शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रापंचायत निवडणुकीचा खर्च कसा करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ६५० ग्रामपंचातीच्या निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रशासनाने सर्व तयारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील ६५० ग्रामपंचातीच्या निवडणुका अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. ग्रामविकास विभागाकडून प्रति ग्रामपंचायतीला ५० हजार खर्च मंजुर आहे. असा एकुण ३२ कोटी ५० लाख खर्च निवडणुकांना लागणार असून प्रशासनाला केवळ आतापयर्यंत १६ हजार प्रति ग्रामपंचायत नुसार १० कोटी ४० रूपयेच मिळाले आहे. यामुळे हा निवडणुका कशा घ्यायचा असा प्रश्न प्रशासनापुढे पडला आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. तर ही निवडणुक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मददान यंत्रे पोहचवण्यात आली आहेत. त्यांच्या चाचण्याही सुरू आहेत. १५ तारखेला या निवडणुका होणार आहेत. प्रशासना ला कागपत्रे, छपाई, वाहतूक, निवडणुक भत्ते या साठी मोठा निधी ग्रामविकास विभागाकडून मिळत असतो. प्रति ग्रामपंचायत ५० हजार खर्च मंजुर आहे. ६५० ग्रामपंचायतींसाठी प्रति ५० हजार प्रमाणे ३२ कोटी ५० लाखांचा निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, केवळ प्रति ग्रामपंचायतीसाठी प्रशासनाला केवळ १६ हजार असा १० कोटी ४० लाखांचाच निधी उपलबद्द्ध झाला आहे. निवडणुक अवघ्या तिन दिवसांवर असतांना हा खर्च करणार कसा ? असा प्रश्न निवडणुक यंत्रणेपुढे पडला आहे.

कशावर किती होतो प्रशासकीय खर्च?

निवडणुक यंत्रणा राबवितांना प्रशासनाला मोठा खर्च करावा लागतो. निवडणुक पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. तसेच कागद पत्रांची छपाई, इव्हीएम यंत्रणेचा खर्च, त्यांची वाहतूक, निवडणुक कर्मचाऱ्यांचे भत्ते आणि वाहतुकीचा खर्च तसेच मतदान केंद्राचाही खर्च असतो. या सर्वासाठी मोठा निधी लागत असतो. प्रतिग्रामपंचयाती प्रमाणे या साठी ५० हजार मंजुर करण्यात आले आहे.

मागील निवडणुकांचा खर्च मिळाला

निवडणुकांची तयारी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तिन दिवस उरल्याने कामाला वेग आला आहे. गेल्या निवडणुकीत ही सर्व यंत्रणा राबविण्यात आली होती. हा खर्च प्रशासनाला ग्रामविकास विभागाकडून टप्या टप्याने मिळाला आहे. या निवडणुकांचाही खर्च अशाच पद्द्धतीने मिळण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे.

कोट

निवडणुक यंत्रणा ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पाडाव्या यासाठी व्यस्त आहे. जवळपास सर्व तयारी झाली आहे. आता पर्यत आम्हाला प्रति ग्रामपंचायतीसाठी १६ हजार रूपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित रक्कम लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे. निलप्रसाद चव्हाण,

तहसिलदार