिकेच्या नागर वस्ती विभागामार्फत धोरण ठरवणे गरजेचे आहे.- संदेश बोºहाडे, अध्यक्ष, यूथ फॉर क्राईस्ट फाउंडेशन