शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
2
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
3
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
4
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
5
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
6
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
7
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
8
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
9
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
10
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
11
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
12
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
13
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
14
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
15
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
16
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
17
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
18
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
19
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
20
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले

सतरा नंबरच्या विद्यार्थ्यांचा निकाल कसा तयार करायचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST

पुणे: राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावा, यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला असला तरी सतरा नंबरचा ...

पुणे: राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावा, यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला असला तरी सतरा नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करताना अनेक अडचणी येणार असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे. तसेच, दहावीत कोणतेही अंतर्गत मूल्यमापन झालेले नसताना आमचा निकाल कसा तयार केला जाणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता दहावीच्या निकालाचीसाठी मूल्यांकन पद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यात नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्याबाबत संबंधित विद्यार्थ्याने इयत्ता पाचवी ते नववी या कालावधीमध्ये मिळवलेल्या गुणांची टक्केवारी इयत्ता दहावीचा निकालासाठी घेतली जाणार आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांकडे त्यांचे इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे गुणपत्रक उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या जुन्या नोंदणी संबंधित शाळेकडून मागविण्यास बराच कालावधी जाणार आहे. परिणामी, १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना या निकालाबाबत शाळांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

पुण्यासह अनेक ठिकाणी खासगी क्लास (शिकवणी)चालकांकडून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. या क्लास चालकांनी काही शाळांबरोबर अलिखित करार केले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या निकालाची जबाबदारी शाळा घेणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खासगी क्लास चालकांनी आमच्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या आहेत, त्याचआधारे आमचा निकाल जाहीर केला जाईल ,असा चुकीचा समज बहुतेक विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे.

-----------

सतरा नंबरचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शाळांमार्फत काही प्रकल्प लिहून घेतले जातात. तसेच संबंधित विद्यार्थ्यांची अंतर्गत (तोंडी) परीक्षा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे काहीच घेता आले नाही. तसेच इयत्ता नववीमध्ये नापास झाल्याने सतरा नंबरचा अर्ज भरला. आता नववीप्रमाणे आम्ही दहावीतही नापास होणार का ? असा संभ्रम काही विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

------------------

इयत्ता दहावीत १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यासाठी पाचवी ते नववीपर्यंतच्या गुणांची टक्केवारी आवश्यक आहे. ही टक्केवारी मिळविण्यासाठी शिक्षकांना व शाळा प्रशासनाला अनेक अडचणी येणार आहेत. तसेच आमचा निकाल कसा लावला जाणार, याबद्दल १७ नंबरचा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

- अविनाश ताकवले, माजी प्राचार्य

-----------------

मी एका खासगी क्लासमधून इयत्ता दहावीच्या परीक्षेचा १७ नंबरचा अर्ज भरला आहे. क्लासने घेतलेल्या परीक्षेच्या आधारावर आमचा निकाल जाहीर करतील, असे आम्हाला वाटते. त्याचप्रमाणे कोणत्याही परीक्षा दिल्या नाहीत तर आमचा निकाल कसा प्रसिद्ध करणार ? इयत्ता नववीत माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले नव्हते. त्याचा परिणाम दहावीच्या निकालावर होणार आहे का ? याबाबत संभ्रम आहे.

- मयूर जाधव, विद्यार्थी