शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

माणुसकीची खचली भिंत, कचराकुंडीसारखा केला जातोय वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:14 IST

भोसरी : आपल्याला अनावश्यक असलेले कपडे गोरगरीबांपर्यंत पोहोचावेत यासाठी शहरात ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला एकूणच अवकळा आली आहे.

भोसरी : आपल्याला अनावश्यक असलेले कपडे गोरगरीबांपर्यंत पोहोचावेत यासाठी शहरात ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाला एकूणच अवकळा आली आहे. गरजूंसाठी नव्हे तर फेकून द्यायचे म्हणून येथे कपडे आणून टाकले जात आहेत. त्यातच हा उपक्रम सुरू करणाºयांनीही भिंतींकडे पाठ फिरवल्याने टाकाऊ कपडे, कचºयाचे ढीग या भिंतींसमोर साचले आहेत. माणुसकीच ‘खचल्या’ने या भिंती निरुपयोगी ठरू लागल्या आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरूकेला. नागरिकांनी नवीन कपडे खरेदी केल्यानंतर जुन्या कपड्यांचे काय करायचे? असा प्रश्न अनेकांसमोर असतो. त्यामुळे एकीकडे कपड्यांची वानवा असलेले गोरगरीब तर दुसरीकडे जुन्या कपड्यांचे काय करायचे? या चिंतेत असलेले नागरिक असे चित्र समाजात दिसून येते. जुने परंतु चांगल्या स्थितीत वापरलेले कपडे गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी ते माणुसकीच्या भिंतीवर आणून टांगण्याची सोय या उपक्रमांतर्गत करण्यात आली. सामाजिक भावनेतून चांगल्या स्थितीतील जुने कपडे याठिकाणी आणून टाकले जात होते. गरजूंनीही सुरुवातीला या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय कार्यकर्त्यांमार्फत माणुसकीची भिंत सुरू करण्याची चढाओढ सुरू झाली. पिंपरीतील तीन ठिकाणी, चिखली, भोसरी, सांगवी, वाकड आदी ठिकाणी माणुसकीची भिंत सुरू करण्यात आली. काही राजकीय कार्यकर्त्यांनी ‘माणुसकीच्या भिंती’वर टाकलेली कपडे धुवून, इस्त्री करून गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी उचलली. मात्र, महापालिका निवडणूक पार पडताच. राजकीय कार्यकर्त्यांनी भिंतींकडे पाठ फिरवली. काही नागरिकांनी फाटलेली, टाकाऊ स्वरूपातील कपडे फेकून देण्याऐवजी माणुसकीच्या भिंतीवर आणून टाकण्यास सुरुवात केली. हे कपडे जीर्ण झालेले तसेच वापरण्यासही योग्य नसल्याने गरजूंनीही या भिंतींकडे पाठ फिरवली आहे.कपड्याचे ढीग साचत असताना नागरिक याठिकाणी कचरा टाकत आहेत. शहरातील एकाही ठिकाणची ‘माणुसकीची भिंत’ वापरात नाही. या भिंतींना अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. कपड्याच्या ढिगातून ऊब मिळवण्यासाठी सध्या मोकाट जनावरांचा याठिकाणी ठिय्या आहे.>शहरातील माणुसकीच्या भिंतीची अवस्था पाहता माणुसकीच हरवल्याचे पहायला मिळत आहे. टाकाऊ कपड्यांबरोबरच याठिकाणी कचरादेखील टाकला जात आहे. त्यामुळे अशा भिंतींच्या परिसरात अस्वच्छता वाढत चालली आहे. हा उपक्रम चांगला आहे. त्यामुळे सामाजिक योगदानातून हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. राजकीय हेतूने सुरू झालेल्या ‘माणुसकीची भिंत’ वगळता इतर ठिकाणी सामाजिक संस्थांनी सुरू केलेला हा उपक्रम पुढे सुरू रहावा यासाठी महापालिकेच्या नागर वस्ती विभागामार्फत धोरण ठरवणे गरजेचे आहे.- संदेश बोºहाडे, अध्यक्ष, यूथ फॉर क्राईस्ट फाउंडेशन