शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

निरामय कसे राहता येईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:10 IST

--- सध्या कोरोनामुळे प्रत्येक जण चिंतेत आहे . सर्वत्र काळजी आणि भिती असे काहीसे संमिश्र वातावरण आहे . ...

---

सध्या कोरोनामुळे प्रत्येक जण चिंतेत आहे . सर्वत्र काळजी आणि भिती असे काहीसे संमिश्र वातावरण आहे . प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने निरामय कसे राहता येईल, यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे ...कसे राहता येवू शकेल हो निरामय ? प्रश्न तसा सोपा वाटतो, पण उत्तरे प्रत्येकाची वेगळी असणार ...एखादी सवय बदलणे सांगणे सोपे असते पण प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अश्याच काही पारंपारिक सवयी अंगी बाणवून घेणे आज अत्यावश्यक आहे.

सर्वात प्रथम ...आपण नित्यक्रम पाहूया ...तपासुया ...उठण्याची वेळ ...शक्य असेल त्यांनी सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे. उठल्यानंतर आवडीप्रमाणे नित्य व्यायाम केल्यास शरीरास हितकारक ठरत .रोज किमान ४० मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे व्यायाम निवडावा. सध्या काय खावे ? हा प्रश्न खूप मोठा राहिला आहे असे वाटत नाही. कारण परिस्थितीने घराचे खाणे शिकवून दिले. मी कायमच पारंपरिक आहार घ्यावा याबाबतीत आग्रही आहे. प्रत्येकाने आपल्या घरात बनणारा ताजा आहार मनसोक्त घ्यावा. भूक लागली की जेवावे ... तहान लागली की पाणी प्यावे ... यात एक गोष्ट टाळावी ती म्हणजे खाण्यावर खाणे.... अनेकजण सध्या घरून काम करत आहे. काम करताना ...कंटाळा आला म्हणून...उगाच भूक लागली नसताना खाणे कटाक्षाने टाळावे. शारीरिक व्यायाम जसा आवश्यक आहे तसा मनाचा विचार सुध्दा आवश्यक आहे. आज अनेक ताण आहेत. प्रश्न आहेत, काळ अवघड आहे. अश्या परिस्थितीत चिडचिड होणे. उदासीनता येणे, नैराश्य येणे ह्या बाबी पाहायला मिळतात. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्राणायाम करणे आवश्यक आहे. प्राणायाम केल्याने मनातील विचार नियंत्रित होण्यास मदत होते .नियंत्रण हे हवेच. मग ते मानसिक असो वा शारीरिक आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शरीर थकते. मन थकते आणि मग येते झोप. रोज मस्त गाढ झोप घेणे गरजेचे आहे. झोप व्यवस्थित असेल तर शरीर आणि मन सुस्थितीत राहते. कामासाठी उत्साह जाणवतो ...झोप येत असताना टीव्ही पाहणे ...अकारण उशीरा रात्री जागरण करणे अश्या गोष्टी टाळाव्यात.थोडक्यात काय ! आपण नेहमीच जे पारंपारिक पद्धतीने पाहत आलो...ज्यात वाढलो ..जे संस्कार मिळाले तेच करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे ....सध्या तंत्रज्ञान खूप विकसित आहे ....पण त्याहीपेक्षा बहुमूल्य असतो परिवार ...आणि आज प्रत्येकास त्याचे महत्त्व पटले आहे .काहीही नसताना अगदी कमी गरजा ठेवून जीवन जगू शकतो हे काळाने शिकविले ...एकमेकांचा सहवास आनंद देतो ...हे या काळाने जाणवून दिले ... जीवनमूल्ये म्हणजे काय हे या काळाने शिकविले ... आणि खऱ्या अर्थाने जीवन जगायला या काळाने शिकविले ...स्वस्थ राहूया ...आणि मस्त निरामय जीवन जगूया

- डॉ. कांचन व्यंकटेश खैराटकर, आयुर्वेद तज्ज्ञ